शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

रस्त्याचे बांधकाम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:56 IST

येथील नगर परिषदेच्या रस्त्यांचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवाहनचालकांना अडचण : कंत्राटदारावर कुणाचे नियंत्रणच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : येथील नगर परिषदेच्या रस्त्यांचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.ग्रामपंचायतीच्या काळात बनविण्यात आलेल्या नागभीडच्या रस्त्यांची एकंदर स्थिती लक्षात घेऊन या रस्त्यांचे पुनरूज्जीवन करण्यात यावे, अशी मागणी होत होती. दरम्यान नगर परिषदची स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच लोकनियुक्त कार्यकारी मंडळांनी रस्ते आणि नालीच्या कामास प्राधान्य देऊन ही कामे प्रस्तावित करीत शासनाकडून निधी आणला. मात्र बºयाच कालावधीनंतर पहिल्या टप्प्यात नाल्यांचे काम करण्यात आले. त्यानंतर रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. याला तीन महिन्यांचा कालावधी लोटत आहे. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्त्यांची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. परिणामी नागभीडच्या रस्त्यांनी ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच या रस्त्यावरून जड वाहणांची ये-जा सुरू असल्याने रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत अनेकदा तक्रारही करणयात आली आहे. मात्र संबंधित अधिकारी व जनप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.या रस्त्यांचे केले खोदकामनागभीडमध्ये रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी अनेक रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामध्ये जनता शाळेपासून वस्तीत जाणारा रस्ता, टाकीज चौकातून मानी मोहल्यात जाणारा रस्ता, राम मंदिराकडून गोरोबा चौकात जाणारा रस्ता यासह अन्य रस्त्यांची हिच अवस्था आहे. अर्धवट कामामुळे लहान-लहान अपघातही घडल्याची माहिती आहे.माध्यमांनी घेतली दखलरेंगाळत असलेल्या या रस्त्याच्या कामाबाबत आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत येथील माध्यमांनी वारंवार आवाज उठवला. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.