शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही बसस्थानक समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:42 IST

चंद्रपूर ते नागपूर मार्गावर स्थानिक शिवाजी चौकाजवळ नवीन बसस्थानक उभारण्यात आले. परंतु, मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे हे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासून रंगरंगोटी नाही : प्रवासी सोयीसुविधांपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : चंद्रपूर ते नागपूर मार्गावर स्थानिक शिवाजी चौकाजवळ नवीन बसस्थानक उभारण्यात आले. परंतु, मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे हे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.सिंदेवाही येथे १९९६ मध्ये बसस्थानक सुरू झाले. विशेष म्हणजे, येथील बसस्थानक मराठवाडा पॅटर्नप्रमाणे बांधण्यात आले. बसस्थानकावर सहा प्लॅटफार्म आहेत. बसस्थानकामधील पंखे नेहमी बंद असतात. परिसरात पथदिव्यांची व्यवस्था आहे. या दिव्यांचा प्रकार कमी पडत असल्याने हायमॉस्ट लावणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात जनतेला थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. बसस्थानक परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे दुचाकी वाहने याच परिसरात कुठेही ठेवल्या जातात. १५ वर्षांपासून बसस्थानकाची रंगरंगोटी करण्यात आली नाही. त्यामुळे बसस्थानक जीर्ण अवस्थेत दिसून येत आहे. परिसरात बरीच जागा रिकामी पडून आहे. पावसाळ्यात या जागेवर पाणी साचून राहते. बसस्थानक सभोवताल टिनाची संरक्षक भिंत आहे. टिन तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्या जागेवर विटांची संरक्षक भिंत बांधून दुकानाचे गाळे बांधल्यास चहा व फळांचे दुकान, स्टेशनरी, रसवंती यासारखे छोटे व्यवसाय सुरू होवू शकतात. पूर्वी नागपूरला जाण्यासाठी मूल येथून सिंदेवाहीमार्गे तीन बसेस सुरू होत्या. मात्र, काही वर्षांनंतर त्या बसफेºया बंद करण्यात आल्या. नागपूरसाठी प्रवासी मिळत नाही, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली. पण, खासगी वाहनांत प्रचंड गर्दी दिसून येते.लोकप्रतिनिधींची निष्क्रियताशहरात अनेक समस्या कायम आहेत. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेतात. केवळ राजकीय स्वार्थी पुढे ठेवूनच आंदोलने करण्याची प्रवृत्ती वाढू लागली. त्यामुळे सार्वजनिक हिताचे प्रश्न जै-थे आहेत. खासगी बसेसची स्पर्धा लक्षात घेऊन बदलत्या काळानुसार बसस्थानकातील मूलभूत सुविधांमध्ये वाढ केल्यास परिवहन महामंडळाच्या वाहनांमधूनच प्रवास करणाºयांची संख्या वाढू शकते. पण, लोकप्रतिनिधीच निष्क्रीय असल्याने समस्यांमध्येच वाढ होत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.