शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

रस्ते व नाल्यांची सर्वत्र बोंब

By admin | Updated: January 23, 2015 00:34 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने ‘लोकमत जागर’ अभियान सुरू केले आहे.

रवी जवळे  चंद्रपूरचंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने ‘लोकमत जागर’ अभियान सुरू केले आहे. या अभियानादरम्यान चंद्रपूर शहरातील नाल्यांची नियोजन अतिशय दुबळे असल्याचेच बहुतांश प्रभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. गौर तलाव प्रभाग मनपा हद्दीच्या शेवटच्या टोकावर वसले आहे. पूर्वी या परिसरात तलाव होता, त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या अधिक आहे. गौरी तलाव प्रभागात रस्ते आणि नाल्यांच्या समस्यांसोबतच अतिक्रमणाची समस्याही मोठी आहे. कचराकुंड्यांचा अभाव असल्याने घाणीचे साम्राज्यही दिसून येते.‘लोकमत’ चमूने गौरी तलाव प्रभागाचा फेरफटका मारला असता या प्रभागात अनेक समस्या दिसून आल्या. या प्रभागात अनेक ठिकाणी रस्ते उखडलेले दिसून आले. नालीचे बांधकाम काही ठिकाणीच झाले आहे. काही ठिकाणी तर नाल्याच नाही. ज्या ठिकाणी नालीचे बांधकाम केले आहे, तेथील नाल्या आता मोडकडीस आल्या आहेत. नालीचे दगड निघून काठ नालीत खचलेले आहे. सर्वपल्ली राधाकृष्ण चौक परिसरात रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या परिसरात पार्र्कींगची सोय नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा वाहतुकीची कोंडीही होत असल्याचे नागरिक सांगतात. गौरी तलाव प्रभागातील गाडगेबाबा चौकात रस्त्याचे बांधकाम अजूनही झाले नसल्याचे दिसून आले. या परिसरातील सर्व रस्ते उखडलेले आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्याच्या नावाखाली छोटीशी गल्लीच आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीसारखी दुर्घटना घडली तर अग्निशमन वाहन जाणेही कठीण आहे. गाडगेबाबा चौकापासून जाणाऱ्या एका रस्त्यावर छोटेखानी पूल बांधला आहे. या पुलाला दोन भगदाड पडले आहेत. त्यामुळे येथे वाहने फसून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या सुमारास तर नवखा पादचारीही या ठिकाणी भगदाडाचा अंदाज न आल्याने पडू शकतो. याच रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आहे. त्यामुळे कुठलेही चारचाकी वाहन या रस्त्यावरून जाऊ शकत नाही. सदर विद्युत खांब रस्त्यावरून हटविण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन गेली आहे. मात्र ती चक्क नालीतून टाकण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी पाईप लाईनचे असे नियोजन करणाऱ्यांचा केवळ संताप येतो. एखाद्यावेळी पाईपलाईन लिकेज झाली तर नागरिकांना दूषित पाणी मिळून त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याच प्रभागातील बाबानगर परिसराचीदेखील अशीच अवस्था आहे. या ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम बहुदा नगरपालिका असतानाच केले असावे. नाल्याही जुन्याच आहे. त्यामुळे तेव्हा बांधलेले रस्ते आता पूर्णत: उखडले आहे. नाल्याही खचून रस्ताच नालीत गेल्याचा भास होतो. विशेष म्हणजे बाबानगर परिसरात कुचराकुंड्या कुठेच दिसल्या नाही. त्यामुळे रस्त्यावर वा मोकळ्या जागेत कचरा पडलेला दिसून आला. मोटघरे प्लॉट नावाची नवीन वस्ती तयार होत आहे. या ठिकाणी काही भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले आहे. मात्र काही भागातील लोकांना जाण्यायेण्याचा रस्ताच नाही. त्यांना वाहने अलिकडच्या रस्त्यावर ठेवून एका छोट्या गल्लीतून घर गाठावे लागते. याबाबत नागरिकांनी नगरसेविका लता साव यांना त्या ठिकाणी नेऊन या समस्येबाबत सांगितले. मात्र अजूनही नागरिकांना रस्ता मिळालेला नाही.