शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या महामारीत राईसमिल संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

देशभरातून तांदूळ निर्यातीत १५ टक्के वाटा पूर्व विदर्भाचा आहे. तेथे धानातून तांदूळ निर्माण केले जाते. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचांदूर, चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील चुल धान पिकांवर पेटते. जयश्रीराम एचएमटी, सोनालिका, पारस, आयआर ३६ या धानाची लागवड परिसरात केली जाते.

ठळक मुद्देकर्जाचा डोंगर वाढला : वीज बिलाने व्यवसाय डबघाईस

रवी रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले तर राईसमिलला चांगले दिवस येतात. परंतु कोरोनाच्या महामारीत सध्या राईसमिल संकटात सापडल्या आहे. राईस मिल मालकांवर कर्जाचे डोंगर वाढत असून अवाढव्य वीज बिलाने व्यवसाय डबघाईस आला आहे.देशभरातून तांदूळ निर्यातीत १५ टक्के वाटा पूर्व विदर्भाचा आहे. तेथे धानातून तांदूळ निर्माण केले जाते. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचांदूर, चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील चुल धान पिकांवर पेटते. जयश्रीराम एचएमटी, सोनालिका, पारस, आयआर ३६ या धानाची लागवड परिसरात केली जाते.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने राईसमिल आहेत. यापैकी ब्रम्हपुरी नागभीड, सिंदेवाही, मूल या पट्ट्यात राईस मिलची संख्या सर्वाधिक आहे. मागील पाच महिन्यांपासून कोरोनाचे वादळ आल्याने याचा फटका राईसमिल व्यवसायाला बसला आहे. मजूर वर्गाशिवाय कोणत्याही व्यवसायाचा विकास होत नाही. कोरोनाच्या महामारीने सुरूवातीला व दरम्यानच्या काळात मजूर वर्ग बाहेर गेल्याने भात उत्पादनावर काही काळ मोठा फरक पडला. त्याचप्रमाणे शासनाने मोफत दरात मजुरवर्गांना तांदूळ, गहू दिल्यामुळे याचाही फटका या उद्योगाला बसला. कोरोनाच्या संकटात राईसमिल जीवनावश्यक वर्गात येत असल्याने सुरू होत्या. परंतु उत्पादित झालेला माल मात्र लॉकडाऊनमुळे बाहेर गेलाच नसल्याने राईसमिल मालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. राईसमिल उद्योगाचे भवितव्य उत्पादित झालेल्या मालाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये झालेल्या आर्थिक कोंडीमुळे व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे.कुकुस स्थिरावला, मात्र कोंढ्याचे भाव घसरलेलॉकडाऊ नच्या काळात कुकुसाला भाव होता. तो आजही कायम आहे. कुकुसाला स्थानिक नागरिकांकडूनही मोठी मागणी आहे. नागपूर, आंध्रप्रदेश व छत्तीसगढ येथे ऑइस फ्लॅक्टीमध्ये कुकुसची मागणी आहे. कोंढ्याचे दर मात्र, घसरले आहे. कोढ्यांची मागणी करणारे पॉवर प्लॅन्ट लॉकडाऊनमध्ये बंद होते. बहुतांश पॉवर प्लॅन्टची मुदत वाढवून न दिल्याने कोंढ्याच्या मागणीत घसरण झाली.त्याचाही फटका या उद्योगाला बसला आहे.लॉकडाऊ नमुळे निर्यातीवरही परिणामजिल्ह्यातील तांदूळ देशात वितरीत होते. परंतु सततच्या लॉकडाऊ नमुळे निर्यातीवर मोठा परिणाम पडला आहे. सध्या १५ ते २० टक्क््यांवर हा व्यवसाय आला आहे. उष्ण तांदूळ ७ ते ८ विदेशात जातो. त्यावरही परिणाम पडला आहे.बँकांनी २० टक्के कॅश के्रटीड वाढवून दिली आहे. परंतु ते उपयोगाचे नाही. त्याऐवजी व्याजाचा दर कमी केल्यास व्यवसायात वृध्दी होऊ शकते. तशी विनंती राईसमिल असोशिएनकडून करण्यात आली.