शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

वाहनधारकांकडून केली १९.५६ लाखांची वसुली

By admin | Updated: October 16, 2015 01:25 IST

वाहन चालविण्याबाबत कितीही कठोर नियम असले तरी वाहनधारकांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी केलीच जात नसल्याचे चित्र आहे.

आठ महिन्यांतील कारवाई : ९० टक्के वाहनधारकांकडून होतेयं नियमांचे उल्लंघनचंद्रपूर: वाहन चालविण्याबाबत कितीही कठोर नियम असले तरी वाहनधारकांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी केलीच जात नसल्याचे चित्र आहे. गेल्या आठ महिन्यात चंद्रपूरच्या वाहतूक शाखेने १९ हजार ३९० वाहनांवर कारवाई करून वाहनधारकांकडून १९ लाख ५६ हजार १७१ रुपयांचा दंड वसुल केला. चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नेहमीच चंद्रपुरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्याने वाहन चालविताना काही नियम तयार करण्यात आले आहे. वाहन चालविताना कोणतीही दुर्घटना होऊ नये, किंवा कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्याचा प्रसंग येऊ नये, हा ते नियम बनविण्यामागील उद्देश आहे. परंतु ९० टक्के लोकांकडून नियमांचे पालनच केले जात नसल्याचे दिसून येत आहे. वाहन चालविण्याचा परवाना देताना प्रादेशिक परिवहन विभागाकडून चालकाला नियमांबाबत अवगत केले जाते. त्याच्या हातून कुठलाही अपघात होऊ नये, यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन केले जाते. मात्र नंतर वाहनचालकाला त्या नियमाचा विसर पडतो. रस्त्यावरून वाहन चालविताना नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. परंतु वाहनचालकांवर या कारवाईचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही.केवळ चंद्रपूर शहरातील कारवाईच्या आकडेवारीवरून नजर फिरविली असता, येथे वाहनचालकांकडून किती मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन केले जाते. ही बाब लक्षात येते. चंद्रपूर येथील वाहतूक शाखेने गेल्या आठ महिन्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १९ हजार ३९० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून १९ लाख ५६ हजार १७१ रुपयांचा दंड वसुल केला. चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, चेहऱ्या स्कार्फ बांधून वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, ट्रीपल सीट वाहन चालविणे, ध्वनी आणि वायू प्रदूषण करणे आदींबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाकडून अनेकदा कारवाईची मोहिम आरंभली जाते. अनियंत्रीत वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत. मात्र या उपरांतही वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. गंभीर बाब म्हणजे नियम तोडणाऱ्यांमध्ये युवावर्गाचा अधिक समावेश आहे. वेगाने वाहने चालविण्याचा प्रकार शहरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातूनच अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. (प्रतिनिधी)