शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

अतिवष्टीमुळे चांगल्या पाणंद रस्त्यांची झाली ऐशीतैशी; शेतात जाण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:30 IST

Chandrapur : अतिवृष्टीमुळे काही रस्ते वाहून गेले तर काही रस्ते पूर्णतः उखडल्याने या रस्त्याने वाहतूक बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेत पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरिता आवश्यक साधनांची ने-आण करण्याकरिता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात. अशा यंत्र सामग्रीची वाहतूक करण्याकरिता पावसाळ्यातही शेत पाणंद रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे. मात्र, जुलै महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे या पाणंद रस्त्यांची दैना झाली आहे.

शासनाने बळीराजा व मातोश्री पाणंद योजनेंतर्गत मूल तालुक्यात कोटी रुपये खर्चुन तीन महिन्यांपूर्वी पाणंद रस्त्यांचे खडीकरणाचे काम केले. मात्र तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही रस्ते वाहून गेले तर काही रस्ते पूर्णतः उखडल्याने या रस्त्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने पाणंद रस्ते दुरुस्तीसाठी शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतीमधील दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे. शेतमाल बाजारात पोहोचविण्याकरिता तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही पाणंद रस्त्यांची गरज आहे. असे शेतरस्ते हे रस्ता योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्रोतांमधून निधीच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत होत्या. 

यावर मात करून शेतकऱ्यांना शेतात वाहतुकीयोग्य रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी शासनाने विविध योजनांच्या अभिसरणामधून शेत पाणंद रस्ते योजना राबविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. मूल तालुक्यात बळीराजा समृद्धी मार्ग शेत पाणंद रस्ते अंतर्गत चिमडा, येरगाव, टेकाडी, मारोडा व केळझर येथे जवळपास २ कोटी २० लाख रुपये तर मातोश्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत उश्राळा, उश्राळाचक, चकदुगाळा, नांदगाव येथील पाणंद रस्त्यांच्या खडीकरणासाठी जवळपास १ कोटी ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले. या पाणंद रस्त्यांचे खडीकरण झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे सोयीस्कर झाले होते.

रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करामागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही पाणंद रस्ते वाहून गेले तर काही रस्ते पूर्णतः उखडल्याने या रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात चिखल करण्यासाठी ट्रॅक्टर, खते व शेतीपयोगी साहित्य नेण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने या पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

"मातोश्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत खडीकरणाचे काम करण्यात आले होते. त्यामुळे पाणंद रस्त्याने शेतात ये-जा करणे सुलभ झाले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने त्यावरून वाहतूक बंद झाली आहे. शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करून द्यावी."- विनोद जीवतोडे, शेतकरी, उश्राळा. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाchandrapur-acचंद्रपूर