शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

दारूमुक्त करण्याचा संकल्प

By admin | Updated: October 19, 2015 01:32 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंद झाली असली तरी राजुरा तालुक्यातील विरूर येथे मागील सहा महिन्यांपासून छुप्या मार्गाने हातभट्टी,

महिला झाल्या आक्रमक : पोलीस ठाण्यातच घेतली सभाविरूर (स्टे) : चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंद झाली असली तरी राजुरा तालुक्यातील विरूर येथे मागील सहा महिन्यांपासून छुप्या मार्गाने हातभट्टी, मोहफूल व देशी-विदेशी दारूची अवैध विक्री जोमाने सुरू आहे. दारूच्या आहारी गेलेल्यांचे सुखी कुटूंब उद्ध्वस्त झाले आहेत. दरम्यान, विरूर (स्टे) येथील महिलांनी एकत्र येऊन महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर मोरे, सरपंच भास्कर सिडाम व विरूरचे ठाणेदार यांच्या पुढाकाराने पोलीस ठाण्यात सभा आयोजित करून विरूरात चाललेले अवैध दारू विक्री बंद करण्याचा संकल्प केला.गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदारांनी केले असून यामुळे अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंद झाल्यापासून अवैधरीत्या छुप्या मार्गाने हातभट्टी, मोहफुल व देशी-विदेशी दारू विक्रीत सतत वाढ होत असल्याने गावातील मोठ्यांबरोबर तरुण व अल्पवयीन मुलेसुद्धा दारूच्या आहारी जात आहे. येथे बहुतेक जनता गरीब, आदिवासी, शेतमजूर, शेतकरी आहेत. मोलमजुरी करून पोट भरणारे गरीब जनता मजुरीचे पुर्ण रक्कम दारूमध्ये घालवित आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावात दररोज तंटे, झगडे, कौटुंबीक कलह निर्माण होऊन अनेकांचे संसार कोलमडण्याच्या अवस्थेत आहेत. सतत वाढ होत असलेल्या अवैध धंद्यावर आळा घालण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत आहे. यावर उपाययोजना करण्याकरिता विरूर येथील ठाणेदार, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांना बोलावून दारू व इतर समस्याबाबत चर्चा केली. तेव्हा गावातील महिलांनी वर्ग व नागरिक ठाण्यासमोर सभा आयोजित केली. यात गावातील २५० ते ३०० महिला उपस्थित होते. यात ठाणेदारांनी दारूचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. गावातील अवैध दारू पुर्णपणे बंद करण्यासाठी गावातील नागरिकांची व महिलाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. दारू कोणत्या वार्डात व मोहल्यात विकली जात आहे. हे आम्हाला कळवून सहकार्य केल्यास दारू बंद होण्यास मदत होईल, असे सांगीतले. तसेच गावात पोलीस मित्र तयार करून गावात चालण्याच्या अवैध धंद्यावर आळा बसेल, असेही सांगीतले. यावर उपस्थित महिलांनी अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत होकार दिला. यामुळे अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आता विरूरातील अवैध दारू बंदी होईल काय, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)