शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास निधीत २ हजार ३०१ कोटींची कपात; १६ आदिवासी जिल्ह्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 16:58 IST

२०२०-२१ च्या अर्थसंकल्पापासून आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळणे दुरापास्त झाले. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातही निधी कपात केल्याने आदिवासी विकासाला माेठा फटका बसणार आहे.

ठळक मुद्देवार्षिक योजना निकषांना बगल

चंद्रपूर : सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागासाठी निकषानुसार अत्यावश्यक असलेली आर्थिक तरतूद न करता २ हजार ३०५ कोटींची कपात करण्यात आली. त्यामुळे राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांच्या कल्याणकारी योजनांवर अनिष्ट परिणाम होणार आहे.

अविकसित भागात राहणाऱ्या आदिवासींची स्थिती सुधारण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने मुख्य सचिव दे. ग. सुखठणकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी उपयोजना क्षेत्रातील माडा व मिनी माडा भागानुसार आर्थिक तरतुदींची शिफारस केली. त्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात राज्याच्या वार्षिक योजनेतून व लोकसंख्येच्या आधारावर आदिवासी विकास विभागाला निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पापासून आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळणे दुरापास्त झाले. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातही निधी कपात केल्याने आदिवासी विकासाला माेठा फटका बसणार आहे.

आदिवासी लोकसंख्येनुसार हवे १३ हजार ५०० कोटी

२०२२-२३ ची राज्याची वार्षिक योजना १ लाख ५० हजार कोटींची आहे. महाराष्ट्रात आजमितीला आदिवासींची लोकसंख्या ९.०४ टक्के आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभागासाठी १३ हजार ५०० कोटी तरतूद हवी होती. मात्र, प्रत्यक्षात ११ हजार १९९ कोटी म्हणजे २ हजार ३०१ कोटी कमी आहेत. याबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख अरुण नवले, माजी जि. प. सभापती नीलकंठ कोरांगे, ॲड. श्रीनिवास मुसळे, प्रा. ज्योत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरंजने, प्रा. नीळकंठ गौरकर, दादाराव नवलाखे, ॲड. शरद कारेकर, दिनकर डोहे, पी. यू. बोंडे, डॉ. संजय लोहे आदींनी केली आहे.

राज्याच्या वार्षिक योजनेतून लोकसंख्येच्या प्रमाणात व लोकसंख्येच्या आधारावर आदिवासी विकास विभागाला निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण महाराष्ट्रात मान्य झाले. मात्र, २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने केलेला अन्याय निधीची तरतूद करून दूर करावा.

ॲड. वामनराव चटप, माजी आमदार, चंद्रपूर

टॅग्स :Governmentसरकारfundsनिधी