शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयवेड्या मित्रांचा चंदन लागवडीचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:08 IST

हरित मित्र परिवाराचे वरोरा तालुका प्रमुख किशोर उत्तरवार हे गेल्या तीन वर्षांपासून चंदन वृक्षाबाबत शेतकºयांमध्ये जनजागृतीचे काम करीत असून आजपर्यंत हजारो वृक्ष त्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातच नव्हे चंद्रपूर जिल्हातील विविध भागात लावले गेले आहेत.

ठळक मुद्देगावागावात जनजागृती : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी लावले चंदनाचे वृक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : हरित मित्र परिवाराचे वरोरा तालुका प्रमुख किशोर उत्तरवार हे गेल्या तीन वर्षांपासून चंदन वृक्षाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे काम करीत असून आजपर्यंत हजारो वृक्ष त्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातच नव्हे चंद्रपूर जिल्हातील विविध भागात लावले गेले आहेत. यावर्षी त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन तालुक्यात पाच हजार चंदनाचे वृक्ष सहयोगातून लावण्याचा संकल्प केला असून सोशल मीडियावरुनही ते चंदनवृक्ष लागवडीचा संदेश देत आहेत. या ध्येयवेड्या मित्रांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे.तीन वर्षांपूर्वी मराठवाड्यातील दत्तात्रय बगदुरे रा. होसूर ता.निलंगा जिल्हा लातूर या शेतकºयाने १२ एकर शेतात छंदाच्या झाडाची लागवड केल्याचा लेख किशोर उत्तरवार यांनी वाचला. तो लेख वाचून प्रभावित होऊन ते मित्रांसोबत होसूरला गेले. तिथे त्या शेताची पाहणी केली. या पद्धतीचा वापर आपल्या विदर्भातील, आपल्या जिल्ह्यातील शेतकºयांनी केला तर शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारू शकते, असे त्यांना वाटले. हा निर्धार करूनच ते स्वगावी परतले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चंदनाच्या वृक्षांबाबत माहिती प्रसिद्ध करायला सुरुवात केली व पाहता पाहता तीन वर्षात जवळपास १० हजार चंदनाचे वृक्षे वरोरा शहर, तालुका, तसेच आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आली. त्यातील ९० टक्के वृक्ष वाचले असून बºयाच वृक्षांची ऊंची २० फूट झाली आहे. याबाबत अधिक माहिती विचारली असता उत्तरावर यांनी सांगितले की यासाठी त्यांनी कुठलीही शासकीय मदत घेतली नाही.आपल्या मित्र परिवाराच्या आर्थिक सहयोगातून व सोशल मीडियाचा वापर करून चंदन वृक्ष लागवडीचे व मार्गदर्शनाचे कार्य गेल्या तीन वर्षांपासून अविरत सुरु आहे. चंदनाचे झाड हे सर्व वृक्षांपेक्षा आॅक्सिजनपूरक असून चंदन वृक्ष लागवडीमुळे भविष्यात पर्यावरण संतुलित राहून समृद्धीकडे वाटचाल होऊ शकते, ते म्हणाले. या उपक्रमाला व चंदन वृक्ष लागवडीला शासनानेही सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. चंदनाचे वृक्ष सर्व वृक्षांपेक्षा अधि प्राणवायू जास्त सोडत असल्याने मानवाच्या आरोग्यासाठी आणि चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव असल्याने शासनाने शासकीय जमिनीवर चंदनाची लागवड करून त्याचे संवर्धन केल्यास भविष्यात शासनाच्या तिजोरीत हमखास भर पडेल, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.विदर्भाचे, त्यात मुख्यत: चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान उष्ण आहे. चंदनाच्या वृक्षाला मोठे होण्याकरिता साधारणत: उष्ण तापमानाची गरज असते. गेल्या तीन वर्षांपूर्वी तालुक्यात चंदनाच्या वृक्षाबद्दल शेतकºयांमध्ये असणाºया अनेक शंकांना दूर करण्याचेच काम न करता स्वखर्चाने अनेकांना चंदन वृक्ष भेट देऊन त्यांच्या शेतात व घरी चंदनाचे वृक्ष लावले. त्यांच्या या ध्येयवेडेपणामुळे अनेकांना चंदन वृक्षाबद्दल आकर्षण वाढायला लागले व पाहता पाहता त्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाची ख्याती पंचक्रोशीत पोहचली. सध्या दिवसभर चंदन वृक्षांच्या माहितीसाठी दूरवरून त्यांच्या फोन येत असतात. यावर्षी पाच हजार चंदन वृक्ष लागवडीच्या संकल्पांतर्गत जवळपास पंधराशे वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या कामात त्यांचे मित्र स्वप्नील देवाळकर, आशिष ठाकरे, खेमराज कुरेकर, लोकेश पांढरे, अविनाश देवतळे, बाळू नेमाडे, आनंद गुंडांवर, सुनील गायकवाड व मित्रांचे सहकार्य आहे. चंदन तशी मौल्यवान वस्तू. शेतकºयाचे खरे सोनेच म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे शेतकºयांनीही या वृक्षाची लागवड करण्याची गरज आहे.