शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

गावखेड्यांत संविधानाची माहिती पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:22 IST

भारतीय संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. सामाजिक कर्तव्याची जाणिव आणि राष्ट्रपे्रमाची शिकवण दिली. अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्याचे बळ दिले. त्यामुळे संविधानातील मूलभूत विचार गावखेड्यांत पोहोचवा, असे मत निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देई. झेड. खोब्रागडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीतर्फे प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. सामाजिक कर्तव्याची जाणिव आणि राष्ट्रपे्रमाची शिकवण दिली. अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्याचे बळ दिले. त्यामुळे संविधानातील मूलभूत विचार गावखेड्यांत पोहोचवा, असे मत निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरम नवयुवक सिद्धार्थ बौद्ध मंडळ व फुले आंबेडकरी विचारधारा समितीच्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ देवगडे तर प्रमुख अतिथी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. किशोर मानकर खुशाल तेलंग, प्रकाश टाकला. यावेळी हिराचंद बोरकुटे, गणपत उपरे, देशक खोब्रागडे उपस्थित होते. खोब्रागडे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी शोषित, पीडित व वंचित लोकांकरिता संविधानात करून अनेक तरतुदी केल्या. त्यामुळे मूलभूत अधिकारांची जाणीव करून देण्याकरिता संविधानाचा जागर ग्रामीण भागात केला पाहिजे. देवगडे म्हणाले, चंद्रपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन, संविधान दिन, डॉ. आंबेडकर सभागृहाची सुत्रे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आली. हे कर्तव्य मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. ही समिती जागर संविधानाचा हा उपक्रम राबविण्यास कटीबद्ध आहे. एवढ्यावरच न थांबता स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिकाही सुरू करणार आहे. डॉ. मानकर यांनीही सामाजिक चळवळ आणि बांधिलकी या विषयावर विचार मांडले. देवगडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम पूर्णत्वास नेवून या शहराचा लौकीक वाढविण्याचे कार्य केले, असेही म्हणाले. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक हुशार विद्यार्थी आहेत. मात्र, त्यांना ग्रंथालय उपलब्ध होत नसल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करता येत नाही. पालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली.यावेळी फुले, आंबेडकर विचार संवर्धन समिती, नवयुवक सिद्धार्थ मंडळ, आॅफिसर्स फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीप अडकिने, संचालन बंडू फुलझेले, डॅनियल देवगडे यांनी केले. ई. एस. मेश्राम यांनी मानले.