शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

पुनर्वसित गावाची सिंचन योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:00 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मानव व वाघाचा संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा कोअर झोन क्षेत्रात वसलेल्या नवेगावचे सन २०१३ मध्ये खडसंगी जवळ पुनर्वसन करण्यात आले.

ठळक मुद्देआयडल पुनर्वसित नवेगाववासीयांची प्रतीक्षा : २ कोटी ६० लाखांची योजना थंडबस्त्यात

राजकुमार चुनारकर ।आॅनलाईन लोकमतचिमूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मानव व वाघाचा संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा कोअर झोन क्षेत्रात वसलेल्या नवेगावचे सन २०१३ मध्ये खडसंगी जवळ पुनर्वसन करण्यात आले. नागरिकांना प्राथमिक सुविधांसह शेतीसाठी सिंचन व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले गेले. येथे २ कोटी ६० लाख रुपयांची सिंचन योजना मंजुरही करण्यात आली. पण या योजनेचे काम रखडल्याने ही योजना अपूर्णच आहे. दीड वर्षांपासून काम बंद असल्याने येत्या हंगामात तरी शेतीला पाणी देणार काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगली प्राण्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. वाघाच्या शिकारीचे प्रमाणही वाढले. त्यामुळे मानव व वाघांचा संघर्ष टाळण्यासाठी शासनाने कोअर झोनमधील गावाचे पुनर्वसन केले. त्यामध्ये चिमूर तालुक्यातील नवेगाव व जामनी या दोन गावांचे पुनर्वसन सन २०१३ मध्ये करण्यात आले होते.पुनर्वसित नवेगाव, जामणी या गावांना प्राथमिक सुविधांपासून शेतीला पाण्याची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी शासनाची होती. शेती म्हणून जी जागा देण्यात आली त्या ठिकाणी संपूर्ण जंगल होते. त्यामुळे ही जमीन सपाट करताना शेतकºयांनी झाडे कापली. यामुळे या शेतीवर दोन वर्ष पीक घेता आले नाही. आता उत्पन्न घेण्याची वेळ आली तर सिचनांची सोय नाही. त्यामुळे नवेगाव येथील शेतकरी पुनर्वसन होवूनही संकटातच आहे.नवेगाव येथील १११ शेतकऱ्यांसाठी शासनाने विदर्भ सिंचन विकास महामंडळ योजने अंतर्गत २ कोटी ६० लाख रूपयांची सिंचन योजना मंजूर करून काम सुरू केले. याकरिता मुरपार भूमिगत कोळसा खाणीतून येणारे वेस्टेज पाणी खोडदा नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाºयात अडवून शेतीला देण्यात येणार होते. खोडदा नाल्यावर बांध बांधून नवेगावपर्यत पाईपलाईन टाकण्यात आली आहे.ही योजना पूर्ण करण्यासाठी तीन कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले होते. त्यात पाईपलाईन, बंधारा, पंप हाऊस, विहीर ही कामे करण्याचे कत्रांट हरिहरण कंपनीला देण्यात आले होते. यापैकी बऱ्याच प्रमाणात कामे पूर्ण झाली आहेत. मात्र कंत्राटदाराला पुढची देयके न दिल्याने काम बंद पडले आहे. तसेच थ्री फेज लाईन, मोटार पंप, वितरण पाईपलाईन आदी कामे करण्याचे कंत्राट एस. एम. हकीम कंपनीला तथा वितरण व्यवस्थेचे काम दुसºया कंपनीला देण्यात आले. या कंत्राटदारांनी पुढले बिल न मिळाल्याने एक वर्षभरापासून काम बंद ठेवले आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे आयडल पुनर्वसन ठरवलेल्या नवेगाव येथील शेतकºयांना पाण्याविना शेतीचे उत्पादन घेता येत नाही. वनविभागाचे तत्कालीन सचिव प्रवीण परदेशी यांनी नवेगाव पुनर्वसन हे देशातील आयडल पुर्नवसन गाव असल्याचे सांगून वन अधिकाऱ्यांचा गौरवही केला होता. मात्र चार वर्षांनंतरही येथील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.पुनर्वसित नवेगाव येथील शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून विदर्भ सिंचन महामंडळाची योजना प्रस्तावित करून काम सुरू केले. या योजनेचे ८० ते ९० टक्के काम पूर्ण झाले. मात्र कंत्राटदारांना देयके न मिळाल्याने कॅनल, इलेक्ट्रीक फिटींग व टेस्टींगचे काम शिल्लक आहे. याकरिता मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनही निधी मिळाला. त्यामुळे ही योजना रखडली आहे.- अजहर शेख, पं.स. सदस्य तथा अध्यक्ष पुनर्वसन समितीनवेगाव (चिमूर).