शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

परतीच्या पावसाने हिरावला दिवाळीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

पंधरा दिवसादरम्यान कमी कालावधीत पिकणारे धान व सोयाबीन मळणी करून बहुतेक शेतकरी विक्रीकरिता बाजारात नेतात होता. पण, यंदा पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांन खरीपातील शेतमाल विकताच आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने दिवाळी सणावर निराशेचे सावट होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये निराशा : शेतमाल विक्री न झाल्याने आर्थिक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शहरी भागामध्ये दिवाळी उत्साहात साजरी होत असताना ग्रामीण भागात मात्र परतीच्या पावसाने हा आनंद हिरावला आहे. दिवाळीपूर्वी दहा ते पंधरा दिवसादरम्यान कमी कालावधीत पिकणारे धान व सोयाबीन मळणी करून बहुतेक शेतकरी विक्रीकरिता बाजारात नेतात होता. पण, यंदा पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांन खरीपातील शेतमाल विकताच आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने दिवाळी सणावर निराशेचे सावट होते.जिल्ह्यात मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात दरवर्षी भात शेतीची लागवड वाढतच आहे. या पिकासाठी पोषक हवामान असल्याचे पाहून काही शेतकऱ्यांनी वावराच्या बांध्या तयार केल्या. मात्र, यंदा सततच्या पावसामुळे नाल्याकाठ्यावरील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. परिपक्व झालेल्या भात शेतीची सतत पडणाºया कापसामुळे कापणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हंगामाचे नियोजन बिघडले. पावसामुळे कापणी व मळणी न करणाºया शेतकºयांची संख्या जिल्ह्यात हजारोंच्या घरात आहेत.ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यात भाताचे दाणे जमिनीवर पडून कोंब आले. भाताच्या वैरणीची गुणवत्ताही खराब झाली. अति पावसामुळे भात खाचरातील बांधाचे नुकसान होऊन माती व वाळू साचली. वाळू साचून खाचराची गुणवत्ता कमी झाली. मागील गतवर्षीप्रमाणे दिवाळी जवळ येत आल्याचे पाहून शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून विविध कार्यकारी संस्था अथवा व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकण्याच्या तयारीत होते. परंतु मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यांमध्ये परतीचा पाऊस पडला. त्यामुळे परिपक्व झालेल्या सुमारे चार ते साडेचार हजार हेक्टर भात शेती नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.खरेदी केंद्रांबाबत अद्याप अनिश्चितताजिल्ह्यात परतीचा पाऊस पडत असल्याने विविध पिकांचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामातील वर्गीकृत पिकांचा हमीभाव शासनाने जाहीर केला. या मूग, सोयाबीनचा समावेश आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे जाण्याची वेळ येणार नाही, यासाठी पणन विभागाच्या नियंत्रणात हमीभावानुसार शेतमाल खरेदी केंद्र सुरू करण्याचे जाहीर झाले होते. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रांची कार्यवाही पूर्ण झाली. परंतु, जिल्ह्यात अद्याप अनिश्चितता आहे. पावसामुळे यंदा शेतमाल विकण्यास उशीर झाला. संबंधित विभागाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून खरेदी केंद्र निश्चित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.वीज कोसळून १२ बकऱ्या ठारगडचांदूर : परतीच्या मुसळधार पावसासह वीज कोसळल्याने १२ बकऱ्या ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ठीक २ वाजताच्या सुमारास नारंडा येथील शिवारात घडली. बकऱ्यांचा कळप घेऊन गुराखी एका एक झाडाच्या आडोशला बसले होते. दरम्यान, अचानक वीज कोसळली. या घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य वीणाताई मालेकर, सुरेश मालेकर यांना मिळताच त्यांनी तहसील व तलाठ्यांना कळविले. नारंडा येथील पोलीस पाटील नरेश परसुटकर, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दीपक मोहूरले, मिलिंद ताकसांडे, अरूण सोंपीत्तरे आदींच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. शेळीच्या मालकांची नावे कळू शकली नाही.हळद पिकावरपानगळचा प्रादुर्भावपारंपरिक पीक टाळून यंदा शेकडो शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली. परंतु सतत पडत असलेल्या पावसाचा फटका हळदी पिकाला बसला आहे. हळदीवर तांबेरा रोगाचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पानगळ होत आहे. परिणामी, हळदीच्या उत्पादनात या वर्षी ३० टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सुमारे ६०० हेक्टरवर हळदीची लागवड झाली. पण, शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने हळद पीक वाया जाऊ शकते.तातडीने पंचनामे करावे- सुभाष धोटेराजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील धान, सोयाबीन व कापूस उत्पादक तालुक्यातील शेतीचे २६ व २७ ऑक्टोबर रोजी आलेल्या परतीच्या पावसाने सर्वाधिक नुकसान झाले. हातचे पीक गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तयार करून नुकसान भरपाईचा अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठविण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस