शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१५ रुपयांच्या पाण्यासाठी आरपीएफने झाडली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:28 IST

पाण्याची बाटली दिली नाही म्हणून पेन्ट्री कारच्या मॅनेजरवर आरपीएफ शिपायाने गोळी झाडली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या काजीपेठ ते खम्मम यादरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिल्लीकडून चेन्नईकडे जाणाऱ्या जीटी एक्सप्रेस क्रमांक १२६१६ या रेल्वे गाडीमधे केवळ १५ रुपयांची पाण्याच्या बॉटल दिली नाही म्हणून पेन्ट्री कारच्या मॅनेजरवर आरपीएफ शिपायाने गोळी झाडली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या काजीपेठ ते खम्मम यादरम्यान घडली.दिल्लीहून येणारी जीटी एक्स्प्रेस बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ४ वाजता रवाना झाली. पुढे रात्री ९. ३० वाजता काजीपेठ ते खम्ममच्या दरम्यान गाडीत गस्तीवर असलेला रेल्वे सुरक्षा दलाचा सिपाही पी. अशोककुमार (बॅच नंबर ४१५७) हा पेन्ट्री कारमध्ये जाऊन मॅनेजर सुनील तोमर रा.भिंड, मध्यप्रदेश यांना पैसे न देता पाण्याची बॉटल मागू लागला. त्याने न दिल्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर आरपीएफ पी. अशोककुमार याने रागाच्या भरात सुनीलवर गोळी झाडली. ती सुनील यांच्या छातीत घुसल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घटना लगेच खम्मम रेल्वे पोलीस व आयआरसीटीसी विभागाला ट्विटरवर दिली व खम्मम रेल्वेस्थानक येताच गोळी मारणाऱ्या पी. अशोककुमार यांना अटक करण्यात आली. तसेच जखमी सुनील तोमर यांना खम्ममच्या इस्पितळात भरती करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी