शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करुया

By admin | Updated: August 17, 2015 00:41 IST

१० महिन्यांच्या काळात सरकारने जनहिताचे व लोककल्याणाचे अनेक निर्णय घेतले आहे. येत्या काळात आणखी लोकहितकारी निर्णय घेण्यासाठी शासन कटिबध्द आहे.

सुधीर मुनगंटीवार : स्वातंत्र्यदिनी जिल्हावासीयांना संबोधनचंद्रपूर: १० महिन्यांच्या काळात सरकारने जनहिताचे व लोककल्याणाचे अनेक निर्णय घेतले आहे. येत्या काळात आणखी लोकहितकारी निर्णय घेण्यासाठी शासन कटिबध्द आहे. जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा यासारखे दुरदृष्टीचे निर्णय घेऊन सरकारने जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे. आपण आजच्या स्वातंत्रदिनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करु या, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते स्वातंत्र्याच्या ६८ व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते.यावेळी केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, स्वातंत्र सैनिक, नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.राज्यातील व्याघ्र वैभव जगाच्या पाठीवर ठळकपणे अधोरेखीत करत वन पर्यटनाला चालना मिळावी, या दृष्टीने जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून योगदान देण्याचे मान्य केल्यामुळे त्यांनी जिल्हावासियांतर्फे त्यांचे आभार व्यक्त केले. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी शासनाने विद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्याचे कार्यालय मंजूर केले असून हे कार्यालय लवकरच चंद्रपूर येथे कार्यरत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी जिल्हयातील विविध विकास कामाचा आढावा घेतला. चंद्रपूर शहरातील सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, चौक सौंदर्यीकरण, स्मशानभूमी बांधकाम, विद्युत व्यवस्था, नेताजी नगर भवनाची दुरुस्ती, अभ्यासिकेचे बांधकाम व इतर विकास कामे करण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील इतर नगरपरिषदा व नगरपंचायतींना ६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बाबुपेठ उड्डाण पुलाचे बांधकामही हाती घेण्याच्या दृष्टीने तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.जिल्हयातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात येत असून ११५ कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी विविध योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. जलयुक्त शिवार हा महाराष्ट्र शासनाचा लोकसहभागातून पुढे जाणारा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजनेत जिल्ह्यातील २१८ गावांची निवड करण्यात आली असून या अभियानात महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जलसंपदा विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण, नरेगा या सर्व यंत्रणांचा सहभाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हा परिषदेच्या वतीने विकासाच्या नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात असून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नवचेतना हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. मॉडल शाळा बनविणे, अंगणवाडयाचे अद्यावतीकरण, शैक्षणिक गुणवत्ता वाढ आदी कार्यक्रम या मिशनमध्ये राबविले जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील ७० टक्क्यापेक्षा जास्त ग्राम पंचायतमधील नागरिक उघडयावर शौचास जाणार नाहीत, यासंबंधीचे नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हयातील ५४ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट सीएसआर निधीतून करण्याची योजना जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. हळद क्लस्टर तयार करण्यासोबतच भाजीपाला क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पत्रकार व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)