शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

रस्ते झाले; तरच खेड्यांचा विकास !

By admin | Updated: January 9, 2017 00:33 IST

भारत कृषीप्रधान देश आहे. भारतात साडेसहा हजार खेडी आहेत. या खेड्यांचा विकास करावयाचा असेल तर रस्त्याची निर्मिती व्हायला पाहिजे.

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : नागभीड येथे जाहीर सभा; कार्यकर्त्यांसह नागरिकांचीही भरगच्च उपस्थितीघनश्याम नवघडे नागभीडभारत कृषीप्रधान देश आहे. भारतात साडेसहा हजार खेडी आहेत. या खेड्यांचा विकास करावयाचा असेल तर रस्त्याची निर्मिती व्हायला पाहिजे. काँग्रेस शासनाने ७० हजार कोटी रुपयांची विमाने खरेदी केली. पण रस्ते केले नाही. मात्र अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सर्वप्रथम रस्त्याचे काम हाती घेण्यात आले व देशाचा विकास साध्य करण्यात आला, असे विचार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.येथील रेल्वे ग्राऊंडवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते बोलताना पुढे म्हणाले, केंद्र शासनाने देशात अनेक महामार्ग निर्माण करण्याची योजना आखली आहे. या महामार्गात जे जे पूल बांधण्यात येतील, ते पूल पूल वजा बंधारे असतील. या बंधाऱ्यात पाणी साठविले जाईल आणि त्याचे नियोजन करुन ते पाणी शेतीला दिले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना आपसुकच सिंचनाची सोय उपलब्ध होईल. या भागात कुटार, गवळा, तुराट्या मोठ्या प्रमाणावर तयार होतो. यापासून इथेनॉल नावाचे इंधन निर्माण होते. त्याची निर्मिती या भागात करण्याचा आमचा विचार आहे. यातूनही शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी व्यासपिठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार अशोक नेते, विधानपरिषद सदस्य नितेश भांगडिया, माजी मंत्री संजय देवतळे, माजी आमदार अतुल देशकर, प्रदेश भाजपचे संघटक रविंद्र भुसारी, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हरिश शर्मा, जि.प.च्या उपाध्यक्षा कल्पना बोरकर, जि.प. सभापती ईश्वर मेश्राम, चिमूरच्या नगराध्यक्ष शिल्पा राचलवार, भाजप नेते वसंत वारजूकर, भाजपाचे जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, अवेश पठाण, सचिन आकुलवार, गणेश तर्वेकर, जुनेद खान, प्रदीप तर्वेकर यांची उपस्थिती होती. यावेळी गडकरी यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दिगंबर गुरुपुडे, मनोहर देशमुख, मुकुंदा बोरकर, तुकडू गजबे यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. यानंतर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हरिश शर्मा, प्रा. अतुल देशकर, खासदार अशोक नेते, विधानपरिषद सदस्य मितेश भांगडिया यांचे समयोचित भाषणे झाली.मेळाव्याचे आयोजक किर्तीकुमार भांगडिया यांचेही मुख्य मार्गदर्शन झाले. ते म्हणाले, चिमूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी ना. नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली. शिवनाल्याच्या रुपाने नागभीड तालुक्यातील ४२ गावांच्या सिंचनाचा प्रश्न निकालात निघणार आहे. उमरेड-नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गासाठी ना. गडकरी यांनीच पुढाकार घेवून महामार्गाचा प्रश्न निकाली काढला. संचालन रेणूका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन संजय गजपुरे यांनी केले. कार्यक्रमात नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, चिमूर, सावली व जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.सर्वच मंत्र्यांची दांडीकार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुडे येणार असे जाहीर करण्यात आले होते. पण यापैकी कोणीच आले नाही.नागर देऊन सत्कारकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नावाचा अनेकदा उल्लेख केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचेही नाव कार्यक्रमादरम्यान चर्चेत राहिले. कार्यक्रम स्थळी भाजपाच्या वतीने नितीन गडकरी यांचा नागर देवून सत्कार करण्यात आला. पाथोडे- निनावे यांची आठवणया भागात भाजपला सामान्य जनतेपर्यंत पोहविण्यात मोठे कष्ट उपसलेले या भागातील भाजपचे जनक दिवंगत वासुदेवराव पाथोडे, स्व. आेंकार निनावे व काशिनाथ येरणे यांच्या नावाचा ना. गडकरी यांनी प्रारंभीच उल्लेख केला.