शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

आबादी वसाहतधारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: March 29, 2015 01:14 IST

देवई गोविंदपूर तुकूम येथील आबादी वसाहतधारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे.

चंद्रपूर : देवई गोविंदपूर तुकूम येथील आबादी वसाहतधारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. यासंदर्भात वसाहत धारकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसकर यांना निवेदन देवून त्यांच्याशी चर्चा केली.दे.गो. तुकूम येथील सर्व्हे नं. १०६ व १०६/१ ही जागा मिनाई आबादी क्षेत्रात समाविष्ट असून ती लोकांना राहण्याकरिता मिळाली आहे. या क्षेत्रातील भूखंडधारक ग्रामपंचायतीच्या अस्तित्वापुर्वीपासून वहिवाट करित आहे. त्यानंतर १९८२ मध्ये हे क्षेत्र चंद्रपूर नगर पालिकेमध्ये व २०११ पासून महानगरपालिकेमध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे. संबंधित रहिवाशांकडे १९५५-५६ ते १९६०-६१ पर्यंतच्या तलाठी ५ वर्षाचा खसरा उपलब्ध आहे. २४ एप्रिल १९८१ च्या सभेत रहिवाशांनी राहत्या जागेचे पट्टे मिळण्याबाबतचा ठराव संबंधित अधिकाऱ्यांना पाठविला होता. तशी माहिती केंद्रीय रसायन खते राज्यमंत्री हंसराज अहीर व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, शैलेंद्र बैस, उज्ज्वल धामनगे, कृती समितीचे पदाधिकारी लक्ष्मण लेनगुरे, अशोक संगीडवार, शंकर कामावार, महादेव नन्नावरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)