शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

कन्हान, वैनगंगा, प्राणहिता नद्यांचे होणार पुनरूज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 14:25 IST

व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य अथवा कॉरिडॉर परिसरातून वाहणाऱ्या नद्यांच्या दोन्ही बाजूला २ किमी अंतरावर असलेल्या किनारपट्टी भागातील वृक्षतोड करण्यास वन विभागाला मनाई करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल अंतर्गत गठित रिजनल एम्पॉवरमेंट कमिटीने (आरईसी) दिले.

ठळक मुद्देकाठावरील वृक्ष तोडण्यास मनाई रिजनल एम्पॉवरमेंट कमिटीचे वन विभागाला निर्देश

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य अथवा कॉरिडॉर परिसरातून वाहणाऱ्या नद्यांच्या दोन्ही बाजूला २ किमी अंतरावर असलेल्या किनारपट्टी भागातील वृक्षतोड करण्यास वन विभागाला मनाई करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल अंतर्गत गठित रिजनल एम्पॉवरमेंट कमिटीने (आरईसी) दिले. या निदेर्शांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास विनाशाच्या गर्तेत सापडलेल्या कन्हान, वैनगंगा व प्राणहिता नद्यांच्या पुनरूज्जीवनाला चालना मिळू शकते. सदर समितीने फॉरेस्ट सर्वे आॅफ इंडियाकडून नद्यांचे सर्वेक्षण करण्याचे सूचविले होते. सर्वेक्षणातील निष्कषार्नुसारच या समितीने हा निर्णय घेतला आहे.वनविभागाकडून दरवर्षी नियोजन आराखड्यानुसार त्यांच्या अधिकार कक्षेत येणाºया वृक्षांची कटाई केली जाते. यामध्ये नदी व नाल्याच्या किनाºयावर असलेल्या वृक्षांचीही कटाई होत असल्याने नद्यांच्या पाणी टिकवून ठेवण्याच्या नैसर्गिक क्षमतेवर अनिष्ट परिणाम होत आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या वार्षिक नियोजनातील आराखड्यात तरतूद नसतानाही पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांची म्हणजे ट्री फिलिंग वृक्षांची कटाई केल्याने नद्यांची एकूणच वहन क्षमता नष्ट होऊ लागली आहे. नद्या व नाल्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होऊनही वन विभागाने वार्षिक आराखड्यात बदल केला नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या रिजनल एम्पॉवरमेंट कमिटीने वृक्षतोडीमुळे बाधित झालेल्या महाराष्ट्रातील नद्यांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी फॉरेस्ट सर्वे आॅफ इंडियाकडे सोपविली होती. या सर्वोच्च संस्थेने काही महिन्यांपूर्वीच सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून सदर अहवाल समितीकडे सुपुर्त केला. या अहवालानुसार राज्यातील १६ नद्यांच्या संवर्धनासाठी दोन्ही बाजूने दोन किमी व नाल्याच्या दोन्ही बाजूने ५०० मिटर अंतरावरील वृक्षतोड करण्यास (ट्री फिलिंग) वन विभागाला मनाई केली आहे. त्यामुळे नदी- नाल्यांच्या पुनरूज्जीवनाला यापुढे चालना मिळू शकते.रेल्वे व महामार्गावर अंडरपासेस अनिवार्यव्याघ्र प्रकल्प, अभयारण्य व कॉरिडॉर परिसरातून जाणारा रेल्वेमार्ग व महामार्गावर अंडरपासेस नसल्याने वन्य प्राण्यांचा बळी जाण्याच्या घटना सतत वाढत आहेत. परंतू, यावर पर्याय काढण्यात आला नाही. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी रिजनल एम्पॉवरमेंट कमिटीने रेल्वे व महामार्गावर अंडरपासेस तयार करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले.नद्यांच्या पुनरूज्जीवनाकडे दुर्लक्ष करून दरवर्षी सरसकट वृक्षतोड केली जाते. यातून नदी व नाल्यांवर विघातक परिणाम होत आहेत. याला कायमचा प्रतिबंध घालण्यासाठी आरईसीने कठोर भूमिका घेतली. नागपुरात एक महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत वृक्षतोडीला मनाई करण्याचा निर्णय झाला. याशिवाय लॅण्डबँक तयार करणे व खासगी विकासकांना वनजमिनी देताना रोपवाटीका विकसित करण्याचे प्रस्ताव समितीकडे विचाराधीन आहेत.- प्रा. सुरेश चोपणे, सदस्य रिजनल एम्पॉवरमेंट कमिटी, दिल्ली

टॅग्स :riverनदी