शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते व नाल्यांची सर्वत्र बोंब

By admin | Updated: January 23, 2015 00:34 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने ‘लोकमत जागर’ अभियान सुरू केले आहे.

रवी जवळे  चंद्रपूरचंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने ‘लोकमत जागर’ अभियान सुरू केले आहे. या अभियानादरम्यान चंद्रपूर शहरातील नाल्यांची नियोजन अतिशय दुबळे असल्याचेच बहुतांश प्रभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. गौर तलाव प्रभाग मनपा हद्दीच्या शेवटच्या टोकावर वसले आहे. पूर्वी या परिसरात तलाव होता, त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या अधिक आहे. गौरी तलाव प्रभागात रस्ते आणि नाल्यांच्या समस्यांसोबतच अतिक्रमणाची समस्याही मोठी आहे. कचराकुंड्यांचा अभाव असल्याने घाणीचे साम्राज्यही दिसून येते.‘लोकमत’ चमूने गौरी तलाव प्रभागाचा फेरफटका मारला असता या प्रभागात अनेक समस्या दिसून आल्या. या प्रभागात अनेक ठिकाणी रस्ते उखडलेले दिसून आले. नालीचे बांधकाम काही ठिकाणीच झाले आहे. काही ठिकाणी तर नाल्याच नाही. ज्या ठिकाणी नालीचे बांधकाम केले आहे, तेथील नाल्या आता मोडकडीस आल्या आहेत. नालीचे दगड निघून काठ नालीत खचलेले आहे. सर्वपल्ली राधाकृष्ण चौक परिसरात रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या परिसरात पार्र्कींगची सोय नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा वाहतुकीची कोंडीही होत असल्याचे नागरिक सांगतात. गौरी तलाव प्रभागातील गाडगेबाबा चौकात रस्त्याचे बांधकाम अजूनही झाले नसल्याचे दिसून आले. या परिसरातील सर्व रस्ते उखडलेले आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्याच्या नावाखाली छोटीशी गल्लीच आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीसारखी दुर्घटना घडली तर अग्निशमन वाहन जाणेही कठीण आहे. गाडगेबाबा चौकापासून जाणाऱ्या एका रस्त्यावर छोटेखानी पूल बांधला आहे. या पुलाला दोन भगदाड पडले आहेत. त्यामुळे येथे वाहने फसून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या सुमारास तर नवखा पादचारीही या ठिकाणी भगदाडाचा अंदाज न आल्याने पडू शकतो. याच रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आहे. त्यामुळे कुठलेही चारचाकी वाहन या रस्त्यावरून जाऊ शकत नाही. सदर विद्युत खांब रस्त्यावरून हटविण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन गेली आहे. मात्र ती चक्क नालीतून टाकण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी पाईप लाईनचे असे नियोजन करणाऱ्यांचा केवळ संताप येतो. एखाद्यावेळी पाईपलाईन लिकेज झाली तर नागरिकांना दूषित पाणी मिळून त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याच प्रभागातील बाबानगर परिसराचीदेखील अशीच अवस्था आहे. या ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम बहुदा नगरपालिका असतानाच केले असावे. नाल्याही जुन्याच आहे. त्यामुळे तेव्हा बांधलेले रस्ते आता पूर्णत: उखडले आहे. नाल्याही खचून रस्ताच नालीत गेल्याचा भास होतो. विशेष म्हणजे बाबानगर परिसरात कुचराकुंड्या कुठेच दिसल्या नाही. त्यामुळे रस्त्यावर वा मोकळ्या जागेत कचरा पडलेला दिसून आला. मोटघरे प्लॉट नावाची नवीन वस्ती तयार होत आहे. या ठिकाणी काही भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले आहे. मात्र काही भागातील लोकांना जाण्यायेण्याचा रस्ताच नाही. त्यांना वाहने अलिकडच्या रस्त्यावर ठेवून एका छोट्या गल्लीतून घर गाठावे लागते. याबाबत नागरिकांनी नगरसेविका लता साव यांना त्या ठिकाणी नेऊन या समस्येबाबत सांगितले. मात्र अजूनही नागरिकांना रस्ता मिळालेला नाही.