शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:25 IST

शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करताना मागील दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. काही शेतकऱ्यांना जीवसुद्धा गमवावावा लागला असून, अनेक कृषी केंद्रांमध्ये बंदी असलेल्या किटकनाशकांची सर्रास विक्री होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करताना मागील दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. काही शेतकऱ्यांना जीवसुद्धा गमवावावा लागला असून, अनेक कृषी केंद्रांमध्ये बंदी असलेल्या किटकनाशकांची सर्रास विक्री होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रातील चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.चंद्रपूर तालुक्यातील चेक माणकापूर येथील ऋषी मडावी यांचा २८ आॅगस्टला फवारणी करताना मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील येवती येथील मंगेश निकुरे हा संजय चिमूरकर या शेतकºयांकडे नोकर होता. मालकाच्या सांगण्यावरुन ४ सप्टेंबर रोजी कपाशीवर फवारणीसाठी गेला असता काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपूर येथे भरती केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोबतच अन्य शेतकऱ्यांनाही विषबाधा झाली आहे. परंतु फवारणी करताना वापरलेले कीटकनाशक कोणत्या कंपनीचे होते व कोणत्या कृषी केंद्रातून खरेदी करण्यात आले याची चौकशी करण्यात आली नाही. जिल्ह्यात बंदी असलेली कीटकनाशके अनेक कृषी केंद्रांमध्ये उपलब्ध असताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कृषी केंद्रांची चौकशी करून संबंधित कंपनी व कृषी केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना सुरेश रामगुंडे यांच्यासह हिराचंद बोरकुटे, डी. के. आरीकर, डॉ. देव कन्नाके, अ‍ॅड. गणेश गिरीधर, रवी ढवस, रवींद्र बोरकर, सूर्यभान झाडे, धननजय जीवने उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी