शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीत अधिकाऱ्यांचा अडसर

By admin | Updated: August 5, 2014 23:41 IST

शासनाने अनेक विकास योजना आखल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही ११ महिन्यांसाठी राहते.

चंद्रपूर : शासनाने अनेक विकास योजना आखल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही ११ महिन्यांसाठी राहते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचा अभिप्राय दिल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पुनर्नियुक्ती दिली जाते. मात्र जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या कर्मचाऱ्यांच्या अभिप्रायासाठी काही अधिकारी पैशाची मागणी करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गुणवत्ता असूनही अनेकांना पैसे देऊन आपली नोकरी वाचवावी लागत आहे. या प्रकारामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे.राज्य तसेच केंद्र शासनाने ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांच्या विकासासाठी विविध योजना आखल्या आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांचा विकास व्हावा, प्रत्येकांना सुविधा मिळावी हा हेतू असला तरी, काही अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे या योजनांचा बट्ट्याबोळ वाजत आहे.सध्या मागास क्षेत्र विकास कार्यक्रम, संपूर्ण स्वच्छता अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामीण जिवन्नोती अभियान, निर्मल भारत अभियान, पानलोट विकास कार्यक्रम, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आदी विविध योंजनांमध्ये शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती केली आहे. अकरा महिन्याच्या कंत्राटी स्वरुपातील नोकरीमध्ये या कर्मचाऱ्यांना मानधन दिल्या जाते. या व्यतिरिक्त त्यांना इतर कोणतेही भत्ते वा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे त्यांना मोठी अडचण सहन करीत जीवन जगावे लागत आहे. यातही अनेक कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करून आपली जबाबदारी पूर्ण करीत आहे. मात्र अकरा महिन्यानंतर त्यांच्या कामाचा अभिप्राय अधिकारी देत असून त्यानंतरच त्यांना पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा होतो. मात्र यासाठी जिल्ह्यातील काही तालुक्यातील अधिकारी त्यांना आडकाठी आणत आहे. अनेकवेळा त्यांच्याकडे पैशाची मागणी करीत त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंत्राटी स्वरुपातील नोकरी असल्याने कोणतीही हमी नाही. त्यामुळे नोकरी टिकविण्यासाठी अधिकारी म्हणेल तसेच त्यांना करावे लागत आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांची अद्यापही कोणतीही संघटना नसल्याने तसेच नोकरीची भिती असल्याने कोणीही कर्मचारी या विरुध्द आवाज उठवत नाही. मात्र सध्या या कर्मचाऱ्यांची ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ अशी अवस्था झाली आहे. अनेक कर्मचारी या योजना नियोजनबद्ध पद्तीने राबवून आपले काम व्यवस्थीत करीत आहे. मात्र काही अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याने या कर्मचाऱ्यांचेही मनोधैर्य खचत आहे. (नगर प्रतिनिधी)