शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

संततधार पावासामुळे वीज निर्मिती केंद्राला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 11:54 IST

गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात संततधार पाऊस आल्याने चंद्रपूर वीज केंद्राला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देधरणातील अत्यल्प जलसाठ्यामुळे वीज निर्मिती होती संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इरई धरणातील सातत्याने खालावणाऱ्या पाण्याच्या पातळीने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मिती संकटात सापडली आहे. १५ जुलैपर्यंत पाण्याची पातळी वाढली नाही तर वरिष्ठांना अहवाल पाठवून निर्णय त्यांच्यावर सोपविण्यात येणार होता. मात्र गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात संततधार पाऊस आल्याने चंद्रपूर वीज केंद्राला दिलासा मिळाला आहे.गतवर्षी २०१७ मधील पावसाळ्यात अत्यल्प पाऊस आल्याने इरई धरणात आवश्यक तेवढा पाण्याचा संचय होऊ शकला नाही. मात्र वर्ष २०१० मध्ये वीज केंद्राने धरणाच्या दरवाजांची उंची ५ मीटरने वाढवून २०७ वरून २०६.५ मीटर एवढी केली. म्हणजेच धरणात १८० द.ल.घ.मी. पाण्याचा साठा होईल, एवढी क्षमता वाढविण्यात आली. त्यामुळे वर्ष २०१६ मधील पावसाळ्यात धरणामध्ये वर्ष २०१० वर्षापूर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात पाण्याचा संचय झाला. परिणामी धरणातून यंदा चंद्रपूर शहरासह वीज केंद्राला पाणी मिळाले.उलट वर्ष २०१० मध्ये पाणी टंचाईमुळे उन्हाळ्यातच वीज केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. यंदा उन्हाळ्यातील संकट टळले होते. मात्र पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पाऊस येत नसल्याचे बघून चंद्रपूर जिल्हा प्रशासन झोपेतून खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी वीज केंद्रातील अभियंत्यांसोबत धरणाची पाहणी केली व १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास वीज निर्मिती केंद्र बंद करायचे का, याबाबतचा अहवाल शासनाला व वरिष्ठांना पाठविण्याचा निर्णय घेतला.या उन्हाळ्यात धरणाने २००.२७५ मीटर एवढी निम्न पाण्याची पातळी गाठली होती. अशातच गुरुवारी संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारीही पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत धरणात ०.४०० मीटरने पाण्याची पातळी वाहून ती २००.७२५ मीटर एवढी झाली आहे. म्हणजेच धरणात ३.५७६ दलघमी पाण्याचा संचय झाला असून सद्यस्थितीला २१.५२९ दलघमी पाणी आहे. यामुळे आणखी काही दिवस वीज निर्मिती सुरू राहणार आहे.

टॅग्स :electricityवीज