शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करुया

By admin | Updated: August 17, 2015 00:41 IST

१० महिन्यांच्या काळात सरकारने जनहिताचे व लोककल्याणाचे अनेक निर्णय घेतले आहे. येत्या काळात आणखी लोकहितकारी निर्णय घेण्यासाठी शासन कटिबध्द आहे.

सुधीर मुनगंटीवार : स्वातंत्र्यदिनी जिल्हावासीयांना संबोधनचंद्रपूर: १० महिन्यांच्या काळात सरकारने जनहिताचे व लोककल्याणाचे अनेक निर्णय घेतले आहे. येत्या काळात आणखी लोकहितकारी निर्णय घेण्यासाठी शासन कटिबध्द आहे. जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा यासारखे दुरदृष्टीचे निर्णय घेऊन सरकारने जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे. आपण आजच्या स्वातंत्रदिनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करु या, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते स्वातंत्र्याच्या ६८ व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते.यावेळी केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, स्वातंत्र सैनिक, नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.राज्यातील व्याघ्र वैभव जगाच्या पाठीवर ठळकपणे अधोरेखीत करत वन पर्यटनाला चालना मिळावी, या दृष्टीने जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून योगदान देण्याचे मान्य केल्यामुळे त्यांनी जिल्हावासियांतर्फे त्यांचे आभार व्यक्त केले. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी शासनाने विद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्याचे कार्यालय मंजूर केले असून हे कार्यालय लवकरच चंद्रपूर येथे कार्यरत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी जिल्हयातील विविध विकास कामाचा आढावा घेतला. चंद्रपूर शहरातील सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, चौक सौंदर्यीकरण, स्मशानभूमी बांधकाम, विद्युत व्यवस्था, नेताजी नगर भवनाची दुरुस्ती, अभ्यासिकेचे बांधकाम व इतर विकास कामे करण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील इतर नगरपरिषदा व नगरपंचायतींना ६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बाबुपेठ उड्डाण पुलाचे बांधकामही हाती घेण्याच्या दृष्टीने तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.जिल्हयातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात येत असून ११५ कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी विविध योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. जलयुक्त शिवार हा महाराष्ट्र शासनाचा लोकसहभागातून पुढे जाणारा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजनेत जिल्ह्यातील २१८ गावांची निवड करण्यात आली असून या अभियानात महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जलसंपदा विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण, नरेगा या सर्व यंत्रणांचा सहभाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हा परिषदेच्या वतीने विकासाच्या नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात असून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नवचेतना हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. मॉडल शाळा बनविणे, अंगणवाडयाचे अद्यावतीकरण, शैक्षणिक गुणवत्ता वाढ आदी कार्यक्रम या मिशनमध्ये राबविले जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील ७० टक्क्यापेक्षा जास्त ग्राम पंचायतमधील नागरिक उघडयावर शौचास जाणार नाहीत, यासंबंधीचे नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हयातील ५४ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट सीएसआर निधीतून करण्याची योजना जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. हळद क्लस्टर तयार करण्यासोबतच भाजीपाला क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पत्रकार व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)