शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ मोहिमेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:58 IST

सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सभागृहात आणि रस्त्यावर

विजय वडेट्टीवार : सावली येथे शेकडो शेतकऱ्यांनी भरले अर्जलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सभागृहात आणि रस्त्यावर उतरून कर्जमाफीची मागणी लावून धरली. काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन ‘चांदा ते बांदा’ संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. त्यामुळे शासनाने दखल घेत दीड लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र या कर्जमाफीचा अद्यापही शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याने ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ असे अर्ज आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शेकडो शेतकऱ्यांनी भरले. काँग्रेसने ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी सावली येथून करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळाचे उपगट नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी काँग्रसेसह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत संघर्ष यात्रेद्वारे राज्यभर फिरून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. संघर्ष यात्रेनंतर शेतकऱ्यांच्या संपामुळे सरकारवर दबाव वाढला. त्यामुळे ११ सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगितले. मात्र दहा हजारांची उचल देण्याच्या निर्णयात अनेक जाचक अटी असल्याने आमचा विरोध सुरू आहे. सरकारने त्या अटी मागे घेतल्या. पण, प्रत्यक्षात आजपर्यंत राज्यातील १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांपैकी फक्त १ हजार ८२ शेतकऱ्यांना दहा हजारांची उचल मिळाली आहे, असे सांगितले.मुख्यमंत्र्यांनी २४ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली व दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. ही कर्जमाफी आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचे शासन सांगत आहे. मात्र ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. कर्जमाफीचे जिल्हानिहाय आकडे जाहीर केले. मात्र सरकारचे आकडे फसवे असून कर्जमाफीचा फायदा फारच कमी शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा कायम राहणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासाठी काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे आ. वडेट्टीवार यांनी सांगितले.यावेळी सावली तालुकाध्यक्ष राजेश सिध्दम, माजी सभापती दिनेश चिटनुरवार, नगराध्यक्ष रजनी भडके राकेश गड्डमवार, नंदा अल्लूरवार, वैशाली शेरकी, विजय कोरेवार, मनिषा जवादे, संगीता चौधरी, उर्मीला तरारे, उषा भोर, विलास यासलवार, छत्रपती गेडाम आदी उपस्थित होते.