शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धोबी समाज पुनर्विलोकन समितीचा अहवाल केंद्राकडे पाठवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

चंद्रपूर: महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून कोरोना महामारीत विशेष अधिवेशन बोलविण्याची तयारी दाखवित आहे. परंतु, मागील ६० ...

चंद्रपूर: महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून कोरोना महामारीत विशेष अधिवेशन बोलविण्याची तयारी दाखवित आहे. परंतु, मागील ६० वर्षांपासून धोबी समाजाला पूर्ववत अनुसुचित जातीचे आरक्षण द्यावे, यासाठी अधिवेशनात धोबी समाज पुनर्विलोकन समितीचा अहवाल राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी धोबी समाजबांधवांकडून होत आहे.

१ मे १९६० पूर्वी सीपी ॲन्ड बेरारमध्ये असताना धोबी समाज अनुसुचित जातीमध्ये गणला जात होता. परंतु, महाराष्ट्राची स्थापना झाली असता तत्कालीन सरकारने धोबी समाजाला अनुसुचित जातीतून काढून ओबीसीमध्ये टाकले. ५ सप्टेंबर रोजी तत्कालीन आमदार डॉ. दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली धोबी समाज पुनर्विलोकन समितीची स्थापना केली. या समितीने डॉ. भाडे समितीचा अहवाल तत्कालीन समाज कल्याण मंत्र्याकडे सोपविला. धोबी समाज अनु. जातीचे निकष पूर्ण करीत असल्याने त्यांना आरक्षण देण्याचा अहवाल सरकारला दिला. मात्र अद्यापही तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला नाही. त्यामुळे मराठा समाजाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आल्यास याच अधिवेशनात धोबी समाजाच्या आरक्षणाकरिता धोबी समाज पुनर्विलोकन समितीचा अहवाल राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र सरकारकडे पाठवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धोबी समाजाचे नेते प्रमोद केळझरकर, सुरेश बंडीवार, प्रकाश वडूरकर, बाबूराव गोडावार, लोणारवार, बंडू दुरुतकर यांनी दिला आहे.