शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

रेल्वेच्या विलगीकरण ट्रेनची आता खरी गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:28 IST

कोरोनाने देशात शिरकाव करण्याच्या प्रारंभीच्या दिवसांत कोरोनाबाधितांच्या विलगीकरणाकरिता मध्य रेल्वे मुंबईच्या वतीने डब्यांमध्ये विलगीकरण याची पुरेपूर व्यवस्था असणारी १९ ...

कोरोनाने देशात शिरकाव करण्याच्या प्रारंभीच्या दिवसांत कोरोनाबाधितांच्या विलगीकरणाकरिता मध्य रेल्वे मुंबईच्या वतीने डब्यांमध्ये विलगीकरण याची पुरेपूर व्यवस्था असणारी १९ डब्यांची एक खास गाडी तयार केली होती. एका गाडीत एकाच वेळी सुमारे १०० जण विलगीकरणात राहू शकतील, अशी व्यवस्था होती. नागपूर, वर्धा आणि बल्लारशा या रेल्वे स्थानकांवर गरजेनुसार या गाड्या ठेवण्याचे ठरवले होते. मात्र, कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र आणि विपुल प्रमाणात विलगीकरणाची सोय झाल्यामुळे रेल्वेच्या या खास आयसोलेशन ट्रेनची गरज पडली नाही. तरीही काही दिवसांकरिता म्हणून एक ट्रेन बल्लारशा स्थानकावर आणून ती प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभी ठेवण्यात आली. मात्र, बाधितांची इतरत्र सोय झाल्याने या ट्रेनचा उपयोग झाला नाही. दोन-तीन दिवसांनंतर या ट्रेनला येथून परत पाठविण्यात आले. आता, कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आलेली आहे. विलागीकरण कक्ष अपुरे पडत आहेत. त्यामुळे, रेल्वेच्या त्या खास गाडीची आता गरज भासू लागली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर, वर्धा आणि आमला येथे आयसोलेशन कोच तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. चंद्रपूर वा बल्लारशा रेल्वे स्थानकावरही तसे कोच तयार करता येऊ शकतात. त्याकरिता लोकप्रतिनिधींचा पुढाकार हवा. त्याची गरज आहे.