शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

संदीप सीमेवर निघाला अन् निरोपाचा क्षणही गहिवरला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 00:54 IST

भारत- पाक सीमेवर सद्यस्थितीत युद्धजन्य परिस्थिती आहे. लेह- लद्दाख येथे याहून वेगळी अवस्था नाही.

लेह- लद्दाखमध्ये नियुक्ती : संपूर्ण गाव झाले गोळाघनश्याम नवघडे नागभीडभारत- पाक सीमेवर सद्यस्थितीत युद्धजन्य परिस्थिती आहे. लेह- लद्दाख येथे याहून वेगळी अवस्था नाही. पण अशाही परिस्थितीत बाम्हणी येथील नागरिकांनी गावच्या एका सुपूत्राला लेह- लद्दाख येथे जाण्यासाठी सोमवारी अतिशय भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यावेळी संपूर्ण गाव गोळा झाले. या भावस्पर्शी प्रसंगामुळे संपूर्ण ग्रामस्थ भारावले होते. नागभीडपासून सहा किमी अंतरावर असलेल्या बाम्हणी येथील गणूजी नन्नावरे यांची परिस्थिती अगदी बेताचीच. त्यांना एकूण सहा मुले, त्यात चार मुली आणि दोन मुले यातील संदीपची देहयष्टीे बऱ्यापैकी. त्याची सैन्यात जायची मनपासून इच्छा. त्यादृष्टीने त्याने प्रयत्नसुद्धा चालविले आणि यात त्याला यशही आले.मागील महिन्यात संदीपचे सैन्यविषयक प्रशिक्षण गोवा येथे आटोपले. प्रशिक्षण आटोपल्यानंतर संदीपला नियुक्तीचा आदेश मिळाला. ४ नोव्हेंबर रोजी त्याला रुजू होण्याचेसुद्धा या आदेशात म्हटले असल्याने ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संदीपने घरुन निघण्याचे निश्चित केले. एव्हाना संदीपची सैन्यात निवड झाली आणि तो नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी निघणार आहे, ही वार्ता छोट्याशा बाम्हणीमध्ये कर्णोपकर्णी झाली आणि जो तो संदीपच्या घरी जावून संदीपला शुभेच्छा देऊ लागला.या शुभेच्छा मागे एक वलयसुद्धा आहे. एक तर बाम्हणी या गावातील संदीप हा पहिलाच युवक आहे की ज्याची सैन्यात निवड झाली आणि तीसुद्धा युद्धजन्य परिस्थिती असलेल्या लेह- लद्दाखमध्ये. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक वेगळी हूरहूर होती. अगदी भावूक होऊन प्रत्येक जण संदीपला निरोप देत होता आणि गावचा एक तरुण देशाच्या रक्षणासाठी जात आहे, याचा अभिमानही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. ही चहलपहल संदीपच्या घरी अगदी सोमवारी दिवसभर सुरु होती.शेवटी संध्याकाळी गावच्या बसथांब्यावर संदीप आला, तेव्हा गावकऱ्यांनी आणखी संदीपभोवती गराडा घातला. बस आली. संदीप बसमध्ये चढला आणि संदीपने बसमधून निरोपाचा हात हलविला. तेव्हा तमाम गावकऱ्यांच्या नेत्रकडा पाणावल्या होत्या. निरोपाचा हा क्षणही गहिवरून गेला होता, मात्र बाम्हणीचा हा वीर नवजवान भारतमातेच्या रक्षणासाठी पुढे निघाला होता.