शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या विलगीकरण ट्रेनची आता खरी गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:28 IST

कोरोनाने देशात शिरकाव करण्याच्या प्रारंभीच्या दिवसांत कोरोनाबाधितांच्या विलगीकरणाकरिता मध्य रेल्वे मुंबईच्या वतीने डब्यांमध्ये विलगीकरण याची पुरेपूर व्यवस्था असणारी १९ ...

कोरोनाने देशात शिरकाव करण्याच्या प्रारंभीच्या दिवसांत कोरोनाबाधितांच्या विलगीकरणाकरिता मध्य रेल्वे मुंबईच्या वतीने डब्यांमध्ये विलगीकरण याची पुरेपूर व्यवस्था असणारी १९ डब्यांची एक खास गाडी तयार केली होती. एका गाडीत एकाच वेळी सुमारे १०० जण विलगीकरणात राहू शकतील, अशी व्यवस्था होती. नागपूर, वर्धा आणि बल्लारशा या रेल्वे स्थानकांवर गरजेनुसार या गाड्या ठेवण्याचे ठरवले होते. मात्र, कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र आणि विपुल प्रमाणात विलगीकरणाची सोय झाल्यामुळे रेल्वेच्या या खास आयसोलेशन ट्रेनची गरज पडली नाही. तरीही काही दिवसांकरिता म्हणून एक ट्रेन बल्लारशा स्थानकावर आणून ती प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभी ठेवण्यात आली. मात्र, बाधितांची इतरत्र सोय झाल्याने या ट्रेनचा उपयोग झाला नाही. दोन-तीन दिवसांनंतर या ट्रेनला येथून परत पाठविण्यात आले. आता, कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आलेली आहे. विलागीकरण कक्ष अपुरे पडत आहेत. त्यामुळे, रेल्वेच्या त्या खास गाडीची आता गरज भासू लागली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर, वर्धा आणि आमला येथे आयसोलेशन कोच तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. चंद्रपूर वा बल्लारशा रेल्वे स्थानकावरही तसे कोच तयार करता येऊ शकतात. त्याकरिता लोकप्रतिनिधींचा पुढाकार हवा. त्याची गरज आहे.