शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कोर्टीमक्ता येथे होणार राखीव बटालियन ४ स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:45 IST

राज्याचे अर्थ, वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ स्थापन करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : युवकांना नोकरीची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे अर्थ, वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ स्थापन करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.राज्य शासनाला कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कर्तव्ये वेळेवर व परिणामकारकरित्या पार पाडता यावी तसेच इतर राज्यांनाही मदत करता करण्याच्या हेतूने केंद्रीय भारत राखीव बटालियनची स्थापना करण्यात आली आहे. सदर बटालियन प्रभावपणे कार्यरत असून नक्षलविरोधी अभियानामध्ये दीर्घ आणि लघु कालावधीत गस्त, नाकाबंदी, आठवडी बाजार बंदोबस्त तसेच पोलीस ठाण्यांना संरक्षण आदी बाबी हाताळत आहे. या बटालियन व्यतिरिक्त आणखी दोन बटालियन मंजूर केल्यास नक्षलग्रस्त कारवाया तसेच कायदा व सुव्यवस्था हाताळणे सुकर होईल, या दृष्टीने राज्यासाठी दोन नविन भारत राखीव बटालियन मंजूर केल्याचे केंद्र्र शासनाने कळविले आहे. कोर्टीमक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केली आहे. भारत राखीव बटालियनच्या पदांची भरती करताना नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत प्रचलित नियमानुसार स्थानिकांना प्राधान्य देताना वय आणि शैक्षणिक अटी शिथील करण्यात येणार आहे. भारत राखीव बटालियनमध्ये गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या नक्षलप्रभावित जिल्हयामधील उमेदवारांमधूनच पदभरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया दोन वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याच्या प्रक्रियेत हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या निर्णयामुळे बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे.१ हजार ३८४ पदांची निर्मितीसदर बटालियन स्थापन करण्यास मान्यता व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. गडचिरोली, चंद्र्रपूर आणि गोंदिया येथील उमेदवारांमधून होणार पदभरती सदर भारत राखीव बटालियनसाठी १ हजार ३८४ पदे निर्माण करण्यात आली. याकरिता राज्य मंत्रिमंडळाने आवर्ती व अनावर्ती खर्चाला खर्चाला मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात एकूण आवश्यक पदाच्या एक तृतीयांश पदे निर्माण केल्या जाणार आहे.जिल्ह्यात नाविण्यपूर्ण योजना व विकासकामेपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने शेकडो कामे पूर्णत्वास आली आहेत. पायाभूत सुविधांची निर्मिती करताना राज्यात दखलपात्र ठरतील अशा नाविण्यपूर्ण योजनांकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. याचाच परिणाम म्हणून संस्थात्मक कामांची संख्या वाढली. उद्दिष्टानुसार प्रशासनाकडून कामे पूर्ण करून घेत असल्यानेच हे शक्य होत आहे.