शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शौचालय बांधकामाला मिळणार आता १२ हजार रुपये अनुदान

By admin | Updated: November 15, 2014 22:43 IST

स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमातून वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी आता प्रत्येक शौचालयासाठी १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे गाव

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरस्वच्छ भारत अभियान कार्यक्रमातून वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी आता प्रत्येक शौचालयासाठी १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे गाव हागणदारी मुक्त होणार असून नागरिक शौचालय बांधकामासाठी पुढे येत आहेत. केंद्र व राज्य स्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे स्वच्छ भारत अभियान (मिशन) असे नामकरण करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेवर आधारित राष्ट्रीय कार्यक्रमाला बळकटी मिळण्याच्या हेतूने राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची गावस्तरापासून तर राज्यस्तरापर्यंत जनसंवाद माध्यमाच्या मदतीने जनजागृती करण्यात आली. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या पत्रानुसार स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातंर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी २ हजार रुपयांची वाढ करून १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये केंद्राचा हिस्सा ९ हजार रुपये (७५ टक्के) तर, राज्याचा हिस्सा ३ हजार रुपये (२५ टक्के) राहणार आहे. यामुळे नागरिक आता तरी शौचालय बांधकामाकडे वळतील असा विश्वास शासनासह अधिकाऱ्यांना आहे.यापूर्वी वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान निर्मल भारत अभियान व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देण्यात येत होते. मात्र या कार्यक्रमात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान बंद करण्यात आले आहे. पूर्ण रक्कम १२ हजार रुपये स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र शासनाकडून मंजूर निधीतून देण्यात येणार आहे.घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालय बांधकाम या घटकांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधकामाची जबाबदारी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडे तर अंगणवाडीमध्ये स्वच्छतागृहे बांधकाम करण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाकडे सोपविण्यात आली आहे. इंदिरा आवास योजना कार्यक्रमातंर्गत बांधण्यात येणाऱ्या घरातील कार्यरत स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्रपणे अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येणार आहे.सदर प्रकल्पाची तरतूद होईपर्यंत स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमातून सध्या निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.जिल्हास्तरावर सल्लामसलत करून स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शौचालय आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांसाठी अधिकृत तंत्रज्ञान पर्याय, स्वच्छ भारत मिशनद्वारे राज्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाकरिता आवश्यक निधीची तरतूद जिल्हा नियोजन व विकास परिषद अंतर्गत करण्यात येणार आहे. यामुळे नागरिक या योजनेकडे वळतील आणि गावागावांत जनजागृती निर्माण होऊन नागरिक शौचालय बांधकाम करतील, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे.