शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

रस्त्याचे बांधकाम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:53 PM

येथील नगर परिषदेच्या रस्त्यांचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवाहनचालकांना अडचण : कंत्राटदारावर कुणाचे नियंत्रणच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : येथील नगर परिषदेच्या रस्त्यांचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.ग्रामपंचायतीच्या काळात बनविण्यात आलेल्या नागभीडच्या रस्त्यांची एकंदर स्थिती लक्षात घेऊन या रस्त्यांचे पुनरूज्जीवन करण्यात यावे, अशी मागणी होत होती. दरम्यान नगर परिषदची स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच लोकनियुक्त कार्यकारी मंडळांनी रस्ते आणि नालीच्या कामास प्राधान्य देऊन ही कामे प्रस्तावित करीत शासनाकडून निधी आणला. मात्र बºयाच कालावधीनंतर पहिल्या टप्प्यात नाल्यांचे काम करण्यात आले. त्यानंतर रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. याला तीन महिन्यांचा कालावधी लोटत आहे. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्त्यांची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. परिणामी नागभीडच्या रस्त्यांनी ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच या रस्त्यावरून जड वाहणांची ये-जा सुरू असल्याने रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत अनेकदा तक्रारही करणयात आली आहे. मात्र संबंधित अधिकारी व जनप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.या रस्त्यांचे केले खोदकामनागभीडमध्ये रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी अनेक रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामध्ये जनता शाळेपासून वस्तीत जाणारा रस्ता, टाकीज चौकातून मानी मोहल्यात जाणारा रस्ता, राम मंदिराकडून गोरोबा चौकात जाणारा रस्ता यासह अन्य रस्त्यांची हिच अवस्था आहे. अर्धवट कामामुळे लहान-लहान अपघातही घडल्याची माहिती आहे.माध्यमांनी घेतली दखलरेंगाळत असलेल्या या रस्त्याच्या कामाबाबत आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत येथील माध्यमांनी वारंवार आवाज उठवला. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.