शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापिकेवरील अन्याय दूर करा

By admin | Updated: July 23, 2014 23:32 IST

जिल्ह परिषदेमधील ३० जून २०१४ रोजी झालेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या समुपदेशनानुसार समायोजनात शिक्षण विभागाच्या चुकीमुळे महिला मुख्याध्यापिकेवर अन्याय झाल्याप्रकरणी

निवेदन सादर : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणीचंद्रपूर : जिल्ह परिषदेमधील ३० जून २०१४ रोजी झालेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या समुपदेशनानुसार समायोजनात शिक्षण विभागाच्या चुकीमुळे महिला मुख्याध्यापिकेवर अन्याय झाल्याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करून दोषींविरूद्ध कार्यवाही करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी केली आहे. शिष्टमंडळात राजू लांजेवार, सरचिटणीस उपस्थित होते.पंचायत समिती अंतर्गत कार्यरत उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पंचायत समिती निहाय रुजू तारखेनुसार पात्र-अपात्र यादी प्रकाशित करण्यात आली. यादी उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रकाशित झाल्यामुळे उच्चश्रेणी मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागावर विश्वास ठेवून रुजु तारखेची पडताळणी केली नाही. पंचायत समितीमधील शिक्षण विभागात उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे सेवा पुस्तके उपलब्ध असल्यामुळे त्यामधील रुजू तारीख नोंदीनुसार प्रकाशित यादीत रुजु तारीख प्रकाशित करणे आवश्यक होते.परंतु शिक्षण विभागाच्या सदोष कार्यपद्धतीमुळे पंचायत समितीमध्ये २९ जून २०१२ ला रुजू झालेल्या मुख्याध्यापिकेला १६ मे २००५ ला दाखवून दोन वर्ष झालेला सेवाकाळ ९ वर्षे दर्शविण्यात ाला. त्यामुळे संबंधित उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे समुपदेशनानुसार समायोजन त्याच पंचायत समितीमध्ये न होता ११० कि.मी. अंतरावरील शाळेत करण्यात आले. त्यामुळे उच्चश्रेणी मुख्याध्यापकावर अन्याय झाला असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने म्हटले आहे.शिक्षण विभागाने महिला मुख्याध्यापिकेवर जााणूनबुजून अन्याय केल्याचे परिषदेने म्हटले आहे. चुकीच्या तारखेमुळे महिला मुख्याध्यापिकेवर समुपदेशन प्रक्रियेत अन्याय करण्यात आला. कार्यालयात सेवापुस्तिकेत रुजू तारखेच्या स्पष्ट नोंदी असताना सुद्धा प्रकाशित यादीत चुकीची रुजू तारीख दाखवून मानसिक त्रास देणे सुरू आहे.यापुर्वीसुद्धा संबंधित पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सदोष कार्यपद्धतीमुळे अनेक शिक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. वारंवार शिक्षकांच्या विनाकारण मानसिक त्रास देणारे प्रकार घडणे बंद होणे आवश्यक असल्याचे प्राथमिक शिक्षक परिषदेने म्हटले असून पंचायत समितीच्या सदोष कार्यपद्धतीवर जिल्हा परिषदेने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासन या संदर्भात अन्यायग्रस्त मुख्याध्यापिकेबाबत कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)