शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

संततधार पावासामुळे वीज निर्मिती केंद्राला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 11:54 IST

गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात संततधार पाऊस आल्याने चंद्रपूर वीज केंद्राला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देधरणातील अत्यल्प जलसाठ्यामुळे वीज निर्मिती होती संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इरई धरणातील सातत्याने खालावणाऱ्या पाण्याच्या पातळीने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मिती संकटात सापडली आहे. १५ जुलैपर्यंत पाण्याची पातळी वाढली नाही तर वरिष्ठांना अहवाल पाठवून निर्णय त्यांच्यावर सोपविण्यात येणार होता. मात्र गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात संततधार पाऊस आल्याने चंद्रपूर वीज केंद्राला दिलासा मिळाला आहे.गतवर्षी २०१७ मधील पावसाळ्यात अत्यल्प पाऊस आल्याने इरई धरणात आवश्यक तेवढा पाण्याचा संचय होऊ शकला नाही. मात्र वर्ष २०१० मध्ये वीज केंद्राने धरणाच्या दरवाजांची उंची ५ मीटरने वाढवून २०७ वरून २०६.५ मीटर एवढी केली. म्हणजेच धरणात १८० द.ल.घ.मी. पाण्याचा साठा होईल, एवढी क्षमता वाढविण्यात आली. त्यामुळे वर्ष २०१६ मधील पावसाळ्यात धरणामध्ये वर्ष २०१० वर्षापूर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात पाण्याचा संचय झाला. परिणामी धरणातून यंदा चंद्रपूर शहरासह वीज केंद्राला पाणी मिळाले.उलट वर्ष २०१० मध्ये पाणी टंचाईमुळे उन्हाळ्यातच वीज केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. यंदा उन्हाळ्यातील संकट टळले होते. मात्र पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पाऊस येत नसल्याचे बघून चंद्रपूर जिल्हा प्रशासन झोपेतून खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी वीज केंद्रातील अभियंत्यांसोबत धरणाची पाहणी केली व १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास वीज निर्मिती केंद्र बंद करायचे का, याबाबतचा अहवाल शासनाला व वरिष्ठांना पाठविण्याचा निर्णय घेतला.या उन्हाळ्यात धरणाने २००.२७५ मीटर एवढी निम्न पाण्याची पातळी गाठली होती. अशातच गुरुवारी संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारीही पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत धरणात ०.४०० मीटरने पाण्याची पातळी वाहून ती २००.७२५ मीटर एवढी झाली आहे. म्हणजेच धरणात ३.५७६ दलघमी पाण्याचा संचय झाला असून सद्यस्थितीला २१.५२९ दलघमी पाणी आहे. यामुळे आणखी काही दिवस वीज निर्मिती सुरू राहणार आहे.

टॅग्स :electricityवीज