शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

२५० वसतिगृह कर्मचाऱ्यांचे मानधन पाच महिन्यांपासून रखडले

By admin | Updated: June 14, 2014 01:53 IST

राज्यात सन २००४ पासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत वसतिगृह चालविण्यात येत आहे.

लखमापूर : राज्यात सन २००४ पासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत वसतिगृह चालविण्यात येत आहे. या वसतिगृहात काम करणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासूनचे मानधन अद्यापही थकीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण व शहरी भागात विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय एन.टी. आदी विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था या वस्तीगृहाअंतर्गत करण्यात येते. यासाठी ज्या संस्थाअंतर्गत हे वसतिगृह चालविण्यात येत आहे, त्या संस्थांना प्रती विद्यार्थी ९०० ते ९५० रुपये प्रती माह खर्च समाजकल्याण जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात येतो. मात्र यामध्ये कमालीची अनियमितता असल्याचे समजते. जिल्ह्यात अशा प्रकारचे ६७ वसतिगृह असून यामध्ये २४ ते २८ विद्यार्थ्यांची प्रति वसतिगृह अशी संख्या आहे. विद्यार्थ्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था, भोजन, मुलभूत सुविधा आणि नियंत्रणासाठी प्रत्येक वसतिगृहात एक अधिकारी, मदतनिस किंवा स्वयंपाकी ठेवण्यात आला आहे. गेल्या १० वर्षापासून हे कर्मचारी वसतिगृहात काम करीत असून त्यांना स्थायी करुन कायमस्वरूपी वेतन देण्यात येत नाही. मानधनावरच समाधान मानावे लागत आहे.यातही दर महिन्याला मानधन दिले जात नसल्याने कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण कसे पार पाडायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभा आहे. राज्यामध्ये साधारणता १० हजार ८०० कर्मचारी वसतीगृहात कार्यरत आहेत. काही जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मानधन दर महिन्याला वाटप करण्यात येत असताना चंद्रपूर जिल्ह्यात हे मानधन थकीत का ठेवले जाते, हा प्रश्न आहे.. सेवेत कायमस्वरूपी रुजू करुन शासननियमानुसार वेतन देण्यात यावे, यासाठी कर्मचारी संघटनेमार्फत आंदोलने करण्यात आली. त्यात महिन्याला मानधन वेळेवर द्यावे, अशीही मागणी होती. मात्र याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून कर्मचारी व संस्थाचालकांना वारंवार संबंधित कार्यालयापुढे चकरा मााव्या लागत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे, शहरात राहण्याची भोजनाची मोफत सुविधा द्यावी, हा शासनाचा यामागचा उद्देश आहे. मात्र सदर वसतीगृहात रात्रदिवस विद्यार्थ्यांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटाचे काय, असा सवाल कर्मचारी आता करीत आहे. एकीकडे महागाईने रुद्ररुप धारण केले आहे. तर दुसरीकडे तुंटपुज्या मानधनासाठी कर्मचाऱ्यांना पाच ते सहा महिन्यापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. (वार्ताहर)