शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बल्लारपूर पेपरमिलमध्ये वेतनवाढ

By admin | Updated: July 2, 2015 01:34 IST

प्रत्येक तीन वर्षाच्या अंतराने होणारी वेतनश्रेणी आणि पगारवाढ याबाबत बल्लारपूर पेपरमील मजदूर सभा आणि पेपर मील व्यवस्थापन यांच्यात चर्चा ...

बल्लारपूर : प्रत्येक तीन वर्षाच्या अंतराने होणारी वेतनश्रेणी आणि पगारवाढ याबाबत बल्लारपूर पेपरमील मजदूर सभा आणि पेपर मील व्यवस्थापन यांच्यात चर्चा होऊन पेपर मीलच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १८६५ ते ४१८८ अशी महिन्याकाठी म्हणजेच सरासरी ३१२८ रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ १ जुलै २०१४ पासून लागू होत आहे. व्यवस्थापन आपल्या कर्मचाऱ्यांना १२ महिन्यांची थकबाकी देईल. माजी खासदार नरेश पुगलिया हे अध्यक्ष असलेल्या मान्यताप्राप्त बल्लारपूर पेपर मील मजदूर सभेच्या वतीने होणारी ही त्रीवर्षीय (ग्रेडेशन) ११ वी पगार वाढ आहे, अशी माहिती बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पेपर मीलच्या नियमित कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ७३३ रुपये वाढ झाली असून या व्यतीरिक्त वेतनश्रेणीनुसार नियमित वाढ (इंक्रीमेट) सरासरी १११.३० रुपये, फिटनेट ५५ रुपये ३७ रुपये, उत्पादकता (प्रॉडक्शन) बोनस, सुपर बोनस, भविष्य निर्वाह निधी, उपदान अशी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष धरून ही वाढ सरासरी ३१२८ रुपये होते. यासोबतच, ठेकेदारी आणि रोजंदारी (डेलीपेड) यांच्या वेतनात प्रतिदिन २९ रुपये आणि सफाई कामगारांच्या वेतनात २७ रुपयांनी वाढ झाली आहे. बीएससी आणि आयटीआय असलेल्या कामगारांच्या वेतनात तसेच शिकाऊ उमेदवार (अप्रेंटीस) यांच्या वेतनातही वाढ करण्यात आलेली आहे. आर्थिक दर्जा उंचावण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्राकडेही या करारात विचार करण्यात आलेला आहे. ठेकेदारी कर्मचाऱ्यांच्या आठवीपासून पुढे ७५ टक्क्याहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. स्थायी कामगारांना ग्रूप मेडीक्लेम लागू होईल, असेही या करारात म्हटले आहे. याबाबत ठेकेदारी कामगारांबाबतही विचार केला जात आहे, अशी माहिती पगारवाढीची माहिती देताना महासचिव वसंत मांढरे यांनी पत्रकारांना दिली. वेतनवाढीची चर्चा बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया, महासचिव वसंत मांढरे, कार्याध्यक्ष तारासिंग कलशी, सहसचिव एन. सत्यनारायण, छोटेलाल, संगठन सचिव चौधरी व रामदास वागदरकर, हेमंत दातारकर, अनिल तुंगीडवार, प्रभाकर टोंगे, जयंत नंदूरकर, विरेंद्र आर्य, गजानन दिवसे तर कंपनीचे सीओओ अग्रवार, एचआर व्हीपीएस मोहन, कंपनी युनिट प्रमुख एस.एस. अरोरा, आनंद बर्वे, रमेश यादव, दुष्यंतकुमार यांच्यामध्ये होऊन तसा करार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)