शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले खरीप पिकांचे पुन्हा मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

सध्या सोयाबीन पिकाची कापणी सर्वत्र सुरू असून कापल्यानंतर वाळण्यासाठी हे पीक शेतात ठेवले जाते. नंतर एकत्र करून त्याचा ढीग तयार करण्यात येतो. हे सर्व सुरू असतानाच ८ ऑक्टोबरपासून वादळासह जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. शनिवारीला रात्री जोरदार विजगर्जनेसह वादळी पाऊस आला. या पावसामुळे बऱ्याच गावातील शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकापूस, सोयाबीन व धानालाही फटका : शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस आहे. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, धान या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच रविवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावली. पुन्हा पिकांना फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारने या नुकसानीची नोंद घ्यावी, अशी मागणी या सर्व गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.सध्या सोयाबीन पिकाची कापणी सर्वत्र सुरू असून कापल्यानंतर वाळण्यासाठी हे पीक शेतात ठेवले जाते. नंतर एकत्र करून त्याचा ढीग तयार करण्यात येतो. हे सर्व सुरू असतानाच ८ ऑक्टोबरपासून वादळासह जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. शनिवारीला रात्री जोरदार विजगर्जनेसह वादळी पाऊस आला. या पावसामुळे बऱ्याच गावातील शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे सोयाबीन, धान व कापूस पिकाला जोरदार फटका बसला. धान तर शेतातच भूईसपाट झाले. चंद्रपूरसह, राजुरा, कोरपना, सिंदेवाही, मूल, भद्रावती, वरोरा आदी तालुक्यातही हा पाऊस झाला.राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, चिंचोली, बबापूर, साखरी, मानोली, वरोडा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी, वरुर रोड, टेंबुरवाही, तुलाना, बेरडी, सिर्सी, चिचबोडी, भेंडाळा, भुरकुंडा, भेदोडा, साखरवाही, पाचगाव, कापनगाव यासह अनेक गावात जोरदार पाऊस आला. त्यात कापूस, व व धान पिकाचे मोठे नुकसान झाले. धान पीक शेतात झोपून गेल्याचे दिसत आहे. सोयाबीन कापणी झाल्यानंतर पाऊस आल्याने शेतकºयांनी दुसऱ्या दिवशी वाळण्यासाठी ते परतवून ठेवले. मात्र त्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस आल्याने आता या सोयाबीनला कोंब फुटून संपूर्ण पीक हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भरपाई द्यावीशेतकरी आधीच चिंतेत असताना आता परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता शासनाने शेतकºयांच्या या नुकसानीची दखल घ्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती