शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पूरबुडित क्षेत्रातील रहिवास बेतू शकतो जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:00 IST

मागील काही दिवसांपासून चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसत आहे. इरई धरणही ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहे. चंद्रपूर शहरातून इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. या नदीकाठावर व पूरबुडित क्षेत्रात अनेक नागरिकांचा मागील अनेक वर्षांपासून रहिवास आहे.

ठळक मुद्देमनपा नोटीस देऊन मोकळी : प्रशासनाने पुनर्वसन करणे आवश्यक

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसत आहे. इरई धरणही ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहे. चंद्रपूर शहरातून इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. या नदीकाठावर व पूरबुडित क्षेत्रात अनेक नागरिकांचा मागील अनेक वर्षांपासून रहिवास आहे. पाऊस सरासरी ओलांडून बरसला तर या नद्यांना पूर येऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पूरबुडित क्षेत्रातील हा रहिवास जिवावरही बेतण्याची शक्यता निश्चितच आहे.नदीपात्रातच लोकांचा रहिवास असल्यामुळे त्यांना तिथून हटविण्यासाठी मनपा अतिक्रमण करणाऱ्यांना दरवर्षी नोटीस बजावते. यावर्षीही त्यांना नोटीस दिली आहे. मात्र या नोटीसला न जुमानता नदीपात्रात त्यांचा रहिवास कायम आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेनेही नोटीस बजावण्यापलिकडे ठोस काहीच केले नाही. पूरपरिस्थिती उदभवल्यास नागरिकांचे नुकसान व महापालिकेची धावाधाव अटळ आहे. चंद्रपूर शहरातून इरई व झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदीची तर डोळ्यादेखत दूरवस्था होत असतानाही प्रशासन नदीच्या दूरवस्थेला थांबवू शकले नाही. इरई नदी वाहती आहे. चंद्रपूरकरांना पिण्याची पाणीही या नदीतून मिळते. चंद्रपूरची तहान भागविणारी नदी असतानाही या नदीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करणे सुरू केले. वेकोलिचे महाकाय ढिगारे व नागरिकांच्या अतिक्रमणामुळे व कारखान्यांच्या रसायनमिश्रिम पाण्यामुळे ही नदी अरुंद व दूषित झाली. परिणामी पावसाळ्यात नदीचे पाणी थोपून चंद्रपूरकरांना दरवर्षी बॅक वॉटरचा फटका बसू लागला. या पूरपरिस्थितीमुळे अनेकवेळा अतोनात नुकसान झाले आहे. दोन वर्षांपूर्वी इरई नदीचे खोलीकरण करण्यात आले. मात्र हे काम निधीअभावी थांबविण्यात आले. इरई नदी खोलीकरणामुळे रुंद झाल्याने दोन वर्ष बॅक वॉटरचा सामना करावा लागला नाही. रहमतनगर, सिस्टर कॉलनी, नगिनाबाग परिसरात इरई नदीच्या पूरबुडित क्षेत्रातच नागरिकांनी घरे बांधून रहिवास सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी राहत आहेत. काहींनी तर चक्क नदीपात्रातच अतिक्रमण करून पक्की घरे बांधली आहेत. दुसरीकडे महाकाली वॉर्ड परिसरात झरपट नदीपात्रातही लोकांनी घरे बांधली आहे. या ठिकाणीदेखील त्यांचा रहिवास अनेक वर्षांपासून आहे. दोन दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे या झोपड्यांच्या अगदी जवळ नदीचे पाणी आले होते. त्यानंतर पाऊस थांबल्याने त्यांचे धावाधाव टळली. त्यामुळे आता येथील नागरिकांचे पूनर्वसन करण्यासाठी प्रशासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे.ओव्हरबर्डनमुळे पूरपरिस्थितीचंद्रपूरलगत असलेल्या माना खाण परिसरात व इरई नदीपात्रालगत वेकोलिने मातीचे मोठमोठे ढिगारे तयार केले आहे. वर्षांनुवर्षापासून याच ठिकाणी माती टाकण्यात येत असल्यामुळे हे ओव्हरबर्डन महाकाय झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे पावसाळ्यात चंद्रपूरकरांना नेहमीच बॅकवॉटरचा सामना करावा लागला आहे. याही वर्षी जोरदार पाऊस झाला तर इरईचे पाणी थोपू शकते.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर