शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ मोहिमेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:58 IST

सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सभागृहात आणि रस्त्यावर

विजय वडेट्टीवार : सावली येथे शेकडो शेतकऱ्यांनी भरले अर्जलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सभागृहात आणि रस्त्यावर उतरून कर्जमाफीची मागणी लावून धरली. काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन ‘चांदा ते बांदा’ संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. त्यामुळे शासनाने दखल घेत दीड लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र या कर्जमाफीचा अद्यापही शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याने ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ असे अर्ज आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शेकडो शेतकऱ्यांनी भरले. काँग्रेसने ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी सावली येथून करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळाचे उपगट नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी काँग्रसेसह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत संघर्ष यात्रेद्वारे राज्यभर फिरून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. संघर्ष यात्रेनंतर शेतकऱ्यांच्या संपामुळे सरकारवर दबाव वाढला. त्यामुळे ११ सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगितले. मात्र दहा हजारांची उचल देण्याच्या निर्णयात अनेक जाचक अटी असल्याने आमचा विरोध सुरू आहे. सरकारने त्या अटी मागे घेतल्या. पण, प्रत्यक्षात आजपर्यंत राज्यातील १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांपैकी फक्त १ हजार ८२ शेतकऱ्यांना दहा हजारांची उचल मिळाली आहे, असे सांगितले.मुख्यमंत्र्यांनी २४ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली व दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. ही कर्जमाफी आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचे शासन सांगत आहे. मात्र ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. कर्जमाफीचे जिल्हानिहाय आकडे जाहीर केले. मात्र सरकारचे आकडे फसवे असून कर्जमाफीचा फायदा फारच कमी शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा कायम राहणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासाठी काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे आ. वडेट्टीवार यांनी सांगितले.यावेळी सावली तालुकाध्यक्ष राजेश सिध्दम, माजी सभापती दिनेश चिटनुरवार, नगराध्यक्ष रजनी भडके राकेश गड्डमवार, नंदा अल्लूरवार, वैशाली शेरकी, विजय कोरेवार, मनिषा जवादे, संगीता चौधरी, उर्मीला तरारे, उषा भोर, विलास यासलवार, छत्रपती गेडाम आदी उपस्थित होते.