शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

वाहनधारकांकडून केली १९.५६ लाखांची वसुली

By admin | Updated: October 16, 2015 01:25 IST

वाहन चालविण्याबाबत कितीही कठोर नियम असले तरी वाहनधारकांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी केलीच जात नसल्याचे चित्र आहे.

आठ महिन्यांतील कारवाई : ९० टक्के वाहनधारकांकडून होतेयं नियमांचे उल्लंघनचंद्रपूर: वाहन चालविण्याबाबत कितीही कठोर नियम असले तरी वाहनधारकांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी केलीच जात नसल्याचे चित्र आहे. गेल्या आठ महिन्यात चंद्रपूरच्या वाहतूक शाखेने १९ हजार ३९० वाहनांवर कारवाई करून वाहनधारकांकडून १९ लाख ५६ हजार १७१ रुपयांचा दंड वसुल केला. चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नेहमीच चंद्रपुरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्याने वाहन चालविताना काही नियम तयार करण्यात आले आहे. वाहन चालविताना कोणतीही दुर्घटना होऊ नये, किंवा कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्याचा प्रसंग येऊ नये, हा ते नियम बनविण्यामागील उद्देश आहे. परंतु ९० टक्के लोकांकडून नियमांचे पालनच केले जात नसल्याचे दिसून येत आहे. वाहन चालविण्याचा परवाना देताना प्रादेशिक परिवहन विभागाकडून चालकाला नियमांबाबत अवगत केले जाते. त्याच्या हातून कुठलाही अपघात होऊ नये, यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन केले जाते. मात्र नंतर वाहनचालकाला त्या नियमाचा विसर पडतो. रस्त्यावरून वाहन चालविताना नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. परंतु वाहनचालकांवर या कारवाईचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही.केवळ चंद्रपूर शहरातील कारवाईच्या आकडेवारीवरून नजर फिरविली असता, येथे वाहनचालकांकडून किती मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन केले जाते. ही बाब लक्षात येते. चंद्रपूर येथील वाहतूक शाखेने गेल्या आठ महिन्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १९ हजार ३९० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून १९ लाख ५६ हजार १७१ रुपयांचा दंड वसुल केला. चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, चेहऱ्या स्कार्फ बांधून वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, ट्रीपल सीट वाहन चालविणे, ध्वनी आणि वायू प्रदूषण करणे आदींबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाकडून अनेकदा कारवाईची मोहिम आरंभली जाते. अनियंत्रीत वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत. मात्र या उपरांतही वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. गंभीर बाब म्हणजे नियम तोडणाऱ्यांमध्ये युवावर्गाचा अधिक समावेश आहे. वेगाने वाहने चालविण्याचा प्रकार शहरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातूनच अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. (प्रतिनिधी)