शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

आवारपूर ते संगोडा रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: June 30, 2017 00:52 IST

सहा किमी लांबी असलेला आवारपूर ते सांगोडा या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. वणी बाजारपेठेकडे जाणार हा मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : सहा किमी लांबी असलेला आवारपूर ते सांगोडा या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. वणी बाजारपेठेकडे जाणार हा मार्ग असल्याने दुचाकी व चारचाकी धारकांची सततची रेल चेल असते. तसेच या रस्तावरून सिमेंट कारखान्यातील मालवाहू ट्रक जात असतात. तरीही त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. या मार्गाचा कामगार, शेतकरी, विद्यार्थी, सोबत चंद्रपूर, वणी, यवतमाळ, घुघुस या शहरांकडे जाण्यासाठी उपयोग होत असतो. याच मार्गाने अल्ट्राटेक सिंमेट, माणिकगढ सिमेंट, अंबुजा सिमेंट या कारखान्यातील मालवाहू ट्रकची जड वाहतूक होत असते. त्यामुळे या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. दुचाकी, चारचाकीचालकांना मार्ग काढताना रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावरील उडालेली धूळ ट्रक मागून येणाऱ्या दुचाकीचालकांना डोळ्यात जात असल्याने समोरचे दिसेनासे होते. त्यामध्ये खड्डा चुकीवण्याचा नादात किरकोळ अपघातसुद्धा होत आहेत. पावसळ्यात रस्त्यातील खड्डे जलमय होवून रस्ता दिसेनासे होतात. याकडे लोकप्रतिनिधी व सामाजिक बांधकाम विभाग मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे. हा जीवघेणा त्रास आवारपूर, हिरापूर, संगोडा. अंतरगाव, येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वीच हा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. येत्या १५ दिवसांत कामास सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आवारपूर येथील सरपंच सिंधीताई परचाके, उपसरपंच अविनाश चौधरी व हिरापूर सरपंच प्रमोद कोडापे, सांगोड येथील राजू कोल्हे यांनी दिला आहे. हिरापूर गावालगत मोठे मोठे खड्डे पडले आहे. त्या खड्ड्यातून ट्रक चालकांनासुद्धा ट्रक बाहेर काढण्यास कसरत कारवी लागत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. रोजच या ठिकाणी किरकोळ अपघातसुद्धा होत आहे. या बाबतीत हिरापूर येथील सरपंच कोडापे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देवून दुरूस्तीची मागणी केली. परंतु त्याकडे बांधकाम विभागाने कायमची पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.