शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

२५० वसतिगृह कर्मचाऱ्यांचे मानधन पाच महिन्यांपासून रखडले

By admin | Updated: June 14, 2014 01:53 IST

राज्यात सन २००४ पासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत वसतिगृह चालविण्यात येत आहे.

लखमापूर : राज्यात सन २००४ पासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत वसतिगृह चालविण्यात येत आहे. या वसतिगृहात काम करणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासूनचे मानधन अद्यापही थकीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण व शहरी भागात विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय एन.टी. आदी विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था या वस्तीगृहाअंतर्गत करण्यात येते. यासाठी ज्या संस्थाअंतर्गत हे वसतिगृह चालविण्यात येत आहे, त्या संस्थांना प्रती विद्यार्थी ९०० ते ९५० रुपये प्रती माह खर्च समाजकल्याण जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात येतो. मात्र यामध्ये कमालीची अनियमितता असल्याचे समजते. जिल्ह्यात अशा प्रकारचे ६७ वसतिगृह असून यामध्ये २४ ते २८ विद्यार्थ्यांची प्रति वसतिगृह अशी संख्या आहे. विद्यार्थ्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था, भोजन, मुलभूत सुविधा आणि नियंत्रणासाठी प्रत्येक वसतिगृहात एक अधिकारी, मदतनिस किंवा स्वयंपाकी ठेवण्यात आला आहे. गेल्या १० वर्षापासून हे कर्मचारी वसतिगृहात काम करीत असून त्यांना स्थायी करुन कायमस्वरूपी वेतन देण्यात येत नाही. मानधनावरच समाधान मानावे लागत आहे.यातही दर महिन्याला मानधन दिले जात नसल्याने कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण कसे पार पाडायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभा आहे. राज्यामध्ये साधारणता १० हजार ८०० कर्मचारी वसतीगृहात कार्यरत आहेत. काही जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मानधन दर महिन्याला वाटप करण्यात येत असताना चंद्रपूर जिल्ह्यात हे मानधन थकीत का ठेवले जाते, हा प्रश्न आहे.. सेवेत कायमस्वरूपी रुजू करुन शासननियमानुसार वेतन देण्यात यावे, यासाठी कर्मचारी संघटनेमार्फत आंदोलने करण्यात आली. त्यात महिन्याला मानधन वेळेवर द्यावे, अशीही मागणी होती. मात्र याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून कर्मचारी व संस्थाचालकांना वारंवार संबंधित कार्यालयापुढे चकरा मााव्या लागत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे, शहरात राहण्याची भोजनाची मोफत सुविधा द्यावी, हा शासनाचा यामागचा उद्देश आहे. मात्र सदर वसतीगृहात रात्रदिवस विद्यार्थ्यांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटाचे काय, असा सवाल कर्मचारी आता करीत आहे. एकीकडे महागाईने रुद्ररुप धारण केले आहे. तर दुसरीकडे तुंटपुज्या मानधनासाठी कर्मचाऱ्यांना पाच ते सहा महिन्यापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. (वार्ताहर)