शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गावखेड्यांत संविधानाची माहिती पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:22 IST

भारतीय संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. सामाजिक कर्तव्याची जाणिव आणि राष्ट्रपे्रमाची शिकवण दिली. अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्याचे बळ दिले. त्यामुळे संविधानातील मूलभूत विचार गावखेड्यांत पोहोचवा, असे मत निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देई. झेड. खोब्रागडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीतर्फे प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. सामाजिक कर्तव्याची जाणिव आणि राष्ट्रपे्रमाची शिकवण दिली. अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्याचे बळ दिले. त्यामुळे संविधानातील मूलभूत विचार गावखेड्यांत पोहोचवा, असे मत निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरम नवयुवक सिद्धार्थ बौद्ध मंडळ व फुले आंबेडकरी विचारधारा समितीच्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ देवगडे तर प्रमुख अतिथी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. किशोर मानकर खुशाल तेलंग, प्रकाश टाकला. यावेळी हिराचंद बोरकुटे, गणपत उपरे, देशक खोब्रागडे उपस्थित होते. खोब्रागडे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी शोषित, पीडित व वंचित लोकांकरिता संविधानात करून अनेक तरतुदी केल्या. त्यामुळे मूलभूत अधिकारांची जाणीव करून देण्याकरिता संविधानाचा जागर ग्रामीण भागात केला पाहिजे. देवगडे म्हणाले, चंद्रपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन, संविधान दिन, डॉ. आंबेडकर सभागृहाची सुत्रे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आली. हे कर्तव्य मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. ही समिती जागर संविधानाचा हा उपक्रम राबविण्यास कटीबद्ध आहे. एवढ्यावरच न थांबता स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिकाही सुरू करणार आहे. डॉ. मानकर यांनीही सामाजिक चळवळ आणि बांधिलकी या विषयावर विचार मांडले. देवगडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम पूर्णत्वास नेवून या शहराचा लौकीक वाढविण्याचे कार्य केले, असेही म्हणाले. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक हुशार विद्यार्थी आहेत. मात्र, त्यांना ग्रंथालय उपलब्ध होत नसल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करता येत नाही. पालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली.यावेळी फुले, आंबेडकर विचार संवर्धन समिती, नवयुवक सिद्धार्थ मंडळ, आॅफिसर्स फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीप अडकिने, संचालन बंडू फुलझेले, डॅनियल देवगडे यांनी केले. ई. एस. मेश्राम यांनी मानले.