शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील रेंगाबोडी झाले टोमॅटो गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:58 IST

चिमूर तालुक्यातील रेंगाबोडी गावातील जवळपास दोनशे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे आता रेंगाबोडी टोमॅटो उत्पादकांचे गाव बनले आहे.

ठळक मुद्देरोज दहा गाड्या टोमॅटो बाजारातदोनशे शेतकऱ्यांनी केली लागवड

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर तालुक्यातील रेंगाबोडी परिसरापासून वºहाड परिसर लागतो. त्यामुळे या गावात कापूस, सोयाबीन, गहू हे पीक घेतले जात होते. मात्र दोन-तीन वर्षांपासून काही निवडक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीचा नवा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्यामुळे आजघडीला गावातील जवळपास दोनशे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे आता रेंगाबोडी टोमॅटोउत्पादकांचे गाव बनले आहे.चिमूर तालुक्यातील खडसंगी हिंगणघाट मुख्य रस्त्यावर वसलेले रेंगाबोडी हे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावात ९० टक्के शेतकरी आहेत. येथे एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. कारण गावात पाण्याचे स्रोत नाही. मात्र आता शिवारात पाण्याची सोय झाल्यामुळे येथील शेतकरी नेहमीच प्रयोगशील राहत आले आहेत. येथील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसह टोमॅटोचे नगदी पीक घेण्याचे ठरवले व त्यामध्ये ते यशस्वी झाले.रेंगाबोडी येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीपैकी एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोची रोप विकत घेणे, लागवडीपूर्व मशागत आणि लागवडी पश्चात खत फवारणी, आंतरमशागत, ठिंबक सिंचन, मल्चिंग असा एकूण सुमारे लाखापर्यत खर्च केला. पीक चांगले आले. खर्च एक लाख रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, एक महिन्याअगोदर टोमॅटो बाजारात ५० ते ६० रुपये असा एका २५ किलोच्या क्रेटला भाव मिळत होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले होते. मात्र सध्या २५ किलोच्या क्रेटला शंभर रुपयांच्या जवळपास भावाने विकले जात आहेत. यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लागवड, मशागत खर्च जाता चांगलाच फायदा मिळत आहे.रेंगाबोडीतील दोनशे शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादन घेतले आहे. रोज गावातून दहा गाडया भरून टोमॅटो बाजारात विक्रीसाठी जात आहेत. आता रेंगाबोडी गाव टोमॅटो उत्पादकांचे गाव बनले आहे. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी पे्ररणादायी आहे.

आठवडी बाजारात व शहरात विक्रीरेंगाबोडी येथील टोमॅटो दुर्गापूर, चंद्रपूर, मूल, चामोर्शी, भिवापूर, सिंदेवाही, वरोरा, भद्रावती, वणी आदी गावातील बाजारात विक्रीसाठी नेले जात आहेत. यासोबत चिमुरातही ते विक्रीसाठी असतात.

आजघडीला गावात दोनशेच्या जवळपास शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्पादन चांगले आले. सुरुवातीला भाव कमी होता. मात्र आता शंभर रुपयांच्या जवळपास २५ किलोचा ट्रे जात आहे. रोज दहा गाडया बाजारात विक्रीसाठी जात आहेत.- पांडुरंग रामगुंडे,टोमॅटो उत्पादक शेतकरी, रेंगाबोडी

टॅग्स :agricultureशेती