शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

इरई नदीच्या लाल-निळ्या रेषेची नव्याने पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 23:35 IST

चंद्रपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. जमिनीच्या किमती वाढल्याने अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी कमी दरात जागा घेतल्या. काहींनी अतिक्रमण करून घरे बांधली. इरई नदी परिसराला लागून तयार झालेल्या वसाहती हा त्याचाच भाग असल्याचा आरोप पर्यावरणवादी संघटनांकडून केला जात आहे. नुकत्याच आलेल्या इरई नदीच्या पुरामुळे नागरिकांच्या मालमत्तेची प्रचंड हानी  झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इरई नदी चंद्रपूर शहराला सात किलोमीटर समांतर वाहते. अनेकांनी नियम धाब्यावर बसवून पूरग्रस्त भागातच घरे बांधल्याने यंदा प्रचंड फटका बसला. या नदीच्या लाल व निळ्या रेषेबाबत यापूर्वी मुंबई आयआयटीने सर्व्हे केला होता. या सर्व्हेची नव्याने पडताळणी केली जाणार आहे. ही पडताळणी अधिक शास्त्रोक्त झाल्यास भविष्यातील बाधित क्षेत्राचे नुकसान टाळण्याची आशा निर्माण झाली आहे.चंद्रपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. जमिनीच्या किमती वाढल्याने अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी कमी दरात जागा घेतल्या. काहींनी अतिक्रमण करून घरे बांधली. इरई नदी परिसराला लागून तयार झालेल्या वसाहती हा त्याचाच भाग असल्याचा आरोप पर्यावरणवादी संघटनांकडून केला जात आहे. नुकत्याच आलेल्या इरई नदीच्या पुरामुळे नागरिकांच्या मालमत्तेची प्रचंड हानी  झाली. ही समस्या निकाली काढण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता श्याम काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, देवराव भोंगळे उपस्थित होते. इरई नदीच्या लाल व निळ्या रेषेबद्दल यापूर्वी मुंबई आयआयटीने सर्व्हे केला होता. काही जमिनीवर इरई नदीच्या पुराचे पाणी पोहोचले नाही, अशाही काही जमिनी निळ्या लाईनमध्ये आल्या आहेत. हे क्षेत्र मोठे असल्याने नागरिक यात भरडले जाऊ नयेय. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका व पाटबंधारे विभागाने सामूहिक सर्वेक्षण करून शास्त्रोक्त टिपणी तयार करण्यात येणार आहे. आयआयटीने केलेल्या सर्वेक्षणाची शासनाच्या एमआर-सॅट यंत्रणेकडून पुन्हा पडताळणी झाल्यास नियमानुसार घरे बांधणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळू शकेल.

इरईच्या १८९१ पासूनच्या पुराची स्थितीचंद्रपुरात ३ सप्टेंबर १८९१ रोजी पूर आला. या पुराची पठाणपुरा गेटवर १८३.०६ मीटर मार्किंग आहे. यानंतर जुलै १९१३ मध्ये १८०.०६ मीटर, ऑगस्ट १९५८ मध्ये १८१.३३ मीटर, सप्टेंबर १९५९ मध्ये १८०.८९ मीटर, ऑक्टोबर १९८६ मध्ये १८०.७६ मीटर मार्किंग असल्याची माहिती अधीक्षक अभियंता पाटील यांनी दिली.

चंद्रपुरात असेही काही भाग आहेत. जिथे निळी रेषा आहे, मात्र तेथे पाण्याचा एकही थेंब पोहोचला नाही.  निळ्या रेषेने ४५० हेक्टर क्षेत्र बाधित होते. त्यामुळे आयआयटीच्या सर्वेक्षणाच्या पडताळणीची गरज आहे. याबाबत मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या प्रमुखांसोबत बैठक घेण्यात येईल.- सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री

 

टॅग्स :riverनदी