शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

इरई नदीच्या लाल-निळ्या रेषेची नव्याने पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 23:35 IST

चंद्रपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. जमिनीच्या किमती वाढल्याने अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी कमी दरात जागा घेतल्या. काहींनी अतिक्रमण करून घरे बांधली. इरई नदी परिसराला लागून तयार झालेल्या वसाहती हा त्याचाच भाग असल्याचा आरोप पर्यावरणवादी संघटनांकडून केला जात आहे. नुकत्याच आलेल्या इरई नदीच्या पुरामुळे नागरिकांच्या मालमत्तेची प्रचंड हानी  झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इरई नदी चंद्रपूर शहराला सात किलोमीटर समांतर वाहते. अनेकांनी नियम धाब्यावर बसवून पूरग्रस्त भागातच घरे बांधल्याने यंदा प्रचंड फटका बसला. या नदीच्या लाल व निळ्या रेषेबाबत यापूर्वी मुंबई आयआयटीने सर्व्हे केला होता. या सर्व्हेची नव्याने पडताळणी केली जाणार आहे. ही पडताळणी अधिक शास्त्रोक्त झाल्यास भविष्यातील बाधित क्षेत्राचे नुकसान टाळण्याची आशा निर्माण झाली आहे.चंद्रपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. जमिनीच्या किमती वाढल्याने अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी कमी दरात जागा घेतल्या. काहींनी अतिक्रमण करून घरे बांधली. इरई नदी परिसराला लागून तयार झालेल्या वसाहती हा त्याचाच भाग असल्याचा आरोप पर्यावरणवादी संघटनांकडून केला जात आहे. नुकत्याच आलेल्या इरई नदीच्या पुरामुळे नागरिकांच्या मालमत्तेची प्रचंड हानी  झाली. ही समस्या निकाली काढण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता श्याम काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, देवराव भोंगळे उपस्थित होते. इरई नदीच्या लाल व निळ्या रेषेबद्दल यापूर्वी मुंबई आयआयटीने सर्व्हे केला होता. काही जमिनीवर इरई नदीच्या पुराचे पाणी पोहोचले नाही, अशाही काही जमिनी निळ्या लाईनमध्ये आल्या आहेत. हे क्षेत्र मोठे असल्याने नागरिक यात भरडले जाऊ नयेय. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका व पाटबंधारे विभागाने सामूहिक सर्वेक्षण करून शास्त्रोक्त टिपणी तयार करण्यात येणार आहे. आयआयटीने केलेल्या सर्वेक्षणाची शासनाच्या एमआर-सॅट यंत्रणेकडून पुन्हा पडताळणी झाल्यास नियमानुसार घरे बांधणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळू शकेल.

इरईच्या १८९१ पासूनच्या पुराची स्थितीचंद्रपुरात ३ सप्टेंबर १८९१ रोजी पूर आला. या पुराची पठाणपुरा गेटवर १८३.०६ मीटर मार्किंग आहे. यानंतर जुलै १९१३ मध्ये १८०.०६ मीटर, ऑगस्ट १९५८ मध्ये १८१.३३ मीटर, सप्टेंबर १९५९ मध्ये १८०.८९ मीटर, ऑक्टोबर १९८६ मध्ये १८०.७६ मीटर मार्किंग असल्याची माहिती अधीक्षक अभियंता पाटील यांनी दिली.

चंद्रपुरात असेही काही भाग आहेत. जिथे निळी रेषा आहे, मात्र तेथे पाण्याचा एकही थेंब पोहोचला नाही.  निळ्या रेषेने ४५० हेक्टर क्षेत्र बाधित होते. त्यामुळे आयआयटीच्या सर्वेक्षणाच्या पडताळणीची गरज आहे. याबाबत मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या प्रमुखांसोबत बैठक घेण्यात येईल.- सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री

 

टॅग्स :riverनदी