शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रोम रोमी माझ्या काटा...!

By admin | Updated: November 5, 2016 02:18 IST

आर्या दी बेस्ट अकादमी पाटणच्या वतीने जिवतीसारख्या अतीदुर्गम भागात चंद्रपुरातील प्रतिभावंत कवींची बहारदार काव्यमैफिल पार पडली.

काव्यमैफिल रंगली : आर्या दी बेस्टचा उपक्रमचंद्रपूर : आर्या दी बेस्ट अकादमी पाटणच्या वतीने जिवतीसारख्या अतीदुर्गम भागात चंद्रपुरातील प्रतिभावंत कवींची बहारदार काव्यमैफिल पार पडली. आश्रमशाळा पाटण येथे झालेल्या या काव्यमैफिलीची सुरुवात मधुकर गराटे यांया बोलीभाषेतील लयदार रचनेने झाली. तर आभाळाची आमची पोर, पंख त्यांना द्या ना सर.. उंच भरारी घेतील ज्याने, अशा दिशेला न्या ना सर.. ’ या गीता रायपूरेच्या रचनेने वन्स मोअर मिळविला.‘मी मुलीचा बाप आहे... काय रे हा शाप आहे? काळजाचे फूल माझ्या, ऐन वेळी राप आहे’ ही गझलकार रोशन कुमार पिलेवान यांची चिंतनशील रचना रसिकांना अंतर्मुख करुन गेली.‘कुठे गेले हंगामाच्या सुगीचे दिवस, राबणाऱ्या माणसाला पडला उपसा...’ असे म्हणत कवी किशोर कवठे यांनी शेतकऱ्याचे वास्तव जीवन उभे केले. रामकृष्ण रोगे यांची गझल, ‘खाटेत पाहिले अन् सांदे फरार झाले, मेल्यावरी रडाया सारे तयार झाले...’अशा प्रकारे आजच्या स्वार्थी समाज जीवनाचे चित्रण केले. मो. बा. देशपांडे यांनी.. ’भल्या पहाटे उठल्या गुटख्याची वाट धरतो... पानमंदिरी फूकट उगा वेळेची कत्तल करतो...’ असा रसिकांना व्यसनमुक्तीचा सल्ला दिला.प्रभाकर धोपटे यांची ‘नवरा बापाने पाहून दिला देखना, निंगला गॉगलच्या आत मंदी हेकना’ ही विनोदी रचना रसिकांमध्ये हास्याचे कारंजे उडवित लोटपोट करणारी ठरली.‘लपेटले धुक्यातले हे चंद्रथेंब मोकळे , सांगू कसे प्रिया तुला हे शब्दरंग बिलगले...’ वर्षा चोबे यांनी ही प्रेमकविता तेवढ्याच नजाकतीने सादर केली.कवी किशोर मुगल यांनी वऱ्हाडी शैलीत प्रेमकविता सादर करीत काव्यमैफिलीत एक हास्यकल्लोळ माजविला. प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर यांनी अध्यक्षीय काव्यातून ‘पहिल्यांदा बुलडोझर चालला देहावर, देठ उगवण्याच्या काळात... कोवळ्या पालवीचा चेंदामेंदा सरकार कोणास सांगायचे दु:ख...’ ही रचना सादर करुन वेश्या व्यवसायातील विदार दु:ख मांडल आणि रसिकांना धिरगंभीर केले. काव्यमैफिलीचे बहारदार संचालन करणारे कवी नरेशकुमार बोरीकर यांनी ‘दिवस पावसाचे चिंब चिंब भिजायाचे... ओल्या मातीच्या कुशीत बिजाने रुजायाचे...’ बेकारीच्या वाळवंटात भटकणाऱ्या युवकांमध्ये आशावाद निर्माण करणारी रचना सादर केली अन् रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.काव्यमैफिलीला पाटणचे पोलीस निरीक्षक ठाणेदार सोनवने, सरपंच सुषमा मडावी, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थी प्रशिक्षणार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बी. सी. नगराळे, बापूराव टोंगे, मधुकर कौरासे यांनीही आपल्या रचना सादर करुन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.काव्यमैफिलीच्या यशस्वीतेसाठी आर्या अकाडमीचे संचालक भिमराव पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आभार जाधव यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)