शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले खरीप पिकांचे पुन्हा मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

सध्या सोयाबीन पिकाची कापणी सर्वत्र सुरू असून कापल्यानंतर वाळण्यासाठी हे पीक शेतात ठेवले जाते. नंतर एकत्र करून त्याचा ढीग तयार करण्यात येतो. हे सर्व सुरू असतानाच ८ ऑक्टोबरपासून वादळासह जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. शनिवारीला रात्री जोरदार विजगर्जनेसह वादळी पाऊस आला. या पावसामुळे बऱ्याच गावातील शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकापूस, सोयाबीन व धानालाही फटका : शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस आहे. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, धान या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच रविवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावली. पुन्हा पिकांना फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारने या नुकसानीची नोंद घ्यावी, अशी मागणी या सर्व गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.सध्या सोयाबीन पिकाची कापणी सर्वत्र सुरू असून कापल्यानंतर वाळण्यासाठी हे पीक शेतात ठेवले जाते. नंतर एकत्र करून त्याचा ढीग तयार करण्यात येतो. हे सर्व सुरू असतानाच ८ ऑक्टोबरपासून वादळासह जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. शनिवारीला रात्री जोरदार विजगर्जनेसह वादळी पाऊस आला. या पावसामुळे बऱ्याच गावातील शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे सोयाबीन, धान व कापूस पिकाला जोरदार फटका बसला. धान तर शेतातच भूईसपाट झाले. चंद्रपूरसह, राजुरा, कोरपना, सिंदेवाही, मूल, भद्रावती, वरोरा आदी तालुक्यातही हा पाऊस झाला.राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, चिंचोली, बबापूर, साखरी, मानोली, वरोडा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी, वरुर रोड, टेंबुरवाही, तुलाना, बेरडी, सिर्सी, चिचबोडी, भेंडाळा, भुरकुंडा, भेदोडा, साखरवाही, पाचगाव, कापनगाव यासह अनेक गावात जोरदार पाऊस आला. त्यात कापूस, व व धान पिकाचे मोठे नुकसान झाले. धान पीक शेतात झोपून गेल्याचे दिसत आहे. सोयाबीन कापणी झाल्यानंतर पाऊस आल्याने शेतकºयांनी दुसऱ्या दिवशी वाळण्यासाठी ते परतवून ठेवले. मात्र त्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस आल्याने आता या सोयाबीनला कोंब फुटून संपूर्ण पीक हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भरपाई द्यावीशेतकरी आधीच चिंतेत असताना आता परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता शासनाने शेतकºयांच्या या नुकसानीची दखल घ्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती