शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सिंदेवाही बसस्थानक समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:42 IST

चंद्रपूर ते नागपूर मार्गावर स्थानिक शिवाजी चौकाजवळ नवीन बसस्थानक उभारण्यात आले. परंतु, मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे हे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासून रंगरंगोटी नाही : प्रवासी सोयीसुविधांपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : चंद्रपूर ते नागपूर मार्गावर स्थानिक शिवाजी चौकाजवळ नवीन बसस्थानक उभारण्यात आले. परंतु, मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे हे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.सिंदेवाही येथे १९९६ मध्ये बसस्थानक सुरू झाले. विशेष म्हणजे, येथील बसस्थानक मराठवाडा पॅटर्नप्रमाणे बांधण्यात आले. बसस्थानकावर सहा प्लॅटफार्म आहेत. बसस्थानकामधील पंखे नेहमी बंद असतात. परिसरात पथदिव्यांची व्यवस्था आहे. या दिव्यांचा प्रकार कमी पडत असल्याने हायमॉस्ट लावणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात जनतेला थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. बसस्थानक परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे दुचाकी वाहने याच परिसरात कुठेही ठेवल्या जातात. १५ वर्षांपासून बसस्थानकाची रंगरंगोटी करण्यात आली नाही. त्यामुळे बसस्थानक जीर्ण अवस्थेत दिसून येत आहे. परिसरात बरीच जागा रिकामी पडून आहे. पावसाळ्यात या जागेवर पाणी साचून राहते. बसस्थानक सभोवताल टिनाची संरक्षक भिंत आहे. टिन तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्या जागेवर विटांची संरक्षक भिंत बांधून दुकानाचे गाळे बांधल्यास चहा व फळांचे दुकान, स्टेशनरी, रसवंती यासारखे छोटे व्यवसाय सुरू होवू शकतात. पूर्वी नागपूरला जाण्यासाठी मूल येथून सिंदेवाहीमार्गे तीन बसेस सुरू होत्या. मात्र, काही वर्षांनंतर त्या बसफेºया बंद करण्यात आल्या. नागपूरसाठी प्रवासी मिळत नाही, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली. पण, खासगी वाहनांत प्रचंड गर्दी दिसून येते.लोकप्रतिनिधींची निष्क्रियताशहरात अनेक समस्या कायम आहेत. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेतात. केवळ राजकीय स्वार्थी पुढे ठेवूनच आंदोलने करण्याची प्रवृत्ती वाढू लागली. त्यामुळे सार्वजनिक हिताचे प्रश्न जै-थे आहेत. खासगी बसेसची स्पर्धा लक्षात घेऊन बदलत्या काळानुसार बसस्थानकातील मूलभूत सुविधांमध्ये वाढ केल्यास परिवहन महामंडळाच्या वाहनांमधूनच प्रवास करणाºयांची संख्या वाढू शकते. पण, लोकप्रतिनिधीच निष्क्रीय असल्याने समस्यांमध्येच वाढ होत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.