शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रस्ता बांधकामाची चौकशी

By admin | Updated: March 20, 2017 00:39 IST

भटाळा- आसाळा व खेमजई या गावादरम्यान महिनाभरापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले.

काम निकृष्ट : पालकमंत्र्यांनी घेतली दखलचंद्रपूर : भटाळा- आसाळा व खेमजई या गावादरम्यान महिनाभरापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले. या कामात डांबराचे प्रमाण अत्यल्प वापरल्याने रस्त्याची गिट्टी आताच निघायला सुरुवात झाली. या संदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी याची दखल घेत, रस्त्याच्या चौकशीसाठी मुंबई येथून पथक पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. वरोरा तालुक्यातील भटाळा- आसाळा व खेमजई येथील गावादरम्यान अंदाजे पाच किमीचे डांबरीकरण हिंगणघाट येथील संदीप कन्स्ट्रक्शन कंपनीने केले.या रस्त्याच्या डांबरीकरण व साईडपट्ट्यांच्या पुनर्रभरणासाठी ४० ते ४५ लाखांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंजूर करण्यात आला. या रस्त्याच्या बांधकामामध्ये कंत्राटदाराने डांबरचे प्रमाण अत्यल्प वापरल्याने रस्ता महिन्याभरातच दबायला लागला असून, उखडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग वरोराचे संबंधित कनिष्ठ अभियंत्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. या संदर्भात ओरड झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची सायंकाळी ७ वाजता येऊन मोबाईलच्या प्रकाशात थातूरमातूर चौकशी करुन अहवाल चौकशीसाठी नेले. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी याची दखल घेत या अधिवेशनातून हा मुद्दा उपस्थित करुन रस्त्याची चौकशी करण्यासाठी मुंबई येथून चमू पाठविण्यात येईल व यात दोषी अभियंता व संबंधित कंत्राटदारावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)