शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:11 IST

तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणाºया वैनगंगा नदीचे पात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे कोरडे पडले आहे. त्यामुळे ३१ गावांकरिता असलेली जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना प्रभावित झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मिळणार नवसंजीवनी : प्रभावित पाणी पुरवठा पुनरुज्जीवित होण्याची शक्यता

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणाºया वैनगंगा नदीचे पात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे कोरडे पडले आहे. त्यामुळे ३१ गावांकरिता असलेली जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना प्रभावित झाली आहे. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडल्यास अनेक गावांतील पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनानेही हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेंतर्गत तालुक्यातील ३१ गावांना पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने वैनगंगा नदीत पाण्याचा साठा कायम राहू शकला नाही. वैनगंगा नदीतील पाण्यावर मूल शहरासोबत तालुक्यातच तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. दरवर्षी ग्रामस्थांना लाखो लिटर पाणी देणारी वैनगंगा नदी आता स्वत: पाण्यासाठी टाहो फोडताना दिसत आहे. तिच्या पात्रातच पाणी नसल्याने तीच असहाय्य असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत लाखो रुपये खर्चुन १९ गावांकरिता बोरचांदली, आठ गावांकरिता बेंबाळ व पाच गावांकरिता टेकाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना १५ वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली. मूल शहराबरोबरच ३१ गावांना पाणी पुरवठा करणे शक्य होत नसल्याने पर्यायी व्यवस्था होणे गरजेचे आहे. ऐन मे महिन्याच्या तप्त उन्हात पाण्याची नितांत आवश्यकता असताना वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी नाही. त्यामुळे गावागावांत पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. यासोबतच सावली तालुक्यातील लोंढोली गावाजवळील वैनगंगा नदीवर लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्याचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यात पाणी साठवणूक सुरू आहे. त्यामुळे बॅरेजच्या आतील वैनगंगेचे पात्र पूर्णता कोरडे पडल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत १९ गावांकरिता असलेल्या बोरचांदली येथील योजनेची पाईप लाईन १५ वर्ष जुनी असल्याने ठिकठिकाणी लिकेज झाली आहे. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याबाबत संबंधित कंत्राटदाराला प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. दुुर्लक्षितपणामुळे ऐन टंचाईच्या काळात लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे.जिल्हा परिषद चंद्रपूरच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ७२ (७२) गावांना पाणीपुरवठा केला जातो. सदर योजना वैनगंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदीचे पात्र कोरडे पडले आहे. गोसेखुर्दचे पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्याविषयी प्रशासनाने प्रयत्न केल्यास ७२ गाव व स्वतंत्र्य ग्रामीण पुरवठा योजनेच्या शेकडो गावातील पाणी पुरवठा पुनर्जीवित होऊन पाणी समस्या सुटण्यास मदत होईल.-जी. एम. बरसागडे, उपविभागीय अभियंता, सिंदेवाही उपविभाग जि.प. चंद्रपूर

टॅग्स :water shortageपाणीटंचाई