शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

घाणीने माखलेल्या एसटी बसगाड्यांची आता नियमित स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:34 IST

गाव तेथे एसटी, एसटीचा प्रवास-सुखकर प्रवास म्हणत ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ ब्रिद घेऊन जनतेच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाला सध्या प्रवासी मिळानासे झाले आहेत.

ठळक मुद्देएसटी महामंडळाचा उपक्रम : खर्ऱ्याच्या पिचकाऱ्या धुवून काढण्याची अशीही ‘गांधीगिरी’

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गाव तेथे एसटी, एसटीचा प्रवास-सुखकर प्रवास म्हणत ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ ब्रिद घेऊन जनतेच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाला सध्या प्रवासी मिळानासे झाले आहेत. प्रवासी संख्या वाढावी, म्हणून विविध उपययोजनाही केल्या जात आहेत. मात्र भंगार बसगाड्या व बसमधील खर्ऱ्याच्या पिचकाऱ्या, अस्वच्छता यामुुळे अनेक प्रवाशी एसटीचा प्रवास टाळतात. त्यामुळे स्वच्छतेसाठी परिवहन महामंडळाने पुढाकार घेतला असून घाणीने माखलेल्या बसगाड्यांची नियमित स्वच्छता केली जात आहे.राज्य महापरिवहन महामंडळातर्फे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातंर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी परिवहन महामंडळाने एका खासगी कंपनीला स्वच्छतेचे कंत्राट दिले असून या कंपनीच्या मार्फत महामंडळाच्या बसगाड्यांची व परिसराची नियमित स्वच्छता करण्यात येत आहे. महामंडाळाच्या बसगाड्या म्हणजे शासकीय मालमत्ता असा समज जनसामान्यात असल्याने कोणतीही पर्वा न करता अनेक प्रवासी बसगाडीत धुम्रपान करतात. खर्ऱ्याच्या पिचकाऱ्या मारतात. तर काही मुंगफल्ली व इतर खाद्यपदार्थाच्या पिशव्या सीटखालीच टाकून देतात.या अस्वच्छतेमुळेच अनेकांना प्रवासामध्ये उलटी येत असते. त्यामुळे महामंडळाने बसची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली आहे. चंद्रपूर आगारातील ९६ बसगाड्या व इतर आगारातून येणाऱ्या बसगाड्यांची नियमीत साफसफाई तसेच पाणी मारुन स्वच्छता केली जात आहे. यात चंद्रपूर आगारामध्ये येणाऱ्या दररोज १०० च्या जवळपास बसगाड्या स्वच्छ होत असून ४० बसगाड्या पाण्याने धुऊन काढण्यात येत आहेत. त्यामुळे महामंडाळाच्या बसगाड्यातील अस्वच्छता दूर होत आहे.प्रवाशांच्या सहकार्याची गरजपरिवहन महामंडळाच्या उपक्रमातून बसची दररोज स्वच्छता केली जात आहे. मात्र त्यानंतरही काही प्रवासी बसमध्येच खर्रा खाऊन धुम्रपान करतात. त्यामुळे बसगाड्या पुन्हा खराब होताना दिसून येत आहेत. त्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करण्याची गरज असल्याने एसटी महामंडळाच्या चालक-वाहकाचे म्हणणे आहे.