शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

परतीच्या पावसाने हिरावला दिवाळीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

पंधरा दिवसादरम्यान कमी कालावधीत पिकणारे धान व सोयाबीन मळणी करून बहुतेक शेतकरी विक्रीकरिता बाजारात नेतात होता. पण, यंदा पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांन खरीपातील शेतमाल विकताच आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने दिवाळी सणावर निराशेचे सावट होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये निराशा : शेतमाल विक्री न झाल्याने आर्थिक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शहरी भागामध्ये दिवाळी उत्साहात साजरी होत असताना ग्रामीण भागात मात्र परतीच्या पावसाने हा आनंद हिरावला आहे. दिवाळीपूर्वी दहा ते पंधरा दिवसादरम्यान कमी कालावधीत पिकणारे धान व सोयाबीन मळणी करून बहुतेक शेतकरी विक्रीकरिता बाजारात नेतात होता. पण, यंदा पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांन खरीपातील शेतमाल विकताच आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने दिवाळी सणावर निराशेचे सावट होते.जिल्ह्यात मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात दरवर्षी भात शेतीची लागवड वाढतच आहे. या पिकासाठी पोषक हवामान असल्याचे पाहून काही शेतकऱ्यांनी वावराच्या बांध्या तयार केल्या. मात्र, यंदा सततच्या पावसामुळे नाल्याकाठ्यावरील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. परिपक्व झालेल्या भात शेतीची सतत पडणाºया कापसामुळे कापणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हंगामाचे नियोजन बिघडले. पावसामुळे कापणी व मळणी न करणाºया शेतकºयांची संख्या जिल्ह्यात हजारोंच्या घरात आहेत.ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यात भाताचे दाणे जमिनीवर पडून कोंब आले. भाताच्या वैरणीची गुणवत्ताही खराब झाली. अति पावसामुळे भात खाचरातील बांधाचे नुकसान होऊन माती व वाळू साचली. वाळू साचून खाचराची गुणवत्ता कमी झाली. मागील गतवर्षीप्रमाणे दिवाळी जवळ येत आल्याचे पाहून शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून विविध कार्यकारी संस्था अथवा व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकण्याच्या तयारीत होते. परंतु मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यांमध्ये परतीचा पाऊस पडला. त्यामुळे परिपक्व झालेल्या सुमारे चार ते साडेचार हजार हेक्टर भात शेती नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.खरेदी केंद्रांबाबत अद्याप अनिश्चितताजिल्ह्यात परतीचा पाऊस पडत असल्याने विविध पिकांचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामातील वर्गीकृत पिकांचा हमीभाव शासनाने जाहीर केला. या मूग, सोयाबीनचा समावेश आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे जाण्याची वेळ येणार नाही, यासाठी पणन विभागाच्या नियंत्रणात हमीभावानुसार शेतमाल खरेदी केंद्र सुरू करण्याचे जाहीर झाले होते. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रांची कार्यवाही पूर्ण झाली. परंतु, जिल्ह्यात अद्याप अनिश्चितता आहे. पावसामुळे यंदा शेतमाल विकण्यास उशीर झाला. संबंधित विभागाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून खरेदी केंद्र निश्चित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.वीज कोसळून १२ बकऱ्या ठारगडचांदूर : परतीच्या मुसळधार पावसासह वीज कोसळल्याने १२ बकऱ्या ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ठीक २ वाजताच्या सुमारास नारंडा येथील शिवारात घडली. बकऱ्यांचा कळप घेऊन गुराखी एका एक झाडाच्या आडोशला बसले होते. दरम्यान, अचानक वीज कोसळली. या घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य वीणाताई मालेकर, सुरेश मालेकर यांना मिळताच त्यांनी तहसील व तलाठ्यांना कळविले. नारंडा येथील पोलीस पाटील नरेश परसुटकर, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दीपक मोहूरले, मिलिंद ताकसांडे, अरूण सोंपीत्तरे आदींच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. शेळीच्या मालकांची नावे कळू शकली नाही.हळद पिकावरपानगळचा प्रादुर्भावपारंपरिक पीक टाळून यंदा शेकडो शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली. परंतु सतत पडत असलेल्या पावसाचा फटका हळदी पिकाला बसला आहे. हळदीवर तांबेरा रोगाचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पानगळ होत आहे. परिणामी, हळदीच्या उत्पादनात या वर्षी ३० टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सुमारे ६०० हेक्टरवर हळदीची लागवड झाली. पण, शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने हळद पीक वाया जाऊ शकते.तातडीने पंचनामे करावे- सुभाष धोटेराजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील धान, सोयाबीन व कापूस उत्पादक तालुक्यातील शेतीचे २६ व २७ ऑक्टोबर रोजी आलेल्या परतीच्या पावसाने सर्वाधिक नुकसान झाले. हातचे पीक गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तयार करून नुकसान भरपाईचा अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठविण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस