शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

शहरातील राईस मिल मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:29 IST

राजू गेडाम मूल : शहराच्या मध्यभागी असलेल्या राईस मिल मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राईस मिलच्या कोंड्यामुळे उग्र ...

राजू गेडाम

मूल : शहराच्या मध्यभागी असलेल्या राईस मिल मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राईस मिलच्या कोंड्यामुळे उग्र वास येत असल्याने जीव कासावीस होत असून धानाचा कोंडा थेट घरी जात असल्याने विविध श्वसनाचे आजार जडत आहेत.

या संदर्भात नागरिकांनी अनेकदा तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. नागरिकांच्या दबावामुळे मूल नगर परिषदेने शहरातील राईस मिल मुळे होणारा त्रास लक्षात घेता मिल शहराबाहेर हटविण्याचा निर्णय १९ महिन्यापूर्वी घेतला. मात्र अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मूल शहरात धानाचा व्यावसाय मोठ्या प्रमाणात असून राईस मिलची संख्या सर्वाधिक आहे. आजच्या स्थितीत बहुतांश राईस मिल चामोर्शी महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या आहेत. मात्र मूल नगर परिषदेअंतर्गत वाॅर्ड नं.११ मधील भारत राईस मिल व दत्त राईस मिल या दोन राईस मिल मुळे वॉर्डातील नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राईस मिलमधून निघणारा कोंडा, बारीक भुसा थेट नागरिकांच्या स्वयंपाकघरात शिरत असल्याने तो भुसा खाण्या पिण्याच्या भांड्यावर पडत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळोवेळी झाडलोट केल्यानंतरही काही वेळातच जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुसरी बाब म्हणजे राईस मिलमधून निघणारा कोंडा आवारातच जमा करून ठेवला जात असल्याने पावसाळ्याच्या दिवसात तो कुजतो. त्यावर डुकरे व इतर जनावरे रात्रंदिवस बसून राहत असल्याने आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्यातच त्या कोंड्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरल्याने नागरिक वैतागले आहे. कोंड्याची डस्ट नागरिकांच्या नाका तोंडात जात असल्याने श्वसनाचा व दम्याचा त्रास वाढला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डेंग्यू, मलेरिया, टायफाॅईड यासारखे आजार बळावले असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार

त्रस्त नागरिकांनी मूल नगर परिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्याकडे याबाबत तक्रार दिली आहे. मात्र नाममात्र चौकशी करण्याचा देखावा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मूल शहरातील मध्यभागी असलेल्या राईस मिल शहराबाहेर हटविण्यासंदर्भात नगर परिषदेने २७ फेब्रुवारी २०२० च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ८५ नुसार ठराव संमत करण्यात आला. आजच्या स्थितीत १९ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असताना या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष घालून होणारा त्रास टाळण्यासाठी त्वरित ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे.

कोट

मूल शहरातील मध्यभागी असलेल्या या दोन राईस मिल मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. माझे वास्तव्य याच वाॅर्डात असल्याने मला या संदर्भातील माहिती आहे. त्यामुळेच या राईस मिल शहराबाहेर हटविण्याचा ठराव नगर परिषदेने घेतला आहे. लवकरच या ठरावाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

-नंदकिशोर रणदिवे, उपाध्यक्ष, नगर परिषद मूल

कोट

भारत राईस मिल व दत्त राईस मिल मुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. घरातील लहान मुले विविध आजाराने ग्रासले असल्याचे दिसून येत आहे. कोंडा थेट घरात येत असल्याने तो नाकातोंडात जात आहे.

-मुन्ना घुटके, नागरिक, मूल.