शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

संततधार पावासामुळे वीज निर्मिती केंद्राला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 11:54 IST

गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात संततधार पाऊस आल्याने चंद्रपूर वीज केंद्राला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देधरणातील अत्यल्प जलसाठ्यामुळे वीज निर्मिती होती संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इरई धरणातील सातत्याने खालावणाऱ्या पाण्याच्या पातळीने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मिती संकटात सापडली आहे. १५ जुलैपर्यंत पाण्याची पातळी वाढली नाही तर वरिष्ठांना अहवाल पाठवून निर्णय त्यांच्यावर सोपविण्यात येणार होता. मात्र गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात संततधार पाऊस आल्याने चंद्रपूर वीज केंद्राला दिलासा मिळाला आहे.गतवर्षी २०१७ मधील पावसाळ्यात अत्यल्प पाऊस आल्याने इरई धरणात आवश्यक तेवढा पाण्याचा संचय होऊ शकला नाही. मात्र वर्ष २०१० मध्ये वीज केंद्राने धरणाच्या दरवाजांची उंची ५ मीटरने वाढवून २०७ वरून २०६.५ मीटर एवढी केली. म्हणजेच धरणात १८० द.ल.घ.मी. पाण्याचा साठा होईल, एवढी क्षमता वाढविण्यात आली. त्यामुळे वर्ष २०१६ मधील पावसाळ्यात धरणामध्ये वर्ष २०१० वर्षापूर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात पाण्याचा संचय झाला. परिणामी धरणातून यंदा चंद्रपूर शहरासह वीज केंद्राला पाणी मिळाले.उलट वर्ष २०१० मध्ये पाणी टंचाईमुळे उन्हाळ्यातच वीज केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. यंदा उन्हाळ्यातील संकट टळले होते. मात्र पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पाऊस येत नसल्याचे बघून चंद्रपूर जिल्हा प्रशासन झोपेतून खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी वीज केंद्रातील अभियंत्यांसोबत धरणाची पाहणी केली व १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास वीज निर्मिती केंद्र बंद करायचे का, याबाबतचा अहवाल शासनाला व वरिष्ठांना पाठविण्याचा निर्णय घेतला.या उन्हाळ्यात धरणाने २००.२७५ मीटर एवढी निम्न पाण्याची पातळी गाठली होती. अशातच गुरुवारी संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारीही पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत धरणात ०.४०० मीटरने पाण्याची पातळी वाहून ती २००.७२५ मीटर एवढी झाली आहे. म्हणजेच धरणात ३.५७६ दलघमी पाण्याचा संचय झाला असून सद्यस्थितीला २१.५२९ दलघमी पाणी आहे. यामुळे आणखी काही दिवस वीज निर्मिती सुरू राहणार आहे.

टॅग्स :electricityवीज