शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीत अधिकाऱ्यांचा अडसर

By admin | Updated: August 5, 2014 23:41 IST

शासनाने अनेक विकास योजना आखल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही ११ महिन्यांसाठी राहते.

चंद्रपूर : शासनाने अनेक विकास योजना आखल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही ११ महिन्यांसाठी राहते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचा अभिप्राय दिल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पुनर्नियुक्ती दिली जाते. मात्र जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या कर्मचाऱ्यांच्या अभिप्रायासाठी काही अधिकारी पैशाची मागणी करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गुणवत्ता असूनही अनेकांना पैसे देऊन आपली नोकरी वाचवावी लागत आहे. या प्रकारामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे.राज्य तसेच केंद्र शासनाने ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांच्या विकासासाठी विविध योजना आखल्या आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांचा विकास व्हावा, प्रत्येकांना सुविधा मिळावी हा हेतू असला तरी, काही अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे या योजनांचा बट्ट्याबोळ वाजत आहे.सध्या मागास क्षेत्र विकास कार्यक्रम, संपूर्ण स्वच्छता अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामीण जिवन्नोती अभियान, निर्मल भारत अभियान, पानलोट विकास कार्यक्रम, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आदी विविध योंजनांमध्ये शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती केली आहे. अकरा महिन्याच्या कंत्राटी स्वरुपातील नोकरीमध्ये या कर्मचाऱ्यांना मानधन दिल्या जाते. या व्यतिरिक्त त्यांना इतर कोणतेही भत्ते वा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे त्यांना मोठी अडचण सहन करीत जीवन जगावे लागत आहे. यातही अनेक कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करून आपली जबाबदारी पूर्ण करीत आहे. मात्र अकरा महिन्यानंतर त्यांच्या कामाचा अभिप्राय अधिकारी देत असून त्यानंतरच त्यांना पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा होतो. मात्र यासाठी जिल्ह्यातील काही तालुक्यातील अधिकारी त्यांना आडकाठी आणत आहे. अनेकवेळा त्यांच्याकडे पैशाची मागणी करीत त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंत्राटी स्वरुपातील नोकरी असल्याने कोणतीही हमी नाही. त्यामुळे नोकरी टिकविण्यासाठी अधिकारी म्हणेल तसेच त्यांना करावे लागत आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांची अद्यापही कोणतीही संघटना नसल्याने तसेच नोकरीची भिती असल्याने कोणीही कर्मचारी या विरुध्द आवाज उठवत नाही. मात्र सध्या या कर्मचाऱ्यांची ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ अशी अवस्था झाली आहे. अनेक कर्मचारी या योजना नियोजनबद्ध पद्तीने राबवून आपले काम व्यवस्थीत करीत आहे. मात्र काही अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याने या कर्मचाऱ्यांचेही मनोधैर्य खचत आहे. (नगर प्रतिनिधी)