शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

चंद्रपूरचे वाढते किमान तापमान धडकी भरविणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:27 IST

उन्हाळ्यातील उष्णता आणि चंद्रपूर शहर या दोघांचा अतूट संबंध आहे. उन्हाळ्यात सूर्य चंद्रपूर शहराच्या माथ्यावर असतो की काय, असाच तापमानाचा अंगारा असतो. एप्रिल महिन्यात पारा ४६.५ अंशापार गेला आहे. अद्याप ‘मे हीट’चा सामना व्हायचा आहे.

ठळक मुद्देकिमान पाराही ३० अंशापार । उन्हाळ्यातील रात्रीचा गारवाही चंद्रपूरकरांच्या नशिबी नाही

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळ्यातील उष्णता आणि चंद्रपूर शहर या दोघांचा अतूट संबंध आहे. उन्हाळ्यात सूर्य चंद्रपूर शहराच्या माथ्यावर असतो की काय, असाच तापमानाचा अंगारा असतो. एप्रिल महिन्यात पारा ४६.५ अंशापार गेला आहे. अद्याप ‘मे हीट’चा सामना व्हायचा आहे. मात्र गंभीर व चिंतन करायला लावणारी बाब वेगळीच आहे. ती म्हणजे चंद्रपूरचे वाढते किमान तापमान. दिवसभर उन्हाचे चटके सोसल्यानंतरही चंद्रपूरकरांना रात्री उष्ण झळांचा सामना करावा लागत आहे. राज्यातील इतर शहराच्या तुलनेत चंद्रपूरचे रात्रीचे तापमान अधिक नोंदविले जात आहे. आताच ते ३० अंशापार गेले आहे. याबाबत गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे.मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकरांवर सूर्य कोपल्याचे दिसून येत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या आठवड्यात मंगळवारी ४३.४ अंश सेल्सिअस तापमान होते. बुधवारी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गुरुवारी ४५.५ अंश सेल्सिअस, शुक्रवारी ४५.६ अंश सेल्सिअस आणि आता आज शनिवारी तब्बल ४६.५ अंश सेल्सीयसपर्यंत कमाल तापमानाने मजल गाठली आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. या उष्णतेमुळे चंद्रपूरकर धास्तावले आहेत.मात्र यापेक्षाही अधिक चिंता करायला लावणारी बाब किमान तापमान ही आहे. राज्यातील इतर शहरातही सध्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा ४५ अंशापार गेला आहे. मात्र तेथील तापमान रात्री झपाट्याने खाली येते. त्यामुळे सायंकाळनंतर नागरिकांना चांगला दिलासा मिळतो. रात्री हवेत गारवा असतो. मात्र चंद्रपुरात तसे नाही. येथील किमान तापमानही दिवसेंदिवस वाढत आहे. या आठवड्यात किमान तापमान २७ अंशाच्या वर नोंदविले जात आहे. मंगळवारी २७.२ अंश, बुधवारी २७ अंश सेल्सिअस, गुरुवारी २९ अंश सेल्सिअस, शुक्रवारी तब्बल ३० अंश सेल्सिअस तर आज शनिवारी ३०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. याचाच अर्थ चंद्रपूर शहर झपाट्याने थंड होत नाही, हे स्पष्ट होत आहे.हवेतील घटक कारणीभूतचंद्रपुरातील वाढते किमान तापमान खरेच चिंताजनक आहे. याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. चंद्रपूर परिसरात ३० च्यावर कोळसा खाणी आहेत. वीज केंद्र व इतर कारखाने आहेत. त्यामुळे येथील हवेत कार्बन डायआॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन व डस्ट पार्टीकल हे घटक अधिक आढळतात. या घटकामुळे पृथ्वीवरून परत जाणारी बहुतांश ऊर्जा येथे अडविली जाते. यामुळे शहर लवकर थंड होत नाही. - प्रा.योगेश दुधपचारे, हवामान अभ्यासक

टॅग्स :weatherहवामान