शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरचे वाढते किमान तापमान धडकी भरविणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:27 IST

उन्हाळ्यातील उष्णता आणि चंद्रपूर शहर या दोघांचा अतूट संबंध आहे. उन्हाळ्यात सूर्य चंद्रपूर शहराच्या माथ्यावर असतो की काय, असाच तापमानाचा अंगारा असतो. एप्रिल महिन्यात पारा ४६.५ अंशापार गेला आहे. अद्याप ‘मे हीट’चा सामना व्हायचा आहे.

ठळक मुद्देकिमान पाराही ३० अंशापार । उन्हाळ्यातील रात्रीचा गारवाही चंद्रपूरकरांच्या नशिबी नाही

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळ्यातील उष्णता आणि चंद्रपूर शहर या दोघांचा अतूट संबंध आहे. उन्हाळ्यात सूर्य चंद्रपूर शहराच्या माथ्यावर असतो की काय, असाच तापमानाचा अंगारा असतो. एप्रिल महिन्यात पारा ४६.५ अंशापार गेला आहे. अद्याप ‘मे हीट’चा सामना व्हायचा आहे. मात्र गंभीर व चिंतन करायला लावणारी बाब वेगळीच आहे. ती म्हणजे चंद्रपूरचे वाढते किमान तापमान. दिवसभर उन्हाचे चटके सोसल्यानंतरही चंद्रपूरकरांना रात्री उष्ण झळांचा सामना करावा लागत आहे. राज्यातील इतर शहराच्या तुलनेत चंद्रपूरचे रात्रीचे तापमान अधिक नोंदविले जात आहे. आताच ते ३० अंशापार गेले आहे. याबाबत गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे.मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकरांवर सूर्य कोपल्याचे दिसून येत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या आठवड्यात मंगळवारी ४३.४ अंश सेल्सिअस तापमान होते. बुधवारी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गुरुवारी ४५.५ अंश सेल्सिअस, शुक्रवारी ४५.६ अंश सेल्सिअस आणि आता आज शनिवारी तब्बल ४६.५ अंश सेल्सीयसपर्यंत कमाल तापमानाने मजल गाठली आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. या उष्णतेमुळे चंद्रपूरकर धास्तावले आहेत.मात्र यापेक्षाही अधिक चिंता करायला लावणारी बाब किमान तापमान ही आहे. राज्यातील इतर शहरातही सध्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा ४५ अंशापार गेला आहे. मात्र तेथील तापमान रात्री झपाट्याने खाली येते. त्यामुळे सायंकाळनंतर नागरिकांना चांगला दिलासा मिळतो. रात्री हवेत गारवा असतो. मात्र चंद्रपुरात तसे नाही. येथील किमान तापमानही दिवसेंदिवस वाढत आहे. या आठवड्यात किमान तापमान २७ अंशाच्या वर नोंदविले जात आहे. मंगळवारी २७.२ अंश, बुधवारी २७ अंश सेल्सिअस, गुरुवारी २९ अंश सेल्सिअस, शुक्रवारी तब्बल ३० अंश सेल्सिअस तर आज शनिवारी ३०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. याचाच अर्थ चंद्रपूर शहर झपाट्याने थंड होत नाही, हे स्पष्ट होत आहे.हवेतील घटक कारणीभूतचंद्रपुरातील वाढते किमान तापमान खरेच चिंताजनक आहे. याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. चंद्रपूर परिसरात ३० च्यावर कोळसा खाणी आहेत. वीज केंद्र व इतर कारखाने आहेत. त्यामुळे येथील हवेत कार्बन डायआॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन व डस्ट पार्टीकल हे घटक अधिक आढळतात. या घटकामुळे पृथ्वीवरून परत जाणारी बहुतांश ऊर्जा येथे अडविली जाते. यामुळे शहर लवकर थंड होत नाही. - प्रा.योगेश दुधपचारे, हवामान अभ्यासक

टॅग्स :weatherहवामान