शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

२५० वसतिगृह कर्मचाऱ्यांचे मानधन पाच महिन्यांपासून रखडले

By admin | Updated: June 14, 2014 01:53 IST

राज्यात सन २००४ पासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत वसतिगृह चालविण्यात येत आहे.

लखमापूर : राज्यात सन २००४ पासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत वसतिगृह चालविण्यात येत आहे. या वसतिगृहात काम करणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासूनचे मानधन अद्यापही थकीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण व शहरी भागात विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय एन.टी. आदी विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था या वस्तीगृहाअंतर्गत करण्यात येते. यासाठी ज्या संस्थाअंतर्गत हे वसतिगृह चालविण्यात येत आहे, त्या संस्थांना प्रती विद्यार्थी ९०० ते ९५० रुपये प्रती माह खर्च समाजकल्याण जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात येतो. मात्र यामध्ये कमालीची अनियमितता असल्याचे समजते. जिल्ह्यात अशा प्रकारचे ६७ वसतिगृह असून यामध्ये २४ ते २८ विद्यार्थ्यांची प्रति वसतिगृह अशी संख्या आहे. विद्यार्थ्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था, भोजन, मुलभूत सुविधा आणि नियंत्रणासाठी प्रत्येक वसतिगृहात एक अधिकारी, मदतनिस किंवा स्वयंपाकी ठेवण्यात आला आहे. गेल्या १० वर्षापासून हे कर्मचारी वसतिगृहात काम करीत असून त्यांना स्थायी करुन कायमस्वरूपी वेतन देण्यात येत नाही. मानधनावरच समाधान मानावे लागत आहे.यातही दर महिन्याला मानधन दिले जात नसल्याने कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण कसे पार पाडायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभा आहे. राज्यामध्ये साधारणता १० हजार ८०० कर्मचारी वसतीगृहात कार्यरत आहेत. काही जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मानधन दर महिन्याला वाटप करण्यात येत असताना चंद्रपूर जिल्ह्यात हे मानधन थकीत का ठेवले जाते, हा प्रश्न आहे.. सेवेत कायमस्वरूपी रुजू करुन शासननियमानुसार वेतन देण्यात यावे, यासाठी कर्मचारी संघटनेमार्फत आंदोलने करण्यात आली. त्यात महिन्याला मानधन वेळेवर द्यावे, अशीही मागणी होती. मात्र याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून कर्मचारी व संस्थाचालकांना वारंवार संबंधित कार्यालयापुढे चकरा मााव्या लागत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे, शहरात राहण्याची भोजनाची मोफत सुविधा द्यावी, हा शासनाचा यामागचा उद्देश आहे. मात्र सदर वसतीगृहात रात्रदिवस विद्यार्थ्यांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटाचे काय, असा सवाल कर्मचारी आता करीत आहे. एकीकडे महागाईने रुद्ररुप धारण केले आहे. तर दुसरीकडे तुंटपुज्या मानधनासाठी कर्मचाऱ्यांना पाच ते सहा महिन्यापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. (वार्ताहर)