शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरचे वाढते किमान तापमान धडकी भरविणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:27 IST

उन्हाळ्यातील उष्णता आणि चंद्रपूर शहर या दोघांचा अतूट संबंध आहे. उन्हाळ्यात सूर्य चंद्रपूर शहराच्या माथ्यावर असतो की काय, असाच तापमानाचा अंगारा असतो. एप्रिल महिन्यात पारा ४६.५ अंशापार गेला आहे. अद्याप ‘मे हीट’चा सामना व्हायचा आहे.

ठळक मुद्देकिमान पाराही ३० अंशापार । उन्हाळ्यातील रात्रीचा गारवाही चंद्रपूरकरांच्या नशिबी नाही

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळ्यातील उष्णता आणि चंद्रपूर शहर या दोघांचा अतूट संबंध आहे. उन्हाळ्यात सूर्य चंद्रपूर शहराच्या माथ्यावर असतो की काय, असाच तापमानाचा अंगारा असतो. एप्रिल महिन्यात पारा ४६.५ अंशापार गेला आहे. अद्याप ‘मे हीट’चा सामना व्हायचा आहे. मात्र गंभीर व चिंतन करायला लावणारी बाब वेगळीच आहे. ती म्हणजे चंद्रपूरचे वाढते किमान तापमान. दिवसभर उन्हाचे चटके सोसल्यानंतरही चंद्रपूरकरांना रात्री उष्ण झळांचा सामना करावा लागत आहे. राज्यातील इतर शहराच्या तुलनेत चंद्रपूरचे रात्रीचे तापमान अधिक नोंदविले जात आहे. आताच ते ३० अंशापार गेले आहे. याबाबत गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे.मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकरांवर सूर्य कोपल्याचे दिसून येत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या आठवड्यात मंगळवारी ४३.४ अंश सेल्सिअस तापमान होते. बुधवारी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गुरुवारी ४५.५ अंश सेल्सिअस, शुक्रवारी ४५.६ अंश सेल्सिअस आणि आता आज शनिवारी तब्बल ४६.५ अंश सेल्सीयसपर्यंत कमाल तापमानाने मजल गाठली आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. या उष्णतेमुळे चंद्रपूरकर धास्तावले आहेत.मात्र यापेक्षाही अधिक चिंता करायला लावणारी बाब किमान तापमान ही आहे. राज्यातील इतर शहरातही सध्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा ४५ अंशापार गेला आहे. मात्र तेथील तापमान रात्री झपाट्याने खाली येते. त्यामुळे सायंकाळनंतर नागरिकांना चांगला दिलासा मिळतो. रात्री हवेत गारवा असतो. मात्र चंद्रपुरात तसे नाही. येथील किमान तापमानही दिवसेंदिवस वाढत आहे. या आठवड्यात किमान तापमान २७ अंशाच्या वर नोंदविले जात आहे. मंगळवारी २७.२ अंश, बुधवारी २७ अंश सेल्सिअस, गुरुवारी २९ अंश सेल्सिअस, शुक्रवारी तब्बल ३० अंश सेल्सिअस तर आज शनिवारी ३०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. याचाच अर्थ चंद्रपूर शहर झपाट्याने थंड होत नाही, हे स्पष्ट होत आहे.हवेतील घटक कारणीभूतचंद्रपुरातील वाढते किमान तापमान खरेच चिंताजनक आहे. याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. चंद्रपूर परिसरात ३० च्यावर कोळसा खाणी आहेत. वीज केंद्र व इतर कारखाने आहेत. त्यामुळे येथील हवेत कार्बन डायआॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन व डस्ट पार्टीकल हे घटक अधिक आढळतात. या घटकामुळे पृथ्वीवरून परत जाणारी बहुतांश ऊर्जा येथे अडविली जाते. यामुळे शहर लवकर थंड होत नाही. - प्रा.योगेश दुधपचारे, हवामान अभ्यासक

टॅग्स :weatherहवामान