शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते झाले; तरच खेड्यांचा विकास !

By admin | Updated: January 9, 2017 00:33 IST

भारत कृषीप्रधान देश आहे. भारतात साडेसहा हजार खेडी आहेत. या खेड्यांचा विकास करावयाचा असेल तर रस्त्याची निर्मिती व्हायला पाहिजे.

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : नागभीड येथे जाहीर सभा; कार्यकर्त्यांसह नागरिकांचीही भरगच्च उपस्थितीघनश्याम नवघडे नागभीडभारत कृषीप्रधान देश आहे. भारतात साडेसहा हजार खेडी आहेत. या खेड्यांचा विकास करावयाचा असेल तर रस्त्याची निर्मिती व्हायला पाहिजे. काँग्रेस शासनाने ७० हजार कोटी रुपयांची विमाने खरेदी केली. पण रस्ते केले नाही. मात्र अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सर्वप्रथम रस्त्याचे काम हाती घेण्यात आले व देशाचा विकास साध्य करण्यात आला, असे विचार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.येथील रेल्वे ग्राऊंडवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते बोलताना पुढे म्हणाले, केंद्र शासनाने देशात अनेक महामार्ग निर्माण करण्याची योजना आखली आहे. या महामार्गात जे जे पूल बांधण्यात येतील, ते पूल पूल वजा बंधारे असतील. या बंधाऱ्यात पाणी साठविले जाईल आणि त्याचे नियोजन करुन ते पाणी शेतीला दिले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना आपसुकच सिंचनाची सोय उपलब्ध होईल. या भागात कुटार, गवळा, तुराट्या मोठ्या प्रमाणावर तयार होतो. यापासून इथेनॉल नावाचे इंधन निर्माण होते. त्याची निर्मिती या भागात करण्याचा आमचा विचार आहे. यातूनही शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी व्यासपिठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार अशोक नेते, विधानपरिषद सदस्य नितेश भांगडिया, माजी मंत्री संजय देवतळे, माजी आमदार अतुल देशकर, प्रदेश भाजपचे संघटक रविंद्र भुसारी, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हरिश शर्मा, जि.प.च्या उपाध्यक्षा कल्पना बोरकर, जि.प. सभापती ईश्वर मेश्राम, चिमूरच्या नगराध्यक्ष शिल्पा राचलवार, भाजप नेते वसंत वारजूकर, भाजपाचे जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, अवेश पठाण, सचिन आकुलवार, गणेश तर्वेकर, जुनेद खान, प्रदीप तर्वेकर यांची उपस्थिती होती. यावेळी गडकरी यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दिगंबर गुरुपुडे, मनोहर देशमुख, मुकुंदा बोरकर, तुकडू गजबे यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. यानंतर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हरिश शर्मा, प्रा. अतुल देशकर, खासदार अशोक नेते, विधानपरिषद सदस्य मितेश भांगडिया यांचे समयोचित भाषणे झाली.मेळाव्याचे आयोजक किर्तीकुमार भांगडिया यांचेही मुख्य मार्गदर्शन झाले. ते म्हणाले, चिमूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी ना. नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली. शिवनाल्याच्या रुपाने नागभीड तालुक्यातील ४२ गावांच्या सिंचनाचा प्रश्न निकालात निघणार आहे. उमरेड-नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गासाठी ना. गडकरी यांनीच पुढाकार घेवून महामार्गाचा प्रश्न निकाली काढला. संचालन रेणूका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन संजय गजपुरे यांनी केले. कार्यक्रमात नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, चिमूर, सावली व जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.सर्वच मंत्र्यांची दांडीकार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुडे येणार असे जाहीर करण्यात आले होते. पण यापैकी कोणीच आले नाही.नागर देऊन सत्कारकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नावाचा अनेकदा उल्लेख केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचेही नाव कार्यक्रमादरम्यान चर्चेत राहिले. कार्यक्रम स्थळी भाजपाच्या वतीने नितीन गडकरी यांचा नागर देवून सत्कार करण्यात आला. पाथोडे- निनावे यांची आठवणया भागात भाजपला सामान्य जनतेपर्यंत पोहविण्यात मोठे कष्ट उपसलेले या भागातील भाजपचे जनक दिवंगत वासुदेवराव पाथोडे, स्व. आेंकार निनावे व काशिनाथ येरणे यांच्या नावाचा ना. गडकरी यांनी प्रारंभीच उल्लेख केला.