शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

निकाल बारावीचा, आयुष्याचा नाही

By admin | Updated: June 2, 2017 00:36 IST

मंगळवारी बारावीचा निकाल जाहिर झाला. हा निकाल तसा बारावीचा होता, आयुष्याचा नव्हता.

हे आहेत आयुष्याचे शिल्पकार : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घडविला इतिहासलोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: मंगळवारी बारावीचा निकाल जाहिर झाला. हा निकाल तसा बारावीचा होता, आयुष्याचा नव्हता. पण, मनासारखे यश न मिळाल्याने अंतर्बाह्य खचलेल्या वणीच्या कोमल चचाणे गळफास घेतला. औरंगाबादच्या मनीषा गायकवाड हीने स्वत:ला रेल्वे समोर झोकून दिले, नवी मुंबईतील पृथ्वी व्हावळ याने गळ्यात फास अडकवला. केवळ विद्यार्थीच नाही तर एका ढिकाणी पालकाने मुलाला अपेक्षीत गुण मिळाले नाहीत म्हणून स्वत:लाच संपवून टाकले. किती टोकाचे नैराश्य? किती अशक्त झालीत आमची मने ? परीक्षेतील अपयश हे आयुष्याच्या अंताचे कारण होवू शकते का? पण, पालकांच्या तथाकथित प्रतिष्ठेसाठी निर्माण झालेले प्रचंड अपेक्षांचे ओझे मुलांना पेलवत नाही. आणि ते अशा आत्मघाताकडे वळतात. प्रतिकुलतेचे असे प्रसंग राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी अशा सर्वांनीच पाहिले. परंतु ध्येयप्रती प्रामाणिक निष्ठा आणि स्वत:वरचा आत्मविश्वास या बळावर यांनी खेचून आणला यशाचा मंगलकलश. सारांश... कुठलेही अपयश म्हणजे आयुष्याचा अंत नसतो. हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी लोकमतने पुढाकार घेतला असून आज आयकॉन ठरलेल्यांनीच अपयशातूनच कसा यशाचा मार्ग शोधला त्यांचीच ही काही प्रेरणादायी उदाहरणे....समर्पण महत्त्वाचेपरीक्षेत अपयश आले यात घाबरण्यासारखे, निराश होण्यासारखे विशेष काही नाही. आयुष्यात परीक्षा एकदाच होत नाही. एक-दोन परीक्षेमध्ये अपयश आले तरी काही बिघडत नाही. आपण परीक्षेची तयारी करताना किती समर्पित होतो, हे महत्वाचे आहे. शाळा-महाविद्यालयात विशेष यश न मिळालेले आज मोठ्या पदावर आहेत. फेसबुकचे मालक आहेत. चांगले मार्कस मिळविणारे अनेक विद्यार्थी पुढे काही करू शकले नाही, असेही अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिकाटी, समर्पण भावनेतून परीश्रम करीत रहावे. यश नक्कीच येईल.-आशुतोष सलिल, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.