शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आदिवासी विकास निधीत २ हजार ३०१ कोटींची कपात; १६ आदिवासी जिल्ह्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 16:58 IST

२०२०-२१ च्या अर्थसंकल्पापासून आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळणे दुरापास्त झाले. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातही निधी कपात केल्याने आदिवासी विकासाला माेठा फटका बसणार आहे.

ठळक मुद्देवार्षिक योजना निकषांना बगल

चंद्रपूर : सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागासाठी निकषानुसार अत्यावश्यक असलेली आर्थिक तरतूद न करता २ हजार ३०५ कोटींची कपात करण्यात आली. त्यामुळे राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांच्या कल्याणकारी योजनांवर अनिष्ट परिणाम होणार आहे.

अविकसित भागात राहणाऱ्या आदिवासींची स्थिती सुधारण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने मुख्य सचिव दे. ग. सुखठणकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी उपयोजना क्षेत्रातील माडा व मिनी माडा भागानुसार आर्थिक तरतुदींची शिफारस केली. त्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात राज्याच्या वार्षिक योजनेतून व लोकसंख्येच्या आधारावर आदिवासी विकास विभागाला निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पापासून आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळणे दुरापास्त झाले. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातही निधी कपात केल्याने आदिवासी विकासाला माेठा फटका बसणार आहे.

आदिवासी लोकसंख्येनुसार हवे १३ हजार ५०० कोटी

२०२२-२३ ची राज्याची वार्षिक योजना १ लाख ५० हजार कोटींची आहे. महाराष्ट्रात आजमितीला आदिवासींची लोकसंख्या ९.०४ टक्के आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभागासाठी १३ हजार ५०० कोटी तरतूद हवी होती. मात्र, प्रत्यक्षात ११ हजार १९९ कोटी म्हणजे २ हजार ३०१ कोटी कमी आहेत. याबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख अरुण नवले, माजी जि. प. सभापती नीलकंठ कोरांगे, ॲड. श्रीनिवास मुसळे, प्रा. ज्योत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरंजने, प्रा. नीळकंठ गौरकर, दादाराव नवलाखे, ॲड. शरद कारेकर, दिनकर डोहे, पी. यू. बोंडे, डॉ. संजय लोहे आदींनी केली आहे.

राज्याच्या वार्षिक योजनेतून लोकसंख्येच्या प्रमाणात व लोकसंख्येच्या आधारावर आदिवासी विकास विभागाला निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण महाराष्ट्रात मान्य झाले. मात्र, २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने केलेला अन्याय निधीची तरतूद करून दूर करावा.

ॲड. वामनराव चटप, माजी आमदार, चंद्रपूर

टॅग्स :Governmentसरकारfundsनिधी