शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता विकासात गटसाधन व्यक्तींची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: May 30, 2014 23:37 IST

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांंंची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांना वारंवार भेटी देऊन शिक्षणात झालेले बदल, नवे विचार, नवे तंत्र शिक्षकापर्यंंत पोहचविण्याकरिता गटसाधन व्यक्तींची

चंद्रपूर : ग्रामीण भागातील प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांंंची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांना वारंवार भेटी देऊन शिक्षणात झालेले बदल, नवे विचार, नवे तंत्र शिक्षकापर्यंंत पोहचविण्याकरिता गटसाधन व्यक्तींची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील गटसाधन व्यक्तींच्या एक दिवसीय कार्यशाळेत डायट कालेज बाबूपेठ येथे घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेला अधिव्याख्याता अपर्णा शंखदरबार, केंद्र प्रमुखांचे प्रतिनिधी रामराव हरडे, शिक्षक प्रतिनिधी विजय खनके, जे.डी. पोटे यांची उपस्थित होते. गटसाधन व्यक्तींनी शाळा भेटीमध्ये इतर अशैक्षणिक बाबीकडे लक्ष देण्यापेक्षा विद्यार्थ्यांंंच्या गुणवत्तेची चाचणी घेऊन त्याबाबत स्वयंस्पष्ट विद्यार्थीनिहाय वेिषनात्मक माहिती शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी व त्याबाबत वारंवार आढावा घेण्याबाबतची माहिती दिली. पुढील सत्रात इयत्ता दुसरी ते चवथीमध्ये शिकणार्‍या व अभ्यासात मागे असणार्‍या विद्यार्थ्यांंंसाठी ६0 दिवसांचा भाषा आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम विकसीत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत चर्चेनंतर गटसाधन व्यक्तींच्या सक्षमीकरणाकरिता नेतृत्व गुणांचा विकास करणे, जीवन कौशल्ये, व्यक्तीमत्त्व विकास, प्रशिक्षणाचे व्यवस्थापन, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम आदी बाबींवर ‘प्रशिक्षण आराखडा’ तयार करण्यात आला. विशेषत: ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांंंची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी अधिव्याख्याता अपर्णा शंखदरबार, केंद्रप्रमुख रामराव हरडे यांनीही शाळा भेटीदरम्यान आलेले अनुभव कथन केले. कार्यशाळेत प्रत्येक तालुक्यातील गट साधन व्यक्ती उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रशांत ठुबे यांनी विशेष सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)