शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

विश्रामगृहाच्या कक्षांचे नामांतर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:32 IST

पैनगंगा नदीवर बॅरेज बंधारे बांधा कोरपना : तालुक्यातील परसोडा, गांधीनगर, सांगोडा, भारोसा येथे पैनगंगा नदीवर बंधारे बांधण्यात यावे, ...

पैनगंगा नदीवर बॅरेज बंधारे बांधा

कोरपना : तालुक्यातील परसोडा, गांधीनगर, सांगोडा, भारोसा येथे पैनगंगा नदीवर बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला जलसिंचन करण्यासाठी सोयीचे होईल तसेच कोरडवाहू जमिनी ओलिताखाली येतील. या माध्यमातून सिंचनाचे क्षेत्र वाढले जाईल.

राजुरा उपविभागाचे विभाजन करा

जिवती : राजुरा उपविभागाच्या कामाचा व्याप बघता येथील उपविभागीय कार्यालयांचे विभाजन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. यात महसूल, पाणीपुरवठा, सिंचाई विभागाचा सामावेश आहे. या उपविभागात तीन तालुके आहे. त्यामुळे येथील कामाला दिरंगाई होत आहे. त्यामुळे स्वतंत्र उपविभागीय कार्यालयांची निर्मिती होणे आवश्यक आहे.

पांदण रस्त्यांचा विकास करा

सावली : तालुक्यातील अनेक गावातील पांदण रस्ते दुर्लक्षितच आहे. त्यामुळे त्यांचा विकास करून रस्ते सुलभ करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.

रस्त्यावर हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण

चंद्रपूर : येथील गांधी चौकात किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध वस्तूंची विक्री करीत असतात. या दुकानासमोर उभे राहून अनेक नागरिक वस्तू खरेदी करतात. यामुळे वाहतूक प्रभावित होते. त्यामुळे अतिक्रमण काढावे, अशी मागणी हाेत असतानाही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

भूमी अभिलेखची रिक्त पदे भरण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त आहेत. अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढत आहे. याकडे लक्ष देऊन रिक्त पदे भरावे, अशी मागणी होत आहे.

सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी

नागभीड : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपावर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथे हातपंपावर सौरऊर्जा बसविल्यास नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही सुविधा होणार आहे.

जेनरिक औषधसाठा वाढवाण्याची मागणी

कोरपना : पंतप्रधान जनआरोग्य औषधी केंद्रामध्ये शासनाच्या सवलतीत औषधसाठा वितरित करण्यात येतो. मात्र या केंद्रात अत्यल्प प्रकारचा औषधसाठा उपलब्ध आहे. परिणामी अतिरिक्त पैसे देऊन रुग्णांना औषधांची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे औषधसाठा वाढविण्याची मागणी आहे.

अपघातग्रस्त स्थळांवर फलक लावावे

गडचांदूर : जिल्ह्यातील अनेक अपघात प्रवण स्थळांवर फलक नसल्याने वाहनधारकांची पंचायत होत आहे. त्यांना अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अपघात टाळण्यासाठी या स्थळांवर फलक लावण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. विशेषत: राजुरा, कोरपना तालुक्यातील रस्त्यावर फलक नसल्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

क्रीडांगणासाठी जागा अधिग्रहित करावी

सावली : शहराची लोकसंख्या वाढली. शाळा व महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांचे प्रमाण बरेच आहे. परंतु, क्रीडांगण नसल्याने युवक-युवतींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे जागा अधिग्रहित करून तालुका क्रीडांगण निर्माण करण्याची मागणी युवकांनी केली आहे.

महा ई-सेवा केंद्र अत्यल्प

चंद्रपूर : जिल्ह्यात महा ई-सेवा केंद्र तोकडे आहेत. परिणामी महाईसेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हीटवर अवलंबून असल्याने नेटर्वकअभावी अनेकदा चकरा माराव्या लागतात.

बनावट बिलाचा वापर

चंद्रपूर : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार डुप्लीकेट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. अशांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत वाढ

चंद्रपूर : शहरात मागील काही दिवसांपासून अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र याकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस केवळ चारचाकी वाहनांवर अधिक कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे.

रस्त्याअभावी पेंढरी मक्तावासी त्रस्त

सावली : तालुक्यातील पेंढरी (मक्ता) येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मार्ग नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. गावातील स्मशानभूमी गावापासून एक किमी अंतरावर आहे. अनेक वर्षांपासून स्मशानाकडे जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे पेंढरी मक्ता येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या

चंद्रपूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.

खर्रा पन्नीवर बंदी आणण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यात खर्रा घोटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पन्नीचा वापर केला जातो. या पन्या रस्त्यावर फेकुन दिल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. कारवाई हाेत नसल्याने अनेक व्यावसायिक पन्नीचा सर्रास वापर करतात.

जि.प. शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करा

चंद्रपूर : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. परंतु, कॉन्व्हेटमध्ये ऑनलाईन शाळा सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश पालक कॉन्व्हेट संस्कृतीकडे वळत आहेत. पूर्वी जि. प. शाळांना विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे जि. प. शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरु करावे, अशी मागणी होत आहे.