शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मुख्याध्यापिकेवरील अन्याय दूर करा

By admin | Updated: July 23, 2014 23:32 IST

जिल्ह परिषदेमधील ३० जून २०१४ रोजी झालेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या समुपदेशनानुसार समायोजनात शिक्षण विभागाच्या चुकीमुळे महिला मुख्याध्यापिकेवर अन्याय झाल्याप्रकरणी

निवेदन सादर : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणीचंद्रपूर : जिल्ह परिषदेमधील ३० जून २०१४ रोजी झालेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या समुपदेशनानुसार समायोजनात शिक्षण विभागाच्या चुकीमुळे महिला मुख्याध्यापिकेवर अन्याय झाल्याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करून दोषींविरूद्ध कार्यवाही करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी केली आहे. शिष्टमंडळात राजू लांजेवार, सरचिटणीस उपस्थित होते.पंचायत समिती अंतर्गत कार्यरत उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पंचायत समिती निहाय रुजू तारखेनुसार पात्र-अपात्र यादी प्रकाशित करण्यात आली. यादी उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रकाशित झाल्यामुळे उच्चश्रेणी मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागावर विश्वास ठेवून रुजु तारखेची पडताळणी केली नाही. पंचायत समितीमधील शिक्षण विभागात उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे सेवा पुस्तके उपलब्ध असल्यामुळे त्यामधील रुजू तारीख नोंदीनुसार प्रकाशित यादीत रुजु तारीख प्रकाशित करणे आवश्यक होते.परंतु शिक्षण विभागाच्या सदोष कार्यपद्धतीमुळे पंचायत समितीमध्ये २९ जून २०१२ ला रुजू झालेल्या मुख्याध्यापिकेला १६ मे २००५ ला दाखवून दोन वर्ष झालेला सेवाकाळ ९ वर्षे दर्शविण्यात ाला. त्यामुळे संबंधित उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे समुपदेशनानुसार समायोजन त्याच पंचायत समितीमध्ये न होता ११० कि.मी. अंतरावरील शाळेत करण्यात आले. त्यामुळे उच्चश्रेणी मुख्याध्यापकावर अन्याय झाला असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने म्हटले आहे.शिक्षण विभागाने महिला मुख्याध्यापिकेवर जााणूनबुजून अन्याय केल्याचे परिषदेने म्हटले आहे. चुकीच्या तारखेमुळे महिला मुख्याध्यापिकेवर समुपदेशन प्रक्रियेत अन्याय करण्यात आला. कार्यालयात सेवापुस्तिकेत रुजू तारखेच्या स्पष्ट नोंदी असताना सुद्धा प्रकाशित यादीत चुकीची रुजू तारीख दाखवून मानसिक त्रास देणे सुरू आहे.यापुर्वीसुद्धा संबंधित पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सदोष कार्यपद्धतीमुळे अनेक शिक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. वारंवार शिक्षकांच्या विनाकारण मानसिक त्रास देणारे प्रकार घडणे बंद होणे आवश्यक असल्याचे प्राथमिक शिक्षक परिषदेने म्हटले असून पंचायत समितीच्या सदोष कार्यपद्धतीवर जिल्हा परिषदेने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासन या संदर्भात अन्यायग्रस्त मुख्याध्यापिकेबाबत कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)