शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अशे गतिरोधक अपघाताला आमंत्रण देणारेच ! वाहतूकदारांना गतिरोधकाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:26 IST

मापदंडाचा अभाव : सूचनाफलकही नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील वनसडी-पवनी प्रमुख जिल्हा महामार्ग क्रमांक १५ वरील नारंडा येथे तीन ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आले आहे. परंतु, या गतिरोधकाला मापदंड नसल्याने उलट अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. 

सदर तयार करण्यात आलेले गतिरोधक काही ठिकाणी पूर्णतः दबले गेले आहेत. त्या स्थानी वाहनातील कोळसा, रेती सांडली गेली आहे. त्यामुळे घसरण तयार झाली आहे. गतिरोधकावर रंगरंगोटी, रेडियम पट्टया तसेच सूचना फलक लावण्यात आले नाही. त्याचा फटका वाहतूकदारांना प्रवासात बसतो आहे. रात्रीच्या वेळेस हे गतिरोधक दिसून येत नाहीत. 

शिवाय याच मार्गादरम्यान झुडपी जंगल असल्याने जंगली जनावरांचा वावर असतो. त्यामुळे जरा जपूनच वाहने चालवावी लागत आहेत. परंतु, नवीन व्यक्तींना नव्याने टाकण्यात आलेल्या गतिरोधक व वन्यप्राणी भ्रमण मार्गाबद्दलची माहितीच नसल्याने किरकोळ अपघात वाढले आहेत. नारंडा येथील वनसडी रस्त्यावरील कॉर्नर, शिवनारंडा जवळील कॉर्नर, दालमिया चौपाटी येथे सदर गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. त्याचा योग्य फायदा होण्यासाठी सदोष करण्याची गरज आहे. या दृष्टीने बांधकाम विभाग अभियंत्याने विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

तेथे दिशादर्शक फलक कधी लागणारवनसडी ते पवनीदरम्यान अनेक ठिकाणी भव्य दिशादर्शक, किलोमीटर अंतर फलक, अन्य दिशादर्शक फलक लावण्यात आले. परंतु सांगोडा येथील चौपाटीवरील दिशादर्शक फलकामध्ये गावाच्या नावात इंग्रजीत बरोबर असला तरी मराठी अक्षरात बदल झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी नसलेली गावे कुठून आली असा प्रश्न वाहतूकदारांना पडतो. शिवाय होमिओपॅथी दवाखाना कॉर्नर जवळील भव्य फलक मुख्य रस्त्यापासून खूप लांब लावण्यात आले आहे. त्यामुळे गावाच्या दिशादर्शनाचे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे भोयगाव गडचांदूर मार्गावरच एक गावाचे दिशादर्शक फलक लावण्यात यावे. तसेच अशाच प्रकारे इरई फाटा, गाडेगाव येथील खैरगाव आवरपूर जोडरस्ता, गाडेगाव फाटा, शिवनारंडा येथे दिशादर्शक व गाव नावफलक लावणे आवश्यक आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक