शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

रस्ते बांधकामात मोठ्याप्रमाणात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:16 IST

जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला तालुका विकासापासून वंचित असताना ढिसाळ राजकारण आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विकासकामांवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे निकृष्ट रस्ते बांधकामातून पुढे आले आहे.

ठळक मुद्देविभागाचे दुर्लक्ष : कंत्राटदारांना रान मोकळे

ऑनलाईन लोकमतगोंडपिपरी : जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला तालुका विकासापासून वंचित असताना ढिसाळ राजकारण आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विकासकामांवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे निकृष्ट रस्ते बांधकामातून पुढे आले आहे. नियम डावलून बांधकाम केले जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तालुक्यात अनेक गावांमध्ये रस्ते बांधकाम सुरू आहे. मात्र, निकष डावलल्याने गुणवत्ता घसरली. सा. बां. विभागाचे अधिकारी व अभियंता विकास कामांकडे पाठ फिरवित आहे. ज्या गावांत कामे सुरू आहेत, तिथे दौरे न करताना केवळ कंत्राटदारांवर भरोसा ठेवून आहेत.राज्याचे वित्त नियोजन, अर्थ व वनमंत्री ना. मुनगंटीवार यांनी शहविकासाचा दृरदृष्टीकोन ठेवून येथील नगरपंचायतील १० कोटींचा विकास निधी दिली. सदर विकास निधी अंतर्गत शहरात रस्ते, नाल्या बांधकाम जोमात सुरु आहे. प्रथमताच या शहराला एवढा भरगच्च निधी मिळाल्याने नागरिकांमध्येही समाधान व्यक्त केल्या जात होते.मात्र सदर निधी सा.बां. विभागाकडे वळते झाल्याने शहरातील निर्माण झालेले अनेक सिमेंट रस्ते अंदाजपत्रकानुसार नसून प्रत्यक्ष कामांवर उपस्थित न राहणाऱ्याअभियंत्यांनी कंत्राटदारांशी साटेलोटे करुन थातूरमातूर केले़ परिणामी, काही दिवसांपूर्वी नगरसेवकांनी चौकशीची मागणी केली होती. मात्र, वरिष्ठांनी दखल घेतली नाही़ वरिष्ठांचा तपासणी दौरा सुरू होणार असल्याचे पाहून मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. शहरातील मुख्य मार्ग व इतर मार्गावर खड्डे जैसे-थे असल्याचे दिसून येत आहे़ शासकीय इमारतीचे देखभाल व दुरुस्ती काम करीत असताना प्रशासकीय तांत्रिक मंजूरी आणि करारनाम्यातील अटींचे पालन केले जात नाही़ या प्रशासकीय बाबी रितसर पूर्ण करण्याअगोदरच मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटपाचा प्रतापही तालुक्यात घडला आहे़गोंडपिपरी ते धाबा मार्गावर अनेक खड्डे आहेत़ गोंडपिपरी ते वढोली कोठारी, गोंडपिपरी ते मूल मार्गाचीही स्थिती वाईट आहे़ या मार्गावर सातत्याने डागडुजीची कामे करून कोट्यवधी रुपयांची देयके उचलली जात आहे़ तालुक्यातील विविध रस्त्यांची डागडुजी, खडीकरण डांबरीकरण कामांवर या विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला़ ही कामे सुरू असताना संबंधित अधिकाºयांनी घटनास्थळाची पाहणीदेखील केली नाही़ यावरून रस्ते बांधकाम निष्कृष्ट झाल्याचे बोलले जात आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़तरच खरा विकासतालुक्याच्या विकासासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे़ यातून अनेक गावांमध्ये कामे सुरू आहेत़ मात्र, नियमांचे उल्लंघन न करता ही कामे पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांनी केली़ काही लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे कानाडोळा करीत असले तरी नियमाधिन कामांतूनच तालुक्याचा विकास होईल़