शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ मोहिमेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:58 IST

सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सभागृहात आणि रस्त्यावर

विजय वडेट्टीवार : सावली येथे शेकडो शेतकऱ्यांनी भरले अर्जलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सभागृहात आणि रस्त्यावर उतरून कर्जमाफीची मागणी लावून धरली. काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन ‘चांदा ते बांदा’ संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. त्यामुळे शासनाने दखल घेत दीड लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र या कर्जमाफीचा अद्यापही शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याने ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ असे अर्ज आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शेकडो शेतकऱ्यांनी भरले. काँग्रेसने ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी सावली येथून करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळाचे उपगट नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी काँग्रसेसह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत संघर्ष यात्रेद्वारे राज्यभर फिरून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. संघर्ष यात्रेनंतर शेतकऱ्यांच्या संपामुळे सरकारवर दबाव वाढला. त्यामुळे ११ सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगितले. मात्र दहा हजारांची उचल देण्याच्या निर्णयात अनेक जाचक अटी असल्याने आमचा विरोध सुरू आहे. सरकारने त्या अटी मागे घेतल्या. पण, प्रत्यक्षात आजपर्यंत राज्यातील १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांपैकी फक्त १ हजार ८२ शेतकऱ्यांना दहा हजारांची उचल मिळाली आहे, असे सांगितले.मुख्यमंत्र्यांनी २४ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली व दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. ही कर्जमाफी आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचे शासन सांगत आहे. मात्र ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. कर्जमाफीचे जिल्हानिहाय आकडे जाहीर केले. मात्र सरकारचे आकडे फसवे असून कर्जमाफीचा फायदा फारच कमी शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा कायम राहणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासाठी काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे आ. वडेट्टीवार यांनी सांगितले.यावेळी सावली तालुकाध्यक्ष राजेश सिध्दम, माजी सभापती दिनेश चिटनुरवार, नगराध्यक्ष रजनी भडके राकेश गड्डमवार, नंदा अल्लूरवार, वैशाली शेरकी, विजय कोरेवार, मनिषा जवादे, संगीता चौधरी, उर्मीला तरारे, उषा भोर, विलास यासलवार, छत्रपती गेडाम आदी उपस्थित होते.