शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

बल्लारपूरला स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प

By admin | Updated: June 28, 2015 01:57 IST

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. विकासात्मक कामाचा दर्जा सुधारण्यासाठी लोकसहभाग

बल्लारपूर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. विकासात्मक कामाचा दर्जा सुधारण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी सर्व विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी समित्या गठीत करण्याचा मानस आहे. जनतेच्या मनात कायमस्वरूपी राहणाऱ्या कामावर भर देणार असून बल्लारपूरला स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प अर्थ, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे जाहिर केला. दरम्यान, नगरपालिका प्रशासनाने त्यांच्याकडे १२२ कोटी ८८ लाखांचा विकास आराखडा सुपूर्द केला.येथील श्री बालाजी सभागृहात बल्लारपूर शहर विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विकास परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्यांनी विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन दिले.यावेळी मंचावर नगराध्यक्ष छाया मडावी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, नगर परिषदेचे उपाध्यक्ष संपत कोरडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, नगरसेवक रेणुका दुधे, हरिश शर्मा, विनोद यादव, डॉ. सुनिल कुल्दीवार, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, प्रमोद कडू, शिवचंद द्विवेदी, निलेश खरबडे, उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ-ठुबे, मुख्याधिकारी जी.एन. वाहूरवाघ, तहसीलदार डी.एस. भोयर, न.प. गटनेता देवेंद्र आर्य, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजू भुजबळ यांच्यासह अधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती.ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, कोणताही विकास करणे एकट्याचे काम नाही. सर्वसमावेशक टिमवर्क विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. शहरात वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांचे ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे काम हाती घेणार आहे. रस्ते बांधकाम, आरोग्य सेवा, प्रदूषण, वृक्षारोपण, दिवाबत्तीची सोय, क्रीडांगण, सांस्कृतिक क्षेत्र यासह अनेक ठिकाणी समित्यांचे गठन करून त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत अहवालानुसार विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे लोकसहभाग वाढीव लागेल, असा विश्वास व्यक्त करून १७ कोटी रुपये खर्च करून अद्यावत पोलीस ठाणे बनविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जी.एन. वाहूरवाघ व नगराध्यक्ष छाया मडावी यांनी बल्लारपूर शहराचा सन २०१४-१५ चा एकूण १२१ कोटी ८८ लाख रुपयाचा विकास आराखडा पालकमंत्र्याकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. यात प्रस्तावित रस्त्याचे काम, मजबुतीकरण, रूंदीकरण, गटारे व मोठे नाले बांधकाम, आठवडी बाजारातील व्यापारी संकुल, वाहनतळ बांधकाम, मुख्य मार्गावर दोन स्वागत गेट, स्मशानभूमि विकास, वर्धा नदीवर घाटाचे बांधकाम, शहरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, शालेय इमारतीचे नूतनीकरण, बचत भवनाचे नूतनीकरण, शहरातील चौकाचे सौंदर्यीकरण आदी कामांचा समावेश आहे.निलेश खरबडे, हरिश शर्मा व अन्य उपस्थित नागरिकांनी विकास परिषदेदरम्यान शहर विकासाबाबत काही सूचना केल्या. अनेकांनी निवेदनाच्या माध्यमातून विकासाला हातभार लावण्यासाठी भूमिका मांडल्या. संचालन नगरपालिकेचे अधीक्षक किशोर जांभुळकर यांनी केले. अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)