शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चंद्रपूर जिल्ह्यातील रेंगाबोडी झाले टोमॅटो गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:58 IST

चिमूर तालुक्यातील रेंगाबोडी गावातील जवळपास दोनशे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे आता रेंगाबोडी टोमॅटो उत्पादकांचे गाव बनले आहे.

ठळक मुद्देरोज दहा गाड्या टोमॅटो बाजारातदोनशे शेतकऱ्यांनी केली लागवड

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर तालुक्यातील रेंगाबोडी परिसरापासून वºहाड परिसर लागतो. त्यामुळे या गावात कापूस, सोयाबीन, गहू हे पीक घेतले जात होते. मात्र दोन-तीन वर्षांपासून काही निवडक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीचा नवा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्यामुळे आजघडीला गावातील जवळपास दोनशे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे आता रेंगाबोडी टोमॅटोउत्पादकांचे गाव बनले आहे.चिमूर तालुक्यातील खडसंगी हिंगणघाट मुख्य रस्त्यावर वसलेले रेंगाबोडी हे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावात ९० टक्के शेतकरी आहेत. येथे एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. कारण गावात पाण्याचे स्रोत नाही. मात्र आता शिवारात पाण्याची सोय झाल्यामुळे येथील शेतकरी नेहमीच प्रयोगशील राहत आले आहेत. येथील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसह टोमॅटोचे नगदी पीक घेण्याचे ठरवले व त्यामध्ये ते यशस्वी झाले.रेंगाबोडी येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीपैकी एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोची रोप विकत घेणे, लागवडीपूर्व मशागत आणि लागवडी पश्चात खत फवारणी, आंतरमशागत, ठिंबक सिंचन, मल्चिंग असा एकूण सुमारे लाखापर्यत खर्च केला. पीक चांगले आले. खर्च एक लाख रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, एक महिन्याअगोदर टोमॅटो बाजारात ५० ते ६० रुपये असा एका २५ किलोच्या क्रेटला भाव मिळत होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले होते. मात्र सध्या २५ किलोच्या क्रेटला शंभर रुपयांच्या जवळपास भावाने विकले जात आहेत. यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लागवड, मशागत खर्च जाता चांगलाच फायदा मिळत आहे.रेंगाबोडीतील दोनशे शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादन घेतले आहे. रोज गावातून दहा गाडया भरून टोमॅटो बाजारात विक्रीसाठी जात आहेत. आता रेंगाबोडी गाव टोमॅटो उत्पादकांचे गाव बनले आहे. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी पे्ररणादायी आहे.

आठवडी बाजारात व शहरात विक्रीरेंगाबोडी येथील टोमॅटो दुर्गापूर, चंद्रपूर, मूल, चामोर्शी, भिवापूर, सिंदेवाही, वरोरा, भद्रावती, वणी आदी गावातील बाजारात विक्रीसाठी नेले जात आहेत. यासोबत चिमुरातही ते विक्रीसाठी असतात.

आजघडीला गावात दोनशेच्या जवळपास शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्पादन चांगले आले. सुरुवातीला भाव कमी होता. मात्र आता शंभर रुपयांच्या जवळपास २५ किलोचा ट्रे जात आहे. रोज दहा गाडया बाजारात विक्रीसाठी जात आहेत.- पांडुरंग रामगुंडे,टोमॅटो उत्पादक शेतकरी, रेंगाबोडी

टॅग्स :agricultureशेती