शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनावरचा मळ ग्रंथच दूर करतात

By admin | Updated: February 13, 2016 00:36 IST

जात, धर्म, भाषा, प्रदेश, प्रांतवादाचा मळ मनाला लागू देऊ नका. या विचारांचा मळ चिकटला की माणसाचा राक्षस होतो.

विठ्ठल वाघ : चंद्रपुरात ग्रंथोत्सवाचे उद्घाटनचंद्रपूर : जात, धर्म, भाषा, प्रदेश, प्रांतवादाचा मळ मनाला लागू देऊ नका. या विचारांचा मळ चिकटला की माणसाचा राक्षस होतो. हा मळ दूर करण्याचे काम ग्रंथ च करतात, त्यामुळे ग्रंथांची सोबत सदैव करा, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांनी चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्र्रपूर जिल्हा ग्रंथालय संघ आणि जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीच्यावतीने तीन दिवसीय ग्रंथोत्सवाला स्थानिक ज्युबिली हायस्कूलमध्ये शुक्रवारपासून प्रारंभ झाला. त्याचे उद्घाटन विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र कोरे, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, नागपूर ग्रंथालय संघाचे प्रमुख डॉ.गजानन कोट्टेवार, प्राचार्य इंगोले व मुरलीमनोहर व्यास आदी मंचावर उपस्थित होते.या समारंभात असलेली विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावरील उपस्थिती बघून त्यांचे संपूर्ण भाषण विद्यार्थ्यांभोवती फिरले. ते म्हणाले, संस्कारित व्हा, अभ्यास करा. टिव्हीवरच्या जाहिरातींना भाळू नका. त्या फसव्या असतात. मुळातच सुंदर असणारी ऐश्वर्या राय चेहऱ्याच्या क्रिमची जाहिरात करते. दिवसागणिक गोरी पडत जाणारी त्वचा दाखविली जाते. क्रिममुळे खरेच गोरेपणा येत असे तर क्रिमचा वापर करून गोरी पडलेली एखादी म्हैस दाखवा ना, असे आवाहन त्यांनी केले. चलचित्रांवर विश्वास ठेवू नका, त्यामुळे मनातील राक्षस जागा होतो. चित्र येतात आणि जातात, ते खोलवर रूजत नाहीत. ग्रंथ मात्र मनात खोलवर रूततात, त्यामुळे त्यांचा अंगीकार करा.मराठी जगवा आणि वाढवा असे आवाहन करून ते म्हणाले, मम्मी-पप्पा न म्हणता आईबाबा म्हणा. मराठीपण जपण्यासाठी घरातून सुरूवात करा. वाचाल तर वाचल, असे सांगून ते म्हणाले, वाचनाच्या बळावर या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण मिळाले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख मिळाले. ही सर्व माणसे खेड्यातून आलेली होती. ते प्रवाहाविरूद्ध पोहले आणि समाजाचे दीपस्तंभ झाले. त्यांचे अनुकरण करा आणि पुस्तके-गं्रथांचा आधार घेऊन मोठे व्हा. यावेळी अनिल बोरगमवार यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक मुरलीमनोहर व्यास यांनी केले. संचालन मनीषा गिदेवार तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र्र कोरे यांनी मानले. दरम्यान, दुपारी ‘बालसाहित्य बालकापर्यंत खरोखर पोहचत आहे काय ?’ या विषयावर चंद्रपूरच्या बाल साहित्यिक डॉ.बानो सरताज काजी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडला. यात गडचिरोलीचे प्रा.राज मुसणे, प्राचार्य सविता सादमवार व कोरपणाचे प्रा.सुदर्शन दिवसे यांनी मांडणी केली. (जिल्हा प्रतिनिधी)बकरी व्हाबकरी व्हा, असे आवाहन विठ्ठल वाघ यांनी केले. ते म्हणाले, म्हशी, गाई गवत खातात. मात्र बकरी जे दिसेल ते बकाबका खात सुटते. त्या सर्व खाद्याचे गुणधर्म तिच्या दुधात उतरतात. तिचे दूध आयुर्वेदात सर्वश्रेष्ठ मानले जाते. आयुष्यात बकरीसारखे व्हा. समोर येईल ते बकाबका वाचून काढा. आणि सर्वश्रेष्ठ ज्ञानवंत व्हा. ग्रंथदिंडी निघालीया तीन दिवसीय ग्रंथोत्सवाला ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातून दिंडी निघाली. यात दिंडीमध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यलायाचे विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने सहभागी झाले होते. दिंडीमध्ये मुलींच्या लेझीम पथकापुढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कवी विठ्ठल वाघ यांनी देखील हातात लेझीम घेऊन ठेका धरला होता.