शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

चंद्रपूर जिल्ह्यातील रेंगाबोडी झाले टोमॅटो गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:58 IST

चिमूर तालुक्यातील रेंगाबोडी गावातील जवळपास दोनशे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे आता रेंगाबोडी टोमॅटो उत्पादकांचे गाव बनले आहे.

ठळक मुद्देरोज दहा गाड्या टोमॅटो बाजारातदोनशे शेतकऱ्यांनी केली लागवड

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर तालुक्यातील रेंगाबोडी परिसरापासून वºहाड परिसर लागतो. त्यामुळे या गावात कापूस, सोयाबीन, गहू हे पीक घेतले जात होते. मात्र दोन-तीन वर्षांपासून काही निवडक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीचा नवा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्यामुळे आजघडीला गावातील जवळपास दोनशे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे आता रेंगाबोडी टोमॅटोउत्पादकांचे गाव बनले आहे.चिमूर तालुक्यातील खडसंगी हिंगणघाट मुख्य रस्त्यावर वसलेले रेंगाबोडी हे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावात ९० टक्के शेतकरी आहेत. येथे एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. कारण गावात पाण्याचे स्रोत नाही. मात्र आता शिवारात पाण्याची सोय झाल्यामुळे येथील शेतकरी नेहमीच प्रयोगशील राहत आले आहेत. येथील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसह टोमॅटोचे नगदी पीक घेण्याचे ठरवले व त्यामध्ये ते यशस्वी झाले.रेंगाबोडी येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीपैकी एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोची रोप विकत घेणे, लागवडीपूर्व मशागत आणि लागवडी पश्चात खत फवारणी, आंतरमशागत, ठिंबक सिंचन, मल्चिंग असा एकूण सुमारे लाखापर्यत खर्च केला. पीक चांगले आले. खर्च एक लाख रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, एक महिन्याअगोदर टोमॅटो बाजारात ५० ते ६० रुपये असा एका २५ किलोच्या क्रेटला भाव मिळत होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले होते. मात्र सध्या २५ किलोच्या क्रेटला शंभर रुपयांच्या जवळपास भावाने विकले जात आहेत. यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लागवड, मशागत खर्च जाता चांगलाच फायदा मिळत आहे.रेंगाबोडीतील दोनशे शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादन घेतले आहे. रोज गावातून दहा गाडया भरून टोमॅटो बाजारात विक्रीसाठी जात आहेत. आता रेंगाबोडी गाव टोमॅटो उत्पादकांचे गाव बनले आहे. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी पे्ररणादायी आहे.

आठवडी बाजारात व शहरात विक्रीरेंगाबोडी येथील टोमॅटो दुर्गापूर, चंद्रपूर, मूल, चामोर्शी, भिवापूर, सिंदेवाही, वरोरा, भद्रावती, वणी आदी गावातील बाजारात विक्रीसाठी नेले जात आहेत. यासोबत चिमुरातही ते विक्रीसाठी असतात.

आजघडीला गावात दोनशेच्या जवळपास शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्पादन चांगले आले. सुरुवातीला भाव कमी होता. मात्र आता शंभर रुपयांच्या जवळपास २५ किलोचा ट्रे जात आहे. रोज दहा गाडया बाजारात विक्रीसाठी जात आहेत.- पांडुरंग रामगुंडे,टोमॅटो उत्पादक शेतकरी, रेंगाबोडी

टॅग्स :agricultureशेती