शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

गोसेखुर्दचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:11 IST

तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणाºया वैनगंगा नदीचे पात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे कोरडे पडले आहे. त्यामुळे ३१ गावांकरिता असलेली जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना प्रभावित झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मिळणार नवसंजीवनी : प्रभावित पाणी पुरवठा पुनरुज्जीवित होण्याची शक्यता

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणाºया वैनगंगा नदीचे पात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे कोरडे पडले आहे. त्यामुळे ३१ गावांकरिता असलेली जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना प्रभावित झाली आहे. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडल्यास अनेक गावांतील पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनानेही हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेंतर्गत तालुक्यातील ३१ गावांना पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने वैनगंगा नदीत पाण्याचा साठा कायम राहू शकला नाही. वैनगंगा नदीतील पाण्यावर मूल शहरासोबत तालुक्यातच तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. दरवर्षी ग्रामस्थांना लाखो लिटर पाणी देणारी वैनगंगा नदी आता स्वत: पाण्यासाठी टाहो फोडताना दिसत आहे. तिच्या पात्रातच पाणी नसल्याने तीच असहाय्य असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत लाखो रुपये खर्चुन १९ गावांकरिता बोरचांदली, आठ गावांकरिता बेंबाळ व पाच गावांकरिता टेकाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना १५ वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली. मूल शहराबरोबरच ३१ गावांना पाणी पुरवठा करणे शक्य होत नसल्याने पर्यायी व्यवस्था होणे गरजेचे आहे. ऐन मे महिन्याच्या तप्त उन्हात पाण्याची नितांत आवश्यकता असताना वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी नाही. त्यामुळे गावागावांत पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. यासोबतच सावली तालुक्यातील लोंढोली गावाजवळील वैनगंगा नदीवर लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्याचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यात पाणी साठवणूक सुरू आहे. त्यामुळे बॅरेजच्या आतील वैनगंगेचे पात्र पूर्णता कोरडे पडल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत १९ गावांकरिता असलेल्या बोरचांदली येथील योजनेची पाईप लाईन १५ वर्ष जुनी असल्याने ठिकठिकाणी लिकेज झाली आहे. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याबाबत संबंधित कंत्राटदाराला प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. दुुर्लक्षितपणामुळे ऐन टंचाईच्या काळात लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे.जिल्हा परिषद चंद्रपूरच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ७२ (७२) गावांना पाणीपुरवठा केला जातो. सदर योजना वैनगंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदीचे पात्र कोरडे पडले आहे. गोसेखुर्दचे पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्याविषयी प्रशासनाने प्रयत्न केल्यास ७२ गाव व स्वतंत्र्य ग्रामीण पुरवठा योजनेच्या शेकडो गावातील पाणी पुरवठा पुनर्जीवित होऊन पाणी समस्या सुटण्यास मदत होईल.-जी. एम. बरसागडे, उपविभागीय अभियंता, सिंदेवाही उपविभाग जि.प. चंद्रपूर

टॅग्स :water shortageपाणीटंचाई