शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण शेतकरी अधोगतीला

By admin | Updated: May 3, 2015 01:34 IST

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसाने पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्रच कोलमडले आहे.

पोंभुर्णा : दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसाने पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्रच कोलमडले आहे. आधारभूत किंमतीपेक्षा उत्पादन खर्च महागला असल्याने संभाव्य आर्थिक संकटाचा सामना कसा करावा, या विवंचनेत परिसरातील शेतकरी सापडला आहे. तर शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम अत्यल्प आहे. झालेले नुकसान लाखो रुपयांत असले तरी मदत मात्र हजारांत मिळत आहे. यामुळे शेतीवरील पीककर्ज व इतर व्यवहार कसे करायचे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.शेतकऱ्यांच्या उत्पादीत शेतमालाला योग्य भाव मिळावा, तसेच शेतमाल विक्रीमध्ये फसवणूक होवू नये यासाठी आधारभूत किंमती ठरवून दिल्या आहेत. मात्र ज्या मुल्यांकनाने शेतमालाची आधारभूत किंमत ठरविण्यात आली. त्यामध्ये शेतमाल उत्पादकांवर एक प्रकारे अन्यायच केला जातो. आजच्या घडीला शेतमालाला देण्यात येणारा भाव म्हणजे शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला अडचणीत आणण्यासारखा आहे. ज्या भावात शेतमालाची विक्री करावी लागते ते भाव परवडण्यासारखे नाहीत. त्यामुळे परिसरातील शेतकरी कर्जबाजारी होत आहे.शेतकरी खरीप हंगामात जवळपास चार ते पाच महिने कुटुंबासह राबतो. एवढेच नव्हे तर रब्बी हंगामात राबून शेतीतूनन उत्पादन काढतो. विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून उत्पादीत मालाची विक्री करून आपली व कुटुंबाची उपजिविका भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काबाडकष्ट सहन करतो. मात्र पाच ते सहा महिने शेती राबून त्याला हव्या तेवढ्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. खऱ्या अर्थाने रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या मजुराएवढी मजुरी मिळत नाही. यामुळे शेती व्यवसाय न परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी सततच्या नापिकीमुळे व संकटामुळे शेतकरी कर्जाच्या गर्तेत गुंतला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. यासाठी शासनाचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. केंद्र शासनाकडून शेतमालाचे मूल्यांकन करून आधारभूत किंमती जाहिर करण्यात जातात. जाहिर केलेल्या आधारभूत किंमतीमध्ये शेतमालाची खरेदी विविध संस्थांकडून केली जाते. हमी भावावरच आधारित किंमतीनुसार मालाची विक्री करण्याचा शेतकऱ्यांचा कल असतो. परंतु आधारभूत धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागतो. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जाते. शासनाकडून आधारभूत किंमतीतच शेतमालाची विक्री करावी, असे आवाहनही केले जाते. परंतु प्रत्यक्षात शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीही शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरत आहे.चंद्रपूर जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मुख्यत: जिल्ह्यात धान पीक घेतले जाते. जिल्ह्यात एक एकर शेतीमध्ये धानपिकाचा खर्च २० ते २५ हजार रुपये येतो. तर एक एकर मध्ये जवळपास १० ते १५ क्विंटल उत्पादन होते. (तालुका प्रतिनिधी)