शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिकडून मुंगोली गावाचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 21:53 IST

मुंगोली गावाचे पुनर्वसनासाठी मागील एक दशकापासून नागरिकाच्या संघषार्नंतर वेकोलिने गावाच्या पुनर्वसनाकरिता ६० कोटींची तरतूद करून ५.१८ हेक्टर भूसंपादन केली. संपादित भूखंडाचा मोबदला देऊन मुंगोली गाव पुनर्वसन क्षेत्राचा दोन दिवसांपूर्वी फलकही लावला.

ठळक मुद्दे६० कोटींची तरतूदकुर्ली गावाजवळ होणार पुनर्वसन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणी व निगुर्डा डीप कोळसा खाणीच्या विस्तारीकरणामुळे मुंगोली गावात विविध समस्या निर्माण झाल्या. मुंगोली गावाचे पुनर्वसनासाठी मागील एक दशकापासून नागरिकाच्या संघषार्नंतर वेकोलिने गावाच्या पुनर्वसनाकरिता ६० कोटींची तरतूद करून ५.१८ हेक्टर भूसंपादन केली. संपादित भूखंडाचा मोबदला देऊन मुंगोली गाव पुनर्वसन क्षेत्राचा दोन दिवसांपूर्वी फलकही लावला.वेकोलिचा २५ वर्षांपूवीर्चा मुंगोली कोळसा खाण हा मोठा प्राजेक्ट होता. त्यासाठी मुंगोली व आजूबाजूच्या साखरा, कोलगाव, शिवणी शिवारातील शेतजमिनी वेकोलिने संपादित केल्या. मात्र जसजसा कोळसा खाणीचा विस्तार झाला, तसतशा जमिनी संपादित केल्या. त्यानंतर निगुर्डा डीप कोळसा खाण सुरू झाली. कोळसा खाणीमुळे त्या परिसरातील उर्वरित शेतजमिनी सोडून दिल्या. त्यामुळे शेतमालाचे उत्पादन पुरेशे होत नव्हते. कोळसा खाणीच्या ब्लास्टिंगमुळे घरावर दगड पडणे, प्रदूषण, पाणी टंचाई, गावात आजार पसरणे, विशेषत: कोळसा खाणीचे ओव्हर बर्डन (मातीचे ढिगारे) वर्धा नदी किनाऱ्यावर टाकल्याने नदीच्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. अशा विविध समस्या निर्माण झाल्याने सातशे लोकसंख्या असलेल्या मुंगोली गावाचे पुनर्वसन व्हावे व गाव परिसरातील शेतजमिनी संपादित करण्याची मागणी करण्यात आली.

जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, वेकोलि यांच्या वेळोवेळी संयुक्त बैठका झाल्या आणि सुटलेल्या शेतजमिनी वेकोलिने संपादित केल्या. सदर कोळसा खाणीसाठी ३२८ हेक्टर शेतजमिनी संपादित केल्या. शेत जमिनीचा प्रश्न सुटला असला तरी मुंगोली गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळत राहिला. तत्कालीन सरपंच रुपेश ठाकरे व त्यांचे सहकारी यांनी गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न उचलून धरला. वेळोवेळी वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या भेटी, चर्चेच्या माध्यमातून तर कधी आंदोलने करून कायद्याच्या मागार्ने पुनर्वसनाची मागणी रेटून धरली. अखेर पुनर्वसनासाठी जागा निश्चित झाली. तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेकोलिला सादर केला.असा आहे प्रस्तावमुंगोली गावापासून सुमारे १५ किमी अंतरावर ग्रामस्थांनी निश्चित केलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया व गावाच्या पुनर्वसनासाठी वेकोलिने ५९.७७ कोटींचा प्रस्ताव मंजूर केला.आणि पुनर्वसनाकरिता ५.१८ हेक्टर भूमी संपादनाची प्रक्रिया सुरू केली. २७ ऑगस्टला जमिनीच्या विक्री व सप्टेंबर महिन्यात संपादित भूमीचा मोबदला दिला व बुधवारी पुनर्वसन जागेवर फलक लावला. तब्बल एका दशकानंतर मुंगोली गावाच्या पुनर्वसनाचे स्वप्न पूर्ण झाले. पुनर्वसनानंतर तालुक्याचे अंतर कमी होणार असून प्रदूषणरहित गाव गावकऱ्यांना मिळणार आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक