शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते व नाल्यांची सर्वत्र बोंब

By admin | Updated: January 23, 2015 00:34 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने ‘लोकमत जागर’ अभियान सुरू केले आहे.

रवी जवळे  चंद्रपूरचंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने ‘लोकमत जागर’ अभियान सुरू केले आहे. या अभियानादरम्यान चंद्रपूर शहरातील नाल्यांची नियोजन अतिशय दुबळे असल्याचेच बहुतांश प्रभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. गौर तलाव प्रभाग मनपा हद्दीच्या शेवटच्या टोकावर वसले आहे. पूर्वी या परिसरात तलाव होता, त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या अधिक आहे. गौरी तलाव प्रभागात रस्ते आणि नाल्यांच्या समस्यांसोबतच अतिक्रमणाची समस्याही मोठी आहे. कचराकुंड्यांचा अभाव असल्याने घाणीचे साम्राज्यही दिसून येते.‘लोकमत’ चमूने गौरी तलाव प्रभागाचा फेरफटका मारला असता या प्रभागात अनेक समस्या दिसून आल्या. या प्रभागात अनेक ठिकाणी रस्ते उखडलेले दिसून आले. नालीचे बांधकाम काही ठिकाणीच झाले आहे. काही ठिकाणी तर नाल्याच नाही. ज्या ठिकाणी नालीचे बांधकाम केले आहे, तेथील नाल्या आता मोडकडीस आल्या आहेत. नालीचे दगड निघून काठ नालीत खचलेले आहे. सर्वपल्ली राधाकृष्ण चौक परिसरात रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या परिसरात पार्र्कींगची सोय नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा वाहतुकीची कोंडीही होत असल्याचे नागरिक सांगतात. गौरी तलाव प्रभागातील गाडगेबाबा चौकात रस्त्याचे बांधकाम अजूनही झाले नसल्याचे दिसून आले. या परिसरातील सर्व रस्ते उखडलेले आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्याच्या नावाखाली छोटीशी गल्लीच आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीसारखी दुर्घटना घडली तर अग्निशमन वाहन जाणेही कठीण आहे. गाडगेबाबा चौकापासून जाणाऱ्या एका रस्त्यावर छोटेखानी पूल बांधला आहे. या पुलाला दोन भगदाड पडले आहेत. त्यामुळे येथे वाहने फसून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या सुमारास तर नवखा पादचारीही या ठिकाणी भगदाडाचा अंदाज न आल्याने पडू शकतो. याच रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आहे. त्यामुळे कुठलेही चारचाकी वाहन या रस्त्यावरून जाऊ शकत नाही. सदर विद्युत खांब रस्त्यावरून हटविण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन गेली आहे. मात्र ती चक्क नालीतून टाकण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी पाईप लाईनचे असे नियोजन करणाऱ्यांचा केवळ संताप येतो. एखाद्यावेळी पाईपलाईन लिकेज झाली तर नागरिकांना दूषित पाणी मिळून त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याच प्रभागातील बाबानगर परिसराचीदेखील अशीच अवस्था आहे. या ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम बहुदा नगरपालिका असतानाच केले असावे. नाल्याही जुन्याच आहे. त्यामुळे तेव्हा बांधलेले रस्ते आता पूर्णत: उखडले आहे. नाल्याही खचून रस्ताच नालीत गेल्याचा भास होतो. विशेष म्हणजे बाबानगर परिसरात कुचराकुंड्या कुठेच दिसल्या नाही. त्यामुळे रस्त्यावर वा मोकळ्या जागेत कचरा पडलेला दिसून आला. मोटघरे प्लॉट नावाची नवीन वस्ती तयार होत आहे. या ठिकाणी काही भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले आहे. मात्र काही भागातील लोकांना जाण्यायेण्याचा रस्ताच नाही. त्यांना वाहने अलिकडच्या रस्त्यावर ठेवून एका छोट्या गल्लीतून घर गाठावे लागते. याबाबत नागरिकांनी नगरसेविका लता साव यांना त्या ठिकाणी नेऊन या समस्येबाबत सांगितले. मात्र अजूनही नागरिकांना रस्ता मिळालेला नाही.